शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

मल्लखांबाच्या प्रचारासाठी ५५ वर्षे खर्ची ; सुभाष यादव यांनी घडविले शेकडो खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 19:26 IST

सेवानिवृत्तीनंतरही मल्लखांब प्रशिक्षण व योग प्राणायम प्रशिक्षण देण्याचे काम शाळा-शाळांमधून, गावागावातून सुरूच आहे़ त्यामुळे शेकडो मल्लखांबपटू जिल्हा वि राज्याचे नाव कमावत आहेत.

वाई : आज वाई परिसरातील शेकडो मल्लखांबपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करीत आहेत. त्याचे श्रेय निवृत्त शिक्षक सुभाष यादव यांना जाते. त्यासाठी त्यांनी अव्याहतपणे ५५ वर्षे कष्ट केले. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी मल्लखांब या महाराष्ट्राच्या मातीतील खेळाची जडलेली आवड जपली. या खेळाच्या प्रचार आणि प्रचारासाठी जिवाचे रान करून हजारो विद्यार्थ्यांना हा खेळ शिकवला.

मल्लखांब खेळासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना वेगवेगळे बहुमान मिळले आहेत. प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांना या खेळाची आवड लागली. पुढे महाविद्यालयात असताना भिडे गुरुजी व्यायाम शाळेत त्यांनी जायला सुुरुवात केली़ दरम्यानच्या काळात १९६९ मध्ये औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवात तत्कालीन क्रीडामंत्री शेषराव वानखेडे यांच्याहस्ते रौप्यपदक मिळाले. त्यानंतर महाविद्यालयीन, विद्यापीठ आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय काम करीत विविध पदके पटकावली.

दरम्यान, १९७४ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी पत्कारली. त्यावेळी त्यांनी सातारा तालुक्यातील कारी, लावंघर, करंजे, करडी, कण्हेर, आकले, लिंब गोवे तसेच बसप्पाची वाडी येथे मल्लखांबाचा प्रचार केला पुढे वाई तालुक्यात बदली झाल्यावर वाईच्या पागा तालीम तसेच किसनवीर महाविद्यालयात टीम तयार केली .

खानापूर, परखंदी, धावडी, अभेपुरी, रेनावळे, जांभळी, अनवडी, (जोशी विहीर), भुर्इंज, जांब, किकली या गावांमध्ये मल्लखांबांचा प्रचार करून हजारो खेळाडू तयार केले. या कार्याची पावती म्हणून सातारा जिल्हा परिषदेने १९८४ मध्ये ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविले. पुढे असेच कार्य चालू ठेवल्याने त्यांना विविध पुरस्करांने गौरविण्यात आले. सेवानिवृत्तीनंतरही मल्लखांब प्रशिक्षण व योग प्राणायम प्रशिक्षण देण्याचे काम शाळा-शाळांमधून, गावागावातून सुरूच आहे़ त्यामुळे शेकडो मल्लखांबपटू जिल्हा वि राज्याचे नाव कमावत आहेत.

सुभाष यादव यांनी अभेपुरी येथील प्राथमिक शाळेत असताना मल्लखांब शिकविला, पुढे जाऊन मी राज्य, राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिके मिळविली. अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शिकवत असताना माझ्या हातून ही अनेक यशस्वी विद्यार्थी घडले आहे, याचे सर्वस्वी श्रेय यादव गुरुजींना जाते़- विठ्ठल गोळआतंरराष्ट्रीय प्रशिक्षक व सचिव जिल्हा मल्लखांब असोशिएशन

आपली कला ही समाजासाठी वापरावी त्याचा प्रसार करावा़ हेतू ठेवून आजही कार्यरत आहे़ यातूनच शेकडो राज्य, राष्ट्रीय मल्लखांबपटू तयार झाले. याचा मनस्वी आनंद असून, ग्रामीण भागातही खेळाडू घडत आहेत़ हीच माझी आजवरची खरी कमाई आहे़-सुभाष यादव, मल्लखांब प्रशिक्षक 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeacherशिक्षक