शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

झोपायला भुई अन् पांघरायला आभाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:10 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास आहेत. ढेकळाच्या रानात पाल उभारून मेंढरांबरोबर दिवस ढकलत आहेत. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ अशी त्यांची स्थिती आहे. आता तर गावाकडे पाण्याची वाणवा म्हणून सुटी लागल्याने शाळकरी मुलंही आई-वडिलांबरोबर मेंढरामागच्या फुफाट्यात जीवनाचा अर्थ शोधू लागलीत.सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग आणि सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. या भागात मेंढपाळ वर्ग अधिक. त्यामुळे लहान जनावरे जगविण्यासाठी काही मेंढपाळ वर्ग दरवर्षी दिवाळी करून जनावरे जगविण्यासाठी गाव सोडतो. उन्हाळा संपेपर्यंत हा मेंढपाळ वर्ग मराठवाडा आणि सातारा, वाई, पाटण परिसरात येतो. वर्षानुवर्षांचे हे गणित; पण गेल्यावर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे अनेक मेंढपाळांनी गावाला वृद्ध आई-वडील, शाळकरी मुलांना सोडून मेंढरामागे भटकंती सुरू केली. माण तालुक्यातील पळसावडेचे पोपट रामचंद्र काळे, अक्षय भगवान धुलगुडे आणि नितीन भगवान शेळके यांचा समावेश आहे. तर सोलापूर जिल्ह्याच्या फोंडशिरसचे (ता. माळशिरस) तात्याबा जगू शेळके हे वास्तव्यास आहेत. हे सर्वजण धावडशी परिसरात ढेकळाच्या रानात पाल उभी करून पावसाळा सुरू होईपर्यंतचे दिवस मोजत आहेत. सकाळी एकदा मेंढरं वागरंबाहेर काढली की दिवसांत किती किलोमीटर चाऱ्यासाठी फिरावं लागंल, हेही त्यांना माहीत नसतं. मेंढराच्या एका-एका खांडव्यामागं दोघं-तिघं तरी राहतात. कारण, आजूबाजूला पीक असल्यानंतर मेंढरं पिकात शिरण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्वांना विविध बाजूला थांबून हा हू करत मेंढरं चारावी लागतात. सायंकाळी पालावर गेल्यावर कोणी विहिरीतून किंवा जवळपास हातपंप असेल तर पाणी आणतो. कोणी, मेंढ्या वागरत बसवतो. तर कोणी तेल, मीठ भाजी आणण्यासाठी एखादं खेडेगाव जवळ करतो, अशी स्थिती.सायंकाळी मग सर्वजण एकत्र येत भाकरीचा एक-एक घास तोंडात घालत उद्या कुठं मेंढर घेऊन जायचं, यावर चर्चा करतात. भाकरी खाऊन झाली की तिथंच ढेकळात काहीतरी चादर, वाकळ टाकतात आणि झोपतात. अंगावर काही घेत नाहीत, घेतलं तरी दिवसभराच्या फिरण्यानं झोप कधी लागते तेही कळत नाही. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ यातच सकाळ कधी होते, ते ही समजत नाही. उठल्यानंतर मग नव्या दिवसाची नवी तयारी सुरू होते.सातारा परिसरात आलेल्या मेंढपाळांचं हे जीवन असलं तरी आता त्यांच्याबरोबर मुलंही गावावरुन आलीत. शाळेला उन्हाळ्याची सुटी लागलीय; पण गावाला पाणी नाही म्हणून ही मुलं वडील, नातेवाइकांच्या मागं रान तुडवू लागलीत.गावातील माणसाला रानात राहू वाटतं का ?सातारा परिसरात वास्तव्यास असलेल्या अक्षय धुलगुडे हा आईबरोबर मेंढ्या घेऊन आलाय. आता दहावीची परीक्षा दिलेली बहीणही साताºयाकडं आली आहे. गावाकडं दुष्काळ असल्यानं तिला इथं करमतं का? असा प्रश्न केला. यावर ती म्हणाली, ‘गावाकडं राहणाºया माणसाला रानात इथं करमंल का?’ हे तिचं उत्तर खरंच काळजाला चर्रर्र करून जाणारंच ठरलं.मेंढरं बसविण्यासाठी पैसे किंवा धान्य...सातारा परिसरातील अनेक भाग बागयती. त्यामुळे येथे मेंढरांना खाण्यासाठी चारा आहे. बाभळीचा डहाळा, मोकळी आणि पिकं काढलेल्या रानात मेंढरं चरतात. तसेच कोणाही शेतकऱ्यांच्या रानात रात्री मेंढरं बसवली जातात. एक रात्र मेंढ्या बसविण्यासाठी मेंढपाळांना २०० ते २५० रुपये किंवा दोन पायली धान्य मिळते.