शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुसळाच्या माळावर ऊस, कांदा, भाजी..! श्रमदानामुळे कोटीचे उत्पन्न वाढणार : बनगरवाडीत २५० हेक्टरने बागायत क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:15 IST

बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे.

नितीन काळेल ।सातारा : बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे. तर अवघ्या एका पावसात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या १०० एकरांवर कांदा, ३५० एकरवर ऊस आणि २० एकरवर भाजी पिकत आहे. त्यामुळे या खरीप हंगामात गावाचे उत्पन्न किमान एक कोटी रुपयाने वाढणार आहे.

माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गाव इतर दुष्काळी गावाप्रमाणेच. येथील बहुतांश लोकांचा व्यवसाय मेंढपाळाचा. तरुण मुले मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी. टोकाचे राजकारण खेळणाºया या गावात वॉटर कपच्या माध्यमातून मनसंधारण झाले आणि गाव बदलले. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १३५० हेक्टर असले तरी अर्धी जमीन ही माळरानाची होती. त्यामुळे शेती पिकवायची झाली तर जेमतेमच उत्पन्न हाती यायचे. त्यातच आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाने बदलायचं ठरवलं. त्यासाठी वॉटर कप स्पर्धेत या गावाने प्रथमच सहभाग घेतला. मुंबई, पुणे येथील तरुण, नोकरदार व इतर राज्यात कामासाठी गेलेल्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीही गोळा केली. वॉटर कप स्पर्धेच्या ४५ दिवसांच्या कामात गावाने माळराने फोडून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न केला.

स्पर्धेच्या काळात एकूण ३ लाख ३० हजार घनमीटर इतके काम केले. त्यामध्ये डीपसीसीटीचे २५ हजार घनमीटर, सीसीटी ७२०० घनमीटर, ४०० हेक्टरवर कंपार्टमेंट बंडींग केले. तसेच ३० शेततळी निर्माण करण्यात आली. १० मातीनाला बांध, दोन जुन्या पाझर तलावांची दुरुस्ती, १८० दगडी बांध, साडेतीन किलोमीटर लांबीच्या ओढ्याचे खोली व रुंदीकरण करण्यात आले. त्याचे दृश्य परिणाम सध्या दिसू लागले आहेत.

बनगरवाडी व परिसरात जून महिन्यात एकच मोठा पाऊस झाला आहे. त्यानंतर पावसाने दडी मारली ती आजही कायम आहे. पण, वॉटर कप स्पर्धेतील कामामुळे विहिरी पूर्ण भरल्या आहेत. सर्वत्र पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कधी नव्हे ते लोकांनी खरीप हंगामात या पाण्याच्या भरवशावरच नवीन २५० हेक्टर क्षेत्र बागायत करण्याचा निर्णय घेतला. खरिपात बाजरीशिवाय कधीही इतर पीक न घेणाºया शेतकºयांनी जून, जुलैमध्येच ऊस, कांद्याचे पीक लावले. तर अनेकांनी भाजीपाला केला आहे. सध्या नव्याने १०० एकरांवर कांदा, ३५० एकरवरील ऊस डोलू लागला आहे. तर बाजरी ७५० एकरवर घेण्यात आली आहे.येथील भाजीपाला आता तालुक्यातील आठवडी बाजारात जात आहे. त्यामुळे शेतकºयांना रोजच्या रोज पैसा मिळू लागला आहे. तसेच अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. येत्या काळात फळबागा वाढविण्यासाठी शेतकºयांनी नियोजन केले आहे.

३० गुंठ्यातील ढोबळीमधून ५ लाख...बनगरवाडीत पाण्याने किमया केली आहे. त्यामुळे माळरानावर पिके उगवली आहेत. येथील शेतकरी आबासो बनगर यांनी अवघ्या ३० गुंठे क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे. या ढोबळी पिकाला चांगला दरही मिळाला. यामधून आतापर्यंत बनगर यांना ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्याही त्यांच्या रानात ढोबळीचे पीक असून, त्यातून आणखी किमान दोन लाखांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी