शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

आरक्षणाबाबत राज्य सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:20 IST

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन

कऱ्हाड : दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले होते. मात्र, नंतर दिल्लीत असे आरक्षण देता येत नसल्याचे सांगितले. दोनशे आमदार असतानाही जे ठराव करू शकत नाहीत, ते इतर समाजांना आरक्षण काय देणार. आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नसून केवळ चालढकल करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने व पदाधिकारी उपस्थित होते.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा आरक्षणासह धनगर, लिंगायत, मुस्लीम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही आधीपासूनच आग्रही आहोत. या समाजांना आरक्षण मिळण्याची मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे. याबाबत राज्य शासनाने केंद्राकडे ‘कन्सॉलिडेटेड बिल’ पाठवावे. आम्ही त्यांना मदत करू. राज्यातील ‘एमबीबीएस’ म्हणजे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी सरकार हद्दपार करून पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र बनवण्याची गरज आहे.महागाई, बेरोजगारीमुळे जनता अडचणीत आहे. दूध, शेतमालाला भाव नाही. ११८ कोटींचा भ्रष्टाचार फक्त शेतीमध्ये झाला असल्याचा आरोप ‘आरएसएस’ने त्यांच्या वृत्तवाहिनीवर केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणारे ११८ कोटी सरकारने निकृष्ट बियाणे खरेदी करण्यासाठी वापरल्याचे ‘आरएसएस’ने सांगितले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची गरज होती. मात्र, ते केले नाही. कापूस, सोयाबीन, दूध, कांद्याला दर नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायचे सरकारने ठरवले आहे.जाती-जातीत तेढ निर्माण करणारी भाषणे सरकारकडून येत आहेत. राज्याच्या विकासाबाबत सरकार गंभीर नाही. आयकर, सीबीआय, ईडीमार्फत घर, पक्ष फोडण्याचे उद्योग सुरू आहेत. दोन वर्षांत या सरकारने काय क्रांती केली? कांद्याच्या प्रश्नावर आवाज उठवल्यावर तुमच्या तीन जिल्ह्यांसाठी देशाला वेठीस का धरायचे, अशी उत्तरे देण्यात आली. त्यामुळे नाशिककरांनी त्यांना मतदानातून उत्तर दिले आहे.पिपाणी अन् तुतारीमुळे घोळ झाला!आमदार शशिकांत शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमची ताकद कमी पडली. आमचा पक्ष नेला. चिन्ह नेले. आमदार आणि खासदारही नेले. माझ्या मतदारसंघात तर सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, कारखाने, दूध संघही नेले. सत्ता त्यांची. यंत्रणा त्यांची. कुठूनकुठून मिळालेला निधीही त्यांचा. आमच्याकडे फक्त कष्टकरी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते होते. जनताही आमच्या पाठीशी उभी राहिली. बारामती आधी सातारची जागा जिंकण्याची खात्री होती. दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारीमुळे घोळ झाला. सरकारने रडीचा डाव खेळला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSupriya Suleसुप्रिया सुळेMaratha Reservationमराठा आरक्षण