शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

खरीप बळीराजाला हात देणार; सातारा जिल्ह्यात पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टरवर... 

By नितीन काळेल | Updated: July 27, 2024 18:49 IST

चांगल्या पावसामुळे यंदा क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज 

सातारा : जिल्ह्यात जूनपासूनच चांगला पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग आला. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ८२ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पेरणीची टक्केवारी ९७ झाली आहे. त्यामुळे या वर्षी सुमारे ३ लाख हेक्टरपर्यंत पेरणी क्षेत्र राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १४ हजार ३६९ हेक्टर, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर आणि सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर राहणार असल्याचा अंदाज आहे. तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफुलाचे क्षेत्र अत्यल्प असते.मान्सूनच्या पावसावरच खरीप हंगाम घेण्यात येतो. पाऊस वेळेत आणि चांगला झाला तर पेरणी लवकर होते. यंदा पावसाला वेळेवर आणि दमदार सुरुवात झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीही वेळेवर सुरू झाली तसेच पेरणीला वेगही आला होता. त्यामुळे आतापर्यंत ९७ टक्क्यांवर पेरणी पूर्ण झालेली आहे. सध्या २ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर पीक आहे. यामुळे लवकरच खरिपाची पेरणी पूर्ण होणार आहे. आतापर्यंत भाताची ८८ टक्के लागण झाली. म्हणजे ३८ हजार ६१७ हेक्टरवर भात घेण्यात आलेला आहे. अजूनही पश्चिम भागात भात लागणीची कामे सुरूच आहेत. त्यामुळे क्षेत्रात वाढ होणार आहे. तर ज्वारीची ६ हजार ८४१ हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ६१ टक्के आहे. बाजरीची पेरणी ६९ टक्के झाली आहे. ४१ हजार ७९८ हेक्टरवर पेरणी झाली असून, यंदाही या पिकाखालील क्षेत्र कमी राहणार आहे. मका पिकाची १२० टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. १८ हजार १६४ हेक्टर पेरणी पूर्ण झालेली आहे. तर भुईमुगाची ९३ टक्के म्हणजेच सुमारे २७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाही सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत सुमारे ९० हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण १२१ टक्के झाले आहे. सोयाबीनला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे असल्याचे दिसून येत आहे.

खंडाळा तालुक्यात १३९ टक्के क्षेत्रावर पेरणी..जिल्ह्यात या वर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्याने पेरणीलाही वेग आला. खंडाळा तालुक्यात आतापर्यंत १३९ टक्के पेरणी झालेली आहे. तालुक्यातील खरीप क्षेत्र १० हजार ५५६ हेक्टर आहे, तर पेरणी १४ हजार ६८५ हेक्टरवर झाली आहे. सातारा तालुक्यात ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ९५ टक्के आहे. जावळीत १७ हजार ५३२ हेक्टरवर पेरणी झाली असून, ९६ टक्के प्रमाण राहिले आहे.

तसेच पाटण तालुक्यात ४३ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. कऱ्हाड तालुक्यात ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या सुमारे ३७ हजार हेक्टरवर पिके आहेत. कोरेगाव तालुक्यात १०२ टक्के पेरणी झाली. २१ हजार १६२ हेक्टरवर पिके घेतली आहेत. खटाव तालुक्यात ९१ तर माणमध्ये १०१ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. खटावमध्ये सुमारे ४२ हजार, तर माण तालुक्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे. फलटणला १०२, वाई तालुक्यात ९८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातही ९० टक्के पेरणी झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसfarmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र