शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
आरक्षण मर्यादा ओलांडल्याने सुप्रिम कोर्ट संतप्त, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
4
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
5
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
6
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
7
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
8
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
9
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
10
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
11
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
12
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
13
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
14
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
15
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
16
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
17
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
18
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
19
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
20
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षा शुल्क मिळण्याबाबत अजूनही संभ्रमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:39 IST

सातारा : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता परीक्षाच नाही, तर शुल्क परत करा, असा सूर पालकांमध्ये उमटू लागला आहे. ...

सातारा : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता परीक्षाच नाही, तर शुल्क परत करा, असा सूर पालकांमध्ये उमटू लागला आहे. जिल्ह्यात ४४ हजार ७१६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. त्यांच्या परीक्षा शुल्कापोटी ४१५ रुपये आकारण्यात आले आहेत. परीक्षा शुल्कापोटी शासनाकडे तब्बल १ कोटी ८५ लाख ५७ हजार १४० रुपये जमा आहेत. मात्र, परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याने आवश्यक यंत्रणांद्वारे ही रक्कम खर्ची पडल्याचेही सांगण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावीच्या परीक्षा ऐन वेळी रद्द करण्यात आल्या. मात्र, परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, केंद्र ठरवणे, या सर्वांचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षा केंद्रांवर या सर्व वस्तूही वेळेच्या आधी पोहोचविण्यात आल्या होत्या. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना त्याची बाधा होऊ शकते, असे गृहित धरून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पालक परीक्षा शुल्क परत द्यायची मागणी करत आहेत, तर परीक्षा झाली नसली, तरीही यंत्रणा तर पूर्ण राबली, असं शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतलाच, तर दहा रुपये बोर्ड सर्टिफिकेट आणि दहा रुपये मार्कलिस्टचे घ्यावेच लागतील, असं सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे आर्थिक अवस्था बिकट झाल्याने, मिळालेली ही शुल्काची रक्कम मोबाइल रिचार्ज करून घेण्यासाठी उपयोगी ठरेल, असा विचार पालक करत आहेत, तर विद्यार्थ्यांना शुल्क परत करायचं म्हटलं, तर पालकांकडे करावे की शाळेतच करावे, असा प्रश्न समोर आहे. शाळांना परीक्षा शुल्क परत केले आणि त्याचे वाटप शाळांनीच पालकांनी नाही केले तर काय? असाही प्रश्न समोर उभा आहे.

पॉइंटर :

१,१४२

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा

४४,७१६

दहावीतील एकूण विद्यार्थी

४१५

प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क

१ कोटी ८५ लाख ५७ हजार १४०

परीक्षा शुल्काची एकूण रक्कम

कोट :

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, त्यापूर्वी शिक्षण विभागाने परीक्षेची सर्वच तयारी पूर्ण केली होती. परीक्षा शुल्क परत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. तशा सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

विद्यार्थी प्रतिक्रिया

दहावीची परीक्षा रद्द केली असली, तरीही गुणांकांना किंवा अकरावी प्रवेशाबाबत काहीच जाहीर केलेले नाही. परीक्षा नसल्याने आम्हाला कशाच्या आधारावर गुण देणार आणि त्यामुळे आमच्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेता येईल, या सर्वच बाबत गोंधळ आहे.

- तन्वीर चित्रा अजित, विद्यार्थी

दहावीचं वर्ष म्हटल्यावर मी अगदी मन लावून अभ्यास केला होता. भविष्यातील करिअरचा पाया दहावी असल्याने खुप कष्ट घेतले. पण परीक्षा रद्द झाल्याने हिरमुस झाला. करिअरची पुढची दिशा कशी ठरवली जाणार, मूल्यांकन कसं होणार, याबाबत स्पष्टता मिळावी.

- स्नेहा पाटसुते, विद्यार्थी

पुढचं शिक्षण कसं होणार, आम्ही अभ्यास कसा करणार, कोरोना असंच राहिला, तर त्याचा आमच्या करिअरवर विपरित परिणाम होणार आहे. अकरावी प्रवेशाला सीईटी घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. असं करणार असतील, तर विद्यार्थ्यांना त्याची तयारी करायला वेळ देणं आवश्यक आहे.

- वरुण पवार, विद्यार्थी