शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; दीड लाख हेक्टरवर पूर्ण

By नितीन काळेल | Updated: July 20, 2023 19:15 IST

५४ टक्के क्षेत्रावर पीक : बाजरीचे क्षेत्र घटणार; सोयाबीनचे वाढणार

सातारा : जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस वाढल्याने खरीप हंगामातील पेरणी तसेच भात लागणीलाही वेग आला आहे. त्यामुळे उशिरा का असेना खरीप हंगामातील पेरणी ५४ टक्क्यांवर पोहोचलीय. अजून काही दिवस पाऊस राहिल्यास पेरणी क्षेत्र वाढू शकते. सध्या दीड लाख हेक्टरवर पेरणी झाली असून यंदा बाजरी क्षेत्र घटणार आहे. तर सोयाबीनचे वाढण्याचा अंदाज आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आतापर्यंतचा विचार करता एकूण क्षेत्राच्या १ लाख ५६ हजार हेक्टरवरच पेरणी तसेच भात लागण झालेली आहे. आतापर्यंत भाताची लागण २१ हजार ४६९ हेक्टरवर झालेली आहे. याचे प्रमाण जवळपास ४९ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ७ हजार हेक्टरवर तर मकेची सुमारे पावणे सहा हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे.त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ६२ हजार ५०६ हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण ८३.५६ आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी १०० टक्के क्षेत्रावर होऊ शकते असा अंदाज आहे. तर भुईमुगाची २३ हजार ४३१ हेक्टर म्हणजे ७९ टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पेरणीला वेग आला आहे. कारण, चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कल वाढला. तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत खरीप हंगामातील पेरणी कमी झालेली आहे.

साताऱ्यात सर्वाधिक तर खटावमध्ये कमी पेरणी...जुलै महिन्याच्या शेवट आला आहे तरीही १०० टक्के पेरणी झालेली नाही. पश्चिम भागातच पाऊस असल्याने पेरणी तसेच भात लागण १०० टक्के होऊ शकते. मात्र, पूर्वेकडील दुष्काळी भागात हजारो एकर क्षेत्र नापेर राहण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी ही सातारा तालुक्यात ८२ टक्के एेवढी झालेली आहे. तर सर्वात कमी खटाव तालुक्यात २० टक्क्यांवर झाली. तसेच जावळी तालुक्यात ५५ टक्के, पाटण ८१, कऱ्हाड ७४, कोरेगाव ५५, माण तालुक्यात ३७ टक्के, फलटण तालुका ३०, खंडाळा ४२, वाई ४५ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अजूनही काही भागात पाऊस नसल्याने पेरणीत खंड पडला आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी सुरु आहे. पाऊस असाच सुरू रहिल्यास पेरणी पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढावा. एक रुपया भरुन पिकांचा विमा उतरवता येईल. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची मुदत आहे. विमा उतरविल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकते. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी