शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कुसळाच्या माळावर ऊस, कांदा, भाजी..! श्रमदानामुळे कोटीचे उत्पन्न वाढणार : बनगरवाडीत २५० हेक्टरने बागायत क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:15 IST

बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे.

नितीन काळेल ।सातारा : बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे. तर अवघ्या एका पावसात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या १०० एकरांवर कांदा, ३५० एकरवर ऊस आणि २० एकरवर भाजी पिकत आहे. त्यामुळे या खरीप हंगामात गावाचे उत्पन्न किमान एक कोटी रुपयाने वाढणार आहे.

माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गाव इतर दुष्काळी गावाप्रमाणेच. येथील बहुतांश लोकांचा व्यवसाय मेंढपाळाचा. तरुण मुले मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी. टोकाचे राजकारण खेळणाºया या गावात वॉटर कपच्या माध्यमातून मनसंधारण झाले आणि गाव बदलले. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १३५० हेक्टर असले तरी अर्धी जमीन ही माळरानाची होती. त्यामुळे शेती पिकवायची झाली तर जेमतेमच उत्पन्न हाती यायचे. त्यातच आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाने बदलायचं ठरवलं. त्यासाठी वॉटर कप स्पर्धेत या गावाने प्रथमच सहभाग घेतला. मुंबई, पुणे येथील तरुण, नोकरदार व इतर राज्यात कामासाठी गेलेल्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीही गोळा केली. वॉटर कप स्पर्धेच्या ४५ दिवसांच्या कामात गावाने माळराने फोडून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न केला.

स्पर्धेच्या काळात एकूण ३ लाख ३० हजार घनमीटर इतके काम केले. त्यामध्ये डीपसीसीटीचे २५ हजार घनमीटर, सीसीटी ७२०० घनमीटर, ४०० हेक्टरवर कंपार्टमेंट बंडींग केले. तसेच ३० शेततळी निर्माण करण्यात आली. १० मातीनाला बांध, दोन जुन्या पाझर तलावांची दुरुस्ती, १८० दगडी बांध, साडेतीन किलोमीटर लांबीच्या ओढ्याचे खोली व रुंदीकरण करण्यात आले. त्याचे दृश्य परिणाम सध्या दिसू लागले आहेत.

बनगरवाडी व परिसरात जून महिन्यात एकच मोठा पाऊस झाला आहे. त्यानंतर पावसाने दडी मारली ती आजही कायम आहे. पण, वॉटर कप स्पर्धेतील कामामुळे विहिरी पूर्ण भरल्या आहेत. सर्वत्र पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कधी नव्हे ते लोकांनी खरीप हंगामात या पाण्याच्या भरवशावरच नवीन २५० हेक्टर क्षेत्र बागायत करण्याचा निर्णय घेतला. खरिपात बाजरीशिवाय कधीही इतर पीक न घेणाºया शेतकºयांनी जून, जुलैमध्येच ऊस, कांद्याचे पीक लावले. तर अनेकांनी भाजीपाला केला आहे. सध्या नव्याने १०० एकरांवर कांदा, ३५० एकरवरील ऊस डोलू लागला आहे. तर बाजरी ७५० एकरवर घेण्यात आली आहे.येथील भाजीपाला आता तालुक्यातील आठवडी बाजारात जात आहे. त्यामुळे शेतकºयांना रोजच्या रोज पैसा मिळू लागला आहे. तसेच अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. येत्या काळात फळबागा वाढविण्यासाठी शेतकºयांनी नियोजन केले आहे.

३० गुंठ्यातील ढोबळीमधून ५ लाख...बनगरवाडीत पाण्याने किमया केली आहे. त्यामुळे माळरानावर पिके उगवली आहेत. येथील शेतकरी आबासो बनगर यांनी अवघ्या ३० गुंठे क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे. या ढोबळी पिकाला चांगला दरही मिळाला. यामधून आतापर्यंत बनगर यांना ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्याही त्यांच्या रानात ढोबळीचे पीक असून, त्यातून आणखी किमान दोन लाखांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी