शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जिल्ह्यात आणखी सहाजणांचा म्युकरमायकोसिसमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हयात कोरोनाचे थैमान सुरू असताना आता कोविडपश्चात आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हयात कोरोनाचे थैमान सुरू असताना आता कोविडपश्चात आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या आजाराने गुरुवारी तब्बल सहाजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या १९ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत ११४ रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला होता, तर सहा रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे.

तसेच या आजारातून ३५ जण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

त्याचबरोबर एकूण ३४ जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, इतर ११ रुग्णांवर ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये हा बुरशीजन्य आजार वाढत असल्याचे समोर आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. अनेक खासगी रुग्णालयांत असा रुग्णांची नोंद असताना आरोग्य यंत्रणेला याबाबत माहिती कळवली जात नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत संबंधित आरोग्य यंत्रणेला आदेश दिल्यानंतर तत्काळ जिल्ह्यातील खासगी डॉक्टर, सरकारी डॉक्टर नाक, कान, घसतज्ज्ञ, डोळ्यांचे तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, फिजिशियन यांची बैठक झाली. त्यात याबाबत रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागास माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. डोळ्यांना सुज, नाकाला सुज, डोळे लाल होणे अशी सुरुवातीला लक्षणे आढळतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार अधिक संभवतो. आजार वाढल्यास मेंदूपर्यंत जाऊन रुग्णाच्या जिवावर बेतू शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. येथील खासगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालय व काही रुग्णांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. कोविड बरा झालेल्या काही रुग्णांना हा आजार संभवतो. डोळे आणि नाकाला इन्फेक्शन होते. प्रसंगी काही जणांना आपला डोळादेखील गमवावा लागला आहे. या आजाराचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. रुग्णांनी आजाराची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. सायनसमध्ये नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते. ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही; पण ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे.