शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

राज्यातील ५१ गडकोट होणार ‘राज्य संरक्षित स्मारक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:00 AM

सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा समृद्ध करण्यासाठी गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार ...

सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा समृद्ध करण्यासाठी गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ५१, तर जिल्ह्यातील १५ गडकोटांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात येणार असून, याबाबतची प्रक्रियाही गतिमान झाली आहे.साताऱ्यात मंदिरे, गडकोट, इमारती, स्मारके यांसह विविध वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत; परंतु जाज्वल्य पराक्रमाचे साक्षीदार असलेले जिल्ह्यातील बहुतांश गड, किल्ले संवर्धनाअभावी अखेरची घटका मोजत आहेत.गेली अनेक वर्षे देखभाल, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या गडकोटांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभाग यांच्या समन्वयाने गडकोटांचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ८३ किल्ल्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यापैकी ५१ गडकोटांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले जाणार आहे. या ५१ गडकोटांमध्ये सातारा जिल्ह्यातील १५ गटकोटांचा समावेश आहे. साताºयासह पुणे, नगर, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील गडकोटांचाही यामध्ये समावेश आहे. या निर्णयामुळे उपेक्षित गडकोटांच्या जतन-संवर्धनाचा मार्ग सुकर होणार असून, याबातची प्रक्रियाही गतिमान झाली आहे.संरक्षित स्मारक म्हणजे काय?महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी काही महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारके म्हटले जाते. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत केले जाते. संरक्षित स्मारकांना हानी होऊ नये, यासाठी ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आता गटकोटांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर व हानी पोहोचविणाºयांवर चाप बसणार आहे.या किल्ल्यांचा समावेशचंदन-वंदन, वैराटगड, पांडवगड, अजिंक्यतारा, वारुगड, संतोषगड, भूषणगड, वर्धनगड, वसंतगड, दातेगड, कमळगड, वासोटा, नांदगिरी, केंजळगड, भैरवगड.