शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

साखर उद्योगासमोरील अडचणी दूर करणार : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:12 IST

यंदा झालेले विक्रमी साखर उत्पादन व त्याप्रमाणात देशांतर्गत बाजारात मागणी कमी असल्याने साखर उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देसाखर निर्यातीसाठी पंतप्रधानांची भेट घेणार

सांगली : यंदा झालेले विक्रमी साखर उत्पादन व त्याप्रमाणात देशांतर्गत बाजारात मागणी कमी असल्याने साखर उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत. अपेक्षेपेक्षा वाढलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे साखर दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठीच राज्याच्या कोट्यातील ६ लाख २१ हजार टन साखर निर्यात करण्यास परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसेच साखर उद्योगासमोरील अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केले.

पालकमंत्री देशमुख म्हणाले की, निर्धारित वेळेपेक्षा दोन महिने अगोदर साखर कारखान्यांना गाळपास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा उत्पादन जास्त आणि मागणी कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागणी कमी असल्याने साखरेचे दरही उतरले आहेत. यावर उपाय म्हणून निर्यातीस प्राधान्य देणे आवश्यक आहे. राज्यातून किमान ६ लाख २१ हजार टन साखर अन्य देशात निर्यातीस परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. साखर निर्यात झाल्यास प्रतिटन ५५ रुपयांप्रमाणे कारखान्यांना अनुदान देण्यास अडचणी नाहीत. मात्र, याचा ऊस उत्पादकांनाही लाभ देण्याबाबत बंधन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.‘लोकमंगल’प्रकरणी चौकशीस तयारपालकमंत्री देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ साखर कारखान्यावर ‘सेबी’ने केलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले की, लोकमंगल कारखानाही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे. कारखाना काढत असताना आम्हाला सेबीचे नियम माहिती नव्हते. त्यामुळे राज्यभर शेअर्स गोळा केले. आता पूर्वीच्या धोरणांनुसार कारवाई सुरू आहे. त्यामुळे आम्हीही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असून सभासदांना त्यांच्या शेअर्सचे पैसे परत पाहिजे असतील तर ते देणार आहे.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली