शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

सर्पमित्र घेतायत विषाची परीक्षा !

By admin | Updated: September 2, 2014 00:03 IST

जीवघेणा दंश : माहिती असूनही अनावधानाने जावे लागते मृत्यूच्या जबड्यात

कऱ्हाड : विषाची परीक्षा घ्यायची नसते, असं म्हणतात; पण अनेक सर्पमित्र दररोज विषारी जीव हाताळतात, त्याचे दंश पचवतात. अनावधानाने झालेल्या बहुतांश सर्प दंशांवर प्राथमिक उपचाराची मात्रा लागू पडते. मात्र, एखादा दंश अगदीच जीवघेणा ठरतो. सापाचं विष शरीरभर भिनत आणि तो दंश सर्पमित्राला मृत्युशी झुंजवतो. मलकापुरात राहणारा संजय देसाई हा सर्पमित्र युवक गत दोन दिवसांपासून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेतोय. साप पकडताना झालेला दंश त्याच्या जीवावर बेतलाय; पण या परिस्थितीत फक्त कुटुंबीय आणि मित्र त्याच्या सोबतीला आहेत. एरव्ही साप आढळलाय, या एका कॉलवर शहरासह तालुक्यात स्वखर्चाने कुठेही जाणारा संजय आज एकटाच मृत्यूचा सामना करतोय. रविवारी मध्यरात्री दंश झाल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दहा-बारा तासांच्या उपचारानंतर संबंधित रुग्णालयाने संजयच्या उपचाराचा खर्च तब्बल ५४ हजार झाला असल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी हजार-पाचशेची जमवाजमव करून संबंधित रुग्णालयाचा खर्च भागविला. तसेच बेशुद्धावस्थेत असलेल्या संजयला पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवले. अजूनही संजयला शुद्ध आलेला नाही. कऱ्हाड शहरासह तालुक्यात शेकडो सर्पमित्र कार्यरत आहेत. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी साप आढळतो, त्यावेळी फोनाफोनी होते. सर्पमित्राला बोलवले जाते. त्यानंतर सर्पमित्र स्वत:चा जीव धोक्यात घालून साप पकडतात. सर्वसामान्यांसाठी हे नाट्य इथेच संपते; पण सर्पमित्रांना फक्त साप पकडून चालत नाही, तर त्याला इजा न होता बंदिस्त करावे लागते. एखाद्या काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये साप ठेवून एकट्यानेच त्याला सुरक्षित ठिकाणी न्यावे लागते. हे काम जोखमीचे असते. मात्र, नागरिकांना सर्पदंशापासून आणि सर्पांना जीव गमावण्यापासून वाचविण्यासाठी सर्पमित्र ही जोखीम पत्करतात. साप पकडण्यासाठी सर्पांविषयीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. सर्पांच्या जाती, विषारी-बिनविषारी सर्प, त्याला पकडण्याची पद्धत आदी माहिती अवगत असणे गरजेचे असते. बहुतांश सर्पमित्रांचा यामध्ये हातखंडा आहे. मात्र, कधी-कधी अनावधानाने झालेला दंश त्यांना मृत्यूच्या दाढेत पोहोचवतो. संजय देसाई या सर्पमित्राबाबतही नेमकं हेच घडलंय. आजपर्यंत त्याला अनेक सर्पांचा दंश झालाय. मात्र, प्राथमिक उपचार अथवा रुग्णालयात एखादा दिवस अ‍ॅडमिट राहण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही बाका प्रसंग त्याच्यावर बेतलेला नव्हता. मात्र, आज तो मृत्यूचा सामना करतोय. (प्रतिनिधी)सर्पमित्रांचा जनजागृती कार्यक्रमकऱ्हाडमध्ये कार्यरत असणारा सर्पमित्रांचा ग्रुप साप पकडण्याबरोबरच सर्पांविषयीचे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करतो़ त्या कार्यक्रमांमध्ये सर्पांच्या जाती, विषारी-बिनविषारी सर्प ओळखण्याची पद्धत, सर्पांचा आहार, शरीराची ठेवण आदींविषयी माहिती दिली जाते़ तसेच लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सापही त्यांच्या हातामध्ये दिले जातात़ डॉक्टरही घेतात सर्पमित्रांचा सल्लातसेच रूग्णालयामध्ये स्नेक बाईटचा एखादा रूग्ण आल्यास डॉक्टर या ग्रुपमधील सदस्यांना फोन करून त्याठिकाणी बोलावून घेतात़ संबंधित रुग्णाला कोणत्या सर्पाने दंश केला असावा, याबाबत डॉक्टर त्यांच्याकडून सल्ला घेतात़ ग्रुपच्या सदस्याने सर्पाच्या जातीविषयी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांकडून पुढील उपचार सुरू केला जातो़ का होतो सर्पदंश ?सापाचे १५ ते २० मि़ ग्रॅ़ विषही माणसासाठी प्राणघातक ठरू शकते़ मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाल्यानंतर त्वरित उपचार न झाल्यास दोन तासांत रूग्ण दगावू शकतो़ साप विनाकारण कधीही दंश करीत नाही़ त्याला डिवचले, मारण्याचा प्रयत्न केला किंवा साप कोंडीत सापडला, तरच तो दंश करतो़विषारी सापांची दंशावेळी विष सोडण्याची क्षमता कमी जास्त असली तरी साधारणपणे एका दंशावेळी साप १५० मि़ ग्रॅ़ विष सोडतो़ बिनविषारी सर्पाचा दंश झाला तरी कालांतराने जखम बळावण्याची व धनुर्वातासारख्या आजराची लागण होण्याची शक्यता असते़ त्यामुळे जखमेवर उपचार करणे गरजेचे असते़