शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

झोपायला भुई अन् पांघरायला आभाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:10 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास आहेत. ढेकळाच्या रानात पाल उभारून मेंढरांबरोबर दिवस ढकलत आहेत. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ अशी त्यांची स्थिती आहे. आता तर गावाकडे पाण्याची वाणवा म्हणून सुटी लागल्याने शाळकरी मुलंही आई-वडिलांबरोबर मेंढरामागच्या फुफाट्यात जीवनाचा अर्थ शोधू लागलीत.सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग आणि सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. या भागात मेंढपाळ वर्ग अधिक. त्यामुळे लहान जनावरे जगविण्यासाठी काही मेंढपाळ वर्ग दरवर्षी दिवाळी करून जनावरे जगविण्यासाठी गाव सोडतो. उन्हाळा संपेपर्यंत हा मेंढपाळ वर्ग मराठवाडा आणि सातारा, वाई, पाटण परिसरात येतो. वर्षानुवर्षांचे हे गणित; पण गेल्यावर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे अनेक मेंढपाळांनी गावाला वृद्ध आई-वडील, शाळकरी मुलांना सोडून मेंढरामागे भटकंती सुरू केली. माण तालुक्यातील पळसावडेचे पोपट रामचंद्र काळे, अक्षय भगवान धुलगुडे आणि नितीन भगवान शेळके यांचा समावेश आहे. तर सोलापूर जिल्ह्याच्या फोंडशिरसचे (ता. माळशिरस) तात्याबा जगू शेळके हे वास्तव्यास आहेत. हे सर्वजण धावडशी परिसरात ढेकळाच्या रानात पाल उभी करून पावसाळा सुरू होईपर्यंतचे दिवस मोजत आहेत. सकाळी एकदा मेंढरं वागरंबाहेर काढली की दिवसांत किती किलोमीटर चाऱ्यासाठी फिरावं लागंल, हेही त्यांना माहीत नसतं. मेंढराच्या एका-एका खांडव्यामागं दोघं-तिघं तरी राहतात. कारण, आजूबाजूला पीक असल्यानंतर मेंढरं पिकात शिरण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्वांना विविध बाजूला थांबून हा हू करत मेंढरं चारावी लागतात. सायंकाळी पालावर गेल्यावर कोणी विहिरीतून किंवा जवळपास हातपंप असेल तर पाणी आणतो. कोणी, मेंढ्या वागरत बसवतो. तर कोणी तेल, मीठ भाजी आणण्यासाठी एखादं खेडेगाव जवळ करतो, अशी स्थिती.सायंकाळी मग सर्वजण एकत्र येत भाकरीचा एक-एक घास तोंडात घालत उद्या कुठं मेंढर घेऊन जायचं, यावर चर्चा करतात. भाकरी खाऊन झाली की तिथंच ढेकळात काहीतरी चादर, वाकळ टाकतात आणि झोपतात. अंगावर काही घेत नाहीत, घेतलं तरी दिवसभराच्या फिरण्यानं झोप कधी लागते तेही कळत नाही. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ यातच सकाळ कधी होते, ते ही समजत नाही. उठल्यानंतर मग नव्या दिवसाची नवी तयारी सुरू होते.सातारा परिसरात आलेल्या मेंढपाळांचं हे जीवन असलं तरी आता त्यांच्याबरोबर मुलंही गावावरुन आलीत. शाळेला उन्हाळ्याची सुटी लागलीय; पण गावाला पाणी नाही म्हणून ही मुलं वडील, नातेवाइकांच्या मागं रान तुडवू लागलीत.गावातील माणसाला रानात राहू वाटतं का ?सातारा परिसरात वास्तव्यास असलेल्या अक्षय धुलगुडे हा आईबरोबर मेंढ्या घेऊन आलाय. आता दहावीची परीक्षा दिलेली बहीणही साताºयाकडं आली आहे. गावाकडं दुष्काळ असल्यानं तिला इथं करमतं का? असा प्रश्न केला. यावर ती म्हणाली, ‘गावाकडं राहणाºया माणसाला रानात इथं करमंल का?’ हे तिचं उत्तर खरंच काळजाला चर्रर्र करून जाणारंच ठरलं.मेंढरं बसविण्यासाठी पैसे किंवा धान्य...सातारा परिसरातील अनेक भाग बागयती. त्यामुळे येथे मेंढरांना खाण्यासाठी चारा आहे. बाभळीचा डहाळा, मोकळी आणि पिकं काढलेल्या रानात मेंढरं चरतात. तसेच कोणाही शेतकऱ्यांच्या रानात रात्री मेंढरं बसवली जातात. एक रात्र मेंढ्या बसविण्यासाठी मेंढपाळांना २०० ते २५० रुपये किंवा दोन पायली धान्य मिळते.