शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

सर्पमित्र घेतायत विषाची परीक्षा !

By admin | Updated: September 2, 2014 00:03 IST

जीवघेणा दंश : माहिती असूनही अनावधानाने जावे लागते मृत्यूच्या जबड्यात

कऱ्हाड : विषाची परीक्षा घ्यायची नसते, असं म्हणतात; पण अनेक सर्पमित्र दररोज विषारी जीव हाताळतात, त्याचे दंश पचवतात. अनावधानाने झालेल्या बहुतांश सर्प दंशांवर प्राथमिक उपचाराची मात्रा लागू पडते. मात्र, एखादा दंश अगदीच जीवघेणा ठरतो. सापाचं विष शरीरभर भिनत आणि तो दंश सर्पमित्राला मृत्युशी झुंजवतो. मलकापुरात राहणारा संजय देसाई हा सर्पमित्र युवक गत दोन दिवसांपासून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेतोय. साप पकडताना झालेला दंश त्याच्या जीवावर बेतलाय; पण या परिस्थितीत फक्त कुटुंबीय आणि मित्र त्याच्या सोबतीला आहेत. एरव्ही साप आढळलाय, या एका कॉलवर शहरासह तालुक्यात स्वखर्चाने कुठेही जाणारा संजय आज एकटाच मृत्यूचा सामना करतोय. रविवारी मध्यरात्री दंश झाल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दहा-बारा तासांच्या उपचारानंतर संबंधित रुग्णालयाने संजयच्या उपचाराचा खर्च तब्बल ५४ हजार झाला असल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी हजार-पाचशेची जमवाजमव करून संबंधित रुग्णालयाचा खर्च भागविला. तसेच बेशुद्धावस्थेत असलेल्या संजयला पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवले. अजूनही संजयला शुद्ध आलेला नाही. कऱ्हाड शहरासह तालुक्यात शेकडो सर्पमित्र कार्यरत आहेत. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी साप आढळतो, त्यावेळी फोनाफोनी होते. सर्पमित्राला बोलवले जाते. त्यानंतर सर्पमित्र स्वत:चा जीव धोक्यात घालून साप पकडतात. सर्वसामान्यांसाठी हे नाट्य इथेच संपते; पण सर्पमित्रांना फक्त साप पकडून चालत नाही, तर त्याला इजा न होता बंदिस्त करावे लागते. एखाद्या काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये साप ठेवून एकट्यानेच त्याला सुरक्षित ठिकाणी न्यावे लागते. हे काम जोखमीचे असते. मात्र, नागरिकांना सर्पदंशापासून आणि सर्पांना जीव गमावण्यापासून वाचविण्यासाठी सर्पमित्र ही जोखीम पत्करतात. साप पकडण्यासाठी सर्पांविषयीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. सर्पांच्या जाती, विषारी-बिनविषारी सर्प, त्याला पकडण्याची पद्धत आदी माहिती अवगत असणे गरजेचे असते. बहुतांश सर्पमित्रांचा यामध्ये हातखंडा आहे. मात्र, कधी-कधी अनावधानाने झालेला दंश त्यांना मृत्यूच्या दाढेत पोहोचवतो. संजय देसाई या सर्पमित्राबाबतही नेमकं हेच घडलंय. आजपर्यंत त्याला अनेक सर्पांचा दंश झालाय. मात्र, प्राथमिक उपचार अथवा रुग्णालयात एखादा दिवस अ‍ॅडमिट राहण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही बाका प्रसंग त्याच्यावर बेतलेला नव्हता. मात्र, आज तो मृत्यूचा सामना करतोय. (प्रतिनिधी)सर्पमित्रांचा जनजागृती कार्यक्रमकऱ्हाडमध्ये कार्यरत असणारा सर्पमित्रांचा ग्रुप साप पकडण्याबरोबरच सर्पांविषयीचे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करतो़ त्या कार्यक्रमांमध्ये सर्पांच्या जाती, विषारी-बिनविषारी सर्प ओळखण्याची पद्धत, सर्पांचा आहार, शरीराची ठेवण आदींविषयी माहिती दिली जाते़ तसेच लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सापही त्यांच्या हातामध्ये दिले जातात़ डॉक्टरही घेतात सर्पमित्रांचा सल्लातसेच रूग्णालयामध्ये स्नेक बाईटचा एखादा रूग्ण आल्यास डॉक्टर या ग्रुपमधील सदस्यांना फोन करून त्याठिकाणी बोलावून घेतात़ संबंधित रुग्णाला कोणत्या सर्पाने दंश केला असावा, याबाबत डॉक्टर त्यांच्याकडून सल्ला घेतात़ ग्रुपच्या सदस्याने सर्पाच्या जातीविषयी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांकडून पुढील उपचार सुरू केला जातो़ का होतो सर्पदंश ?सापाचे १५ ते २० मि़ ग्रॅ़ विषही माणसासाठी प्राणघातक ठरू शकते़ मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाल्यानंतर त्वरित उपचार न झाल्यास दोन तासांत रूग्ण दगावू शकतो़ साप विनाकारण कधीही दंश करीत नाही़ त्याला डिवचले, मारण्याचा प्रयत्न केला किंवा साप कोंडीत सापडला, तरच तो दंश करतो़विषारी सापांची दंशावेळी विष सोडण्याची क्षमता कमी जास्त असली तरी साधारणपणे एका दंशावेळी साप १५० मि़ ग्रॅ़ विष सोडतो़ बिनविषारी सर्पाचा दंश झाला तरी कालांतराने जखम बळावण्याची व धनुर्वातासारख्या आजराची लागण होण्याची शक्यता असते़ त्यामुळे जखमेवर उपचार करणे गरजेचे असते़