शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आरक्षणाबाबत राज्य सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:20 IST

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन

कऱ्हाड : दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले होते. मात्र, नंतर दिल्लीत असे आरक्षण देता येत नसल्याचे सांगितले. दोनशे आमदार असतानाही जे ठराव करू शकत नाहीत, ते इतर समाजांना आरक्षण काय देणार. आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नसून केवळ चालढकल करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने व पदाधिकारी उपस्थित होते.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा आरक्षणासह धनगर, लिंगायत, मुस्लीम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही आधीपासूनच आग्रही आहोत. या समाजांना आरक्षण मिळण्याची मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे. याबाबत राज्य शासनाने केंद्राकडे ‘कन्सॉलिडेटेड बिल’ पाठवावे. आम्ही त्यांना मदत करू. राज्यातील ‘एमबीबीएस’ म्हणजे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी सरकार हद्दपार करून पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र बनवण्याची गरज आहे.महागाई, बेरोजगारीमुळे जनता अडचणीत आहे. दूध, शेतमालाला भाव नाही. ११८ कोटींचा भ्रष्टाचार फक्त शेतीमध्ये झाला असल्याचा आरोप ‘आरएसएस’ने त्यांच्या वृत्तवाहिनीवर केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणारे ११८ कोटी सरकारने निकृष्ट बियाणे खरेदी करण्यासाठी वापरल्याचे ‘आरएसएस’ने सांगितले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची गरज होती. मात्र, ते केले नाही. कापूस, सोयाबीन, दूध, कांद्याला दर नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायचे सरकारने ठरवले आहे.जाती-जातीत तेढ निर्माण करणारी भाषणे सरकारकडून येत आहेत. राज्याच्या विकासाबाबत सरकार गंभीर नाही. आयकर, सीबीआय, ईडीमार्फत घर, पक्ष फोडण्याचे उद्योग सुरू आहेत. दोन वर्षांत या सरकारने काय क्रांती केली? कांद्याच्या प्रश्नावर आवाज उठवल्यावर तुमच्या तीन जिल्ह्यांसाठी देशाला वेठीस का धरायचे, अशी उत्तरे देण्यात आली. त्यामुळे नाशिककरांनी त्यांना मतदानातून उत्तर दिले आहे.पिपाणी अन् तुतारीमुळे घोळ झाला!आमदार शशिकांत शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमची ताकद कमी पडली. आमचा पक्ष नेला. चिन्ह नेले. आमदार आणि खासदारही नेले. माझ्या मतदारसंघात तर सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, कारखाने, दूध संघही नेले. सत्ता त्यांची. यंत्रणा त्यांची. कुठूनकुठून मिळालेला निधीही त्यांचा. आमच्याकडे फक्त कष्टकरी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते होते. जनताही आमच्या पाठीशी उभी राहिली. बारामती आधी सातारची जागा जिंकण्याची खात्री होती. दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारीमुळे घोळ झाला. सरकारने रडीचा डाव खेळला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSupriya Suleसुप्रिया सुळेMaratha Reservationमराठा आरक्षण