शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

झोपायला भुई अन् पांघरायला आभाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:10 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास आहेत. ढेकळाच्या रानात पाल उभारून मेंढरांबरोबर दिवस ढकलत आहेत. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ अशी त्यांची स्थिती आहे. आता तर गावाकडे पाण्याची वाणवा म्हणून सुटी लागल्याने शाळकरी मुलंही आई-वडिलांबरोबर मेंढरामागच्या फुफाट्यात जीवनाचा अर्थ शोधू लागलीत.सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग आणि सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. या भागात मेंढपाळ वर्ग अधिक. त्यामुळे लहान जनावरे जगविण्यासाठी काही मेंढपाळ वर्ग दरवर्षी दिवाळी करून जनावरे जगविण्यासाठी गाव सोडतो. उन्हाळा संपेपर्यंत हा मेंढपाळ वर्ग मराठवाडा आणि सातारा, वाई, पाटण परिसरात येतो. वर्षानुवर्षांचे हे गणित; पण गेल्यावर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे अनेक मेंढपाळांनी गावाला वृद्ध आई-वडील, शाळकरी मुलांना सोडून मेंढरामागे भटकंती सुरू केली. माण तालुक्यातील पळसावडेचे पोपट रामचंद्र काळे, अक्षय भगवान धुलगुडे आणि नितीन भगवान शेळके यांचा समावेश आहे. तर सोलापूर जिल्ह्याच्या फोंडशिरसचे (ता. माळशिरस) तात्याबा जगू शेळके हे वास्तव्यास आहेत. हे सर्वजण धावडशी परिसरात ढेकळाच्या रानात पाल उभी करून पावसाळा सुरू होईपर्यंतचे दिवस मोजत आहेत. सकाळी एकदा मेंढरं वागरंबाहेर काढली की दिवसांत किती किलोमीटर चाऱ्यासाठी फिरावं लागंल, हेही त्यांना माहीत नसतं. मेंढराच्या एका-एका खांडव्यामागं दोघं-तिघं तरी राहतात. कारण, आजूबाजूला पीक असल्यानंतर मेंढरं पिकात शिरण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्वांना विविध बाजूला थांबून हा हू करत मेंढरं चारावी लागतात. सायंकाळी पालावर गेल्यावर कोणी विहिरीतून किंवा जवळपास हातपंप असेल तर पाणी आणतो. कोणी, मेंढ्या वागरत बसवतो. तर कोणी तेल, मीठ भाजी आणण्यासाठी एखादं खेडेगाव जवळ करतो, अशी स्थिती.सायंकाळी मग सर्वजण एकत्र येत भाकरीचा एक-एक घास तोंडात घालत उद्या कुठं मेंढर घेऊन जायचं, यावर चर्चा करतात. भाकरी खाऊन झाली की तिथंच ढेकळात काहीतरी चादर, वाकळ टाकतात आणि झोपतात. अंगावर काही घेत नाहीत, घेतलं तरी दिवसभराच्या फिरण्यानं झोप कधी लागते तेही कळत नाही. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ यातच सकाळ कधी होते, ते ही समजत नाही. उठल्यानंतर मग नव्या दिवसाची नवी तयारी सुरू होते.सातारा परिसरात आलेल्या मेंढपाळांचं हे जीवन असलं तरी आता त्यांच्याबरोबर मुलंही गावावरुन आलीत. शाळेला उन्हाळ्याची सुटी लागलीय; पण गावाला पाणी नाही म्हणून ही मुलं वडील, नातेवाइकांच्या मागं रान तुडवू लागलीत.गावातील माणसाला रानात राहू वाटतं का ?सातारा परिसरात वास्तव्यास असलेल्या अक्षय धुलगुडे हा आईबरोबर मेंढ्या घेऊन आलाय. आता दहावीची परीक्षा दिलेली बहीणही साताºयाकडं आली आहे. गावाकडं दुष्काळ असल्यानं तिला इथं करमतं का? असा प्रश्न केला. यावर ती म्हणाली, ‘गावाकडं राहणाºया माणसाला रानात इथं करमंल का?’ हे तिचं उत्तर खरंच काळजाला चर्रर्र करून जाणारंच ठरलं.मेंढरं बसविण्यासाठी पैसे किंवा धान्य...सातारा परिसरातील अनेक भाग बागयती. त्यामुळे येथे मेंढरांना खाण्यासाठी चारा आहे. बाभळीचा डहाळा, मोकळी आणि पिकं काढलेल्या रानात मेंढरं चरतात. तसेच कोणाही शेतकऱ्यांच्या रानात रात्री मेंढरं बसवली जातात. एक रात्र मेंढ्या बसविण्यासाठी मेंढपाळांना २०० ते २५० रुपये किंवा दोन पायली धान्य मिळते.