मायणी तलाव क्षेत्रात सुभेदार रामजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:31+5:302021-01-08T06:05:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : ‘सध्या ‘मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र ''''म्हणून मायणी पक्षी आश्रयस्थानाचा विकास होत असताना येथे ...

मायणी तलाव क्षेत्रात सुभेदार रामजी
लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : ‘सध्या ‘मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र ''''म्हणून मायणी पक्षी आश्रयस्थानाचा विकास होत असताना येथे रामजी मालोजी आंबेडकर यांचे स्मारक होऊन या ऐतिहासिक वारसाचे जतन व्हावे,’ अशी मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते बाळासाहेब कांबळे यांनी केली.
‘ज्यांच्या विचार कार्यातून अखंड भारत वर्षामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक व मानवतावादी परिवर्तन झाले. त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण मायणी ( ता. खटाव) येथे गेल्याने या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे . सन १८९६ च्या सुमारास सरकारने दुष्काळी भागात तलाव बांधणीची कामे सुरू केली. डॉ. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी संकपाळ यांच्या देखरेखीखाली मायणी, गोरेगाव (ता. खटाव )येथे तलावाचे काम सुरू झाले.
वयाच्या चौथ्या, पाचव्या वर्षी बालभिवाच्या बालपणाचे काही दिवस या गावात गेले असल्याचा पुरावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या चरित्र खंडात मिळतो. सध्या ‘मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र ''''म्हणून मायणी पक्षी आश्रयस्थानाचा विकास होत असताना येथे रामजी मालोजी आंबेडकर यांचे स्मारक होऊन या ऐतिहासिक वारसाचे जतन व्हावे, अशी मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
येथे प्रसिद्ध ब्रिटिशकालीन तलाव आहे. थंडीच्या दिवसात या तलावावर फ्लेमिंगो या परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. ( तिसरी व नववीच्या पाठ्यपुस्तकात याविषयी उल्लेख आहे.) सध्या शासनामार्फत या पक्षी आश्रयस्थानाचा ''''मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून विकास होत आहे. मायणीच्या वैभवात यामुळे अधिक भर पडणार आहे. या क्षेत्राचा विकास होत असताना येथील ज्या तलावामुळे येथे पशुपक्ष्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यावेळी आकाश निकाळजे, स्वप्नील कांबळे, अमोल भिसे, कुंदा लोखंडे, चेतन वायदंडे, साहिल सकट, प्रशांत घाडगे, मंगेश भिसे, दीपक भिसे, संदीप कांबळे, विशाल पाटोळे, गौरव साठे उपस्थित होते.