शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्र घेतायत विषाची परीक्षा !

By admin | Updated: September 2, 2014 00:03 IST

जीवघेणा दंश : माहिती असूनही अनावधानाने जावे लागते मृत्यूच्या जबड्यात

कऱ्हाड : विषाची परीक्षा घ्यायची नसते, असं म्हणतात; पण अनेक सर्पमित्र दररोज विषारी जीव हाताळतात, त्याचे दंश पचवतात. अनावधानाने झालेल्या बहुतांश सर्प दंशांवर प्राथमिक उपचाराची मात्रा लागू पडते. मात्र, एखादा दंश अगदीच जीवघेणा ठरतो. सापाचं विष शरीरभर भिनत आणि तो दंश सर्पमित्राला मृत्युशी झुंजवतो. मलकापुरात राहणारा संजय देसाई हा सर्पमित्र युवक गत दोन दिवसांपासून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेतोय. साप पकडताना झालेला दंश त्याच्या जीवावर बेतलाय; पण या परिस्थितीत फक्त कुटुंबीय आणि मित्र त्याच्या सोबतीला आहेत. एरव्ही साप आढळलाय, या एका कॉलवर शहरासह तालुक्यात स्वखर्चाने कुठेही जाणारा संजय आज एकटाच मृत्यूचा सामना करतोय. रविवारी मध्यरात्री दंश झाल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दहा-बारा तासांच्या उपचारानंतर संबंधित रुग्णालयाने संजयच्या उपचाराचा खर्च तब्बल ५४ हजार झाला असल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी हजार-पाचशेची जमवाजमव करून संबंधित रुग्णालयाचा खर्च भागविला. तसेच बेशुद्धावस्थेत असलेल्या संजयला पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवले. अजूनही संजयला शुद्ध आलेला नाही. कऱ्हाड शहरासह तालुक्यात शेकडो सर्पमित्र कार्यरत आहेत. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी साप आढळतो, त्यावेळी फोनाफोनी होते. सर्पमित्राला बोलवले जाते. त्यानंतर सर्पमित्र स्वत:चा जीव धोक्यात घालून साप पकडतात. सर्वसामान्यांसाठी हे नाट्य इथेच संपते; पण सर्पमित्रांना फक्त साप पकडून चालत नाही, तर त्याला इजा न होता बंदिस्त करावे लागते. एखाद्या काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये साप ठेवून एकट्यानेच त्याला सुरक्षित ठिकाणी न्यावे लागते. हे काम जोखमीचे असते. मात्र, नागरिकांना सर्पदंशापासून आणि सर्पांना जीव गमावण्यापासून वाचविण्यासाठी सर्पमित्र ही जोखीम पत्करतात. साप पकडण्यासाठी सर्पांविषयीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. सर्पांच्या जाती, विषारी-बिनविषारी सर्प, त्याला पकडण्याची पद्धत आदी माहिती अवगत असणे गरजेचे असते. बहुतांश सर्पमित्रांचा यामध्ये हातखंडा आहे. मात्र, कधी-कधी अनावधानाने झालेला दंश त्यांना मृत्यूच्या दाढेत पोहोचवतो. संजय देसाई या सर्पमित्राबाबतही नेमकं हेच घडलंय. आजपर्यंत त्याला अनेक सर्पांचा दंश झालाय. मात्र, प्राथमिक उपचार अथवा रुग्णालयात एखादा दिवस अ‍ॅडमिट राहण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही बाका प्रसंग त्याच्यावर बेतलेला नव्हता. मात्र, आज तो मृत्यूचा सामना करतोय. (प्रतिनिधी)सर्पमित्रांचा जनजागृती कार्यक्रमकऱ्हाडमध्ये कार्यरत असणारा सर्पमित्रांचा ग्रुप साप पकडण्याबरोबरच सर्पांविषयीचे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करतो़ त्या कार्यक्रमांमध्ये सर्पांच्या जाती, विषारी-बिनविषारी सर्प ओळखण्याची पद्धत, सर्पांचा आहार, शरीराची ठेवण आदींविषयी माहिती दिली जाते़ तसेच लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सापही त्यांच्या हातामध्ये दिले जातात़ डॉक्टरही घेतात सर्पमित्रांचा सल्लातसेच रूग्णालयामध्ये स्नेक बाईटचा एखादा रूग्ण आल्यास डॉक्टर या ग्रुपमधील सदस्यांना फोन करून त्याठिकाणी बोलावून घेतात़ संबंधित रुग्णाला कोणत्या सर्पाने दंश केला असावा, याबाबत डॉक्टर त्यांच्याकडून सल्ला घेतात़ ग्रुपच्या सदस्याने सर्पाच्या जातीविषयी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांकडून पुढील उपचार सुरू केला जातो़ का होतो सर्पदंश ?सापाचे १५ ते २० मि़ ग्रॅ़ विषही माणसासाठी प्राणघातक ठरू शकते़ मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाल्यानंतर त्वरित उपचार न झाल्यास दोन तासांत रूग्ण दगावू शकतो़ साप विनाकारण कधीही दंश करीत नाही़ त्याला डिवचले, मारण्याचा प्रयत्न केला किंवा साप कोंडीत सापडला, तरच तो दंश करतो़विषारी सापांची दंशावेळी विष सोडण्याची क्षमता कमी जास्त असली तरी साधारणपणे एका दंशावेळी साप १५० मि़ ग्रॅ़ विष सोडतो़ बिनविषारी सर्पाचा दंश झाला तरी कालांतराने जखम बळावण्याची व धनुर्वातासारख्या आजराची लागण होण्याची शक्यता असते़ त्यामुळे जखमेवर उपचार करणे गरजेचे असते़