शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अवकाळी पावसामुळे अकाली नुकसान ! माणमध्ये तिघेजण जखमी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:56 IST

म्हसवड/दहिवडी : माण तालुक्यातील गोंदवले, किरकसाल परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने

घरे, गोठ्यावरील पत्रे उडाले, खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित; कुसूरमध्ये गाराम्हसवड/दहिवडी : माण तालुक्यातील गोंदवले, किरकसाल परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने काही घरांचे पत्रे उडून गेले. तसेच विजेचे खांब, झाडे पडल्याने मोठं नुकसान झालं आहे. पत्रा उडून जाणे व भिंत पडल्याने तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

गोंदवले, किरकसाल परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाºयाला सुरुवात झाली. या वाºयाने मोठी झाडे वेगाने हलू लागली. त्यातच काही झाडे पडली आणि तीव्र आवाज होऊन वीज कडाडली. त्यानंतर लहान गारांसह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस दहा मिनिटांत बंद झाला. या वाºयामुळे गोंदवलेत सहा ते सात झाडे पडली. काही ठिकाणी विद्युत तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. गावानजीक शेतात राजेंद्र माने यांचा जनावराचा गोठा असून, पत्रा वाºयाने उडून पडला. यात लोखंडी अँगलही वाकून गेले. पत्रा उडाला त्यावेळी रोहित माने हा शालेय मुलगा त्याच खोलीत होता, तो बचावला. तर पांडुरंग पोळ यांच्याही जनावरांच्या गोठ्यावरील पत्रा या वाºयाने सुमारे १०० फूट लांब जाऊन पडला.

दरम्यान, किरकसाल येथेही या वादळी वाºयाने सुमारे १२ घरांवरील पत्रे उडून जाऊन विद्युत खांब पडल्याची माहिती मिळत आहे. येथे ८ राहत्या घरांचे छत, पत्रा, लोखंड, कौले उडून गेली आहेत. त्यामुळे ८ कुटुंबे बेघर झाली आहेत. यामध्ये बबन विठ्ठल काटकर यांच्या घराचा पत्रा आणि लोखंडाचा छत उडूनगेला.त्याचबरोबर भिंत पडून अविता

अमोल काटकर (वय ३५) यांचा पाय फॅ्रक्चर झाला. वरद अमोल काटकर (वय ५) याचा हात फॅ्रक्चर झालेला आहे. श्वेता शैलेंद्र भोसले (१३) ही जखमी झालेली आहे. सदाशिव रघुनाथ काटकर यांच्या घराचे छत पत्र्यासह उडून जाऊन १०० फूट अंतरावर पडले. अशाचप्रकारे इतरांचेही नुकसान झाले आहे.वीज वितरण कंपनीचे सुमारे तीन पोल पडलेले असून, ९ पोल पडण्याच्या स्थितीत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत. तसेच मोठमोठी अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे किरकसाल गावचा आणि परिसराचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे.रहिमतपूर परिसराला झोडपलेरहिमतपूर : वादळी वाºयासह आलेल्या जोरदार पावसाने रहिमतपूर शहराला सुमारे अर्धा तास झोडपून काढले. पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे काही वेळातच सर्वत्र पाणी पाणी पाणी झाले. ऊसतोडी सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांची तर रहिमतपूर येथील आठवडा बाजारात पावसामुळे शेतकरी आणि व्यापाºयांची दैना उडाली.

रहिमतपुरात गुरुवारी सकाळपासून कडक ऊन होते. दुपारी अडीचच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला. काही वेळातच वादळी पावसाला सुरुवातही झाली. गुरुवारी आठवडी बाजार होता. त्यामुळे गांधी चौक ते रोकडेश्वर मंदिर यादरम्यान बाजार भरला होता. भाजीपाला, फळे विक्रीसाठी शेतकरी व व्यापाºयांनी तंबू ठोकले होते.मात्र, वादळी पावसामुळे अनेकांचे तंबू उडाले तर काहींचे भुईसपाट झाले. त्यामुळे सर्वांची दैना उडाली.

पावसाबरोबर वाºयाचा वेग जोरदार असल्यामुळे अनेकांनी सावरासावर करून विक्रीसाठी आणलेला भाजीपाला तळवटाने झाकून ठेवला. पावसापासून बचावासाठी अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. मात्र पावसाचा जोर जास्त असल्यामुळे अनेकांचा भाजीपाला भिजला.सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे ऐन दुपारी रहिमतपूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. पाऊस उघडल्यानंतर काही वेळानंतर पुन्हा भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली.दरम्यान ऊसतोडी सुरू असलेल्या ठिकाणी पावसामुळे मजुरांची दैना उडाली. दरम्यान, परिसरातील साप, अपशिंगे, वेळू, पिंपरी, बोरीव आदी गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसाने अनेकांची दैना उडाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस