शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

शहरात जागा दाखवा... स्वच्छतागृह बांधू !

By admin | Updated: July 9, 2015 22:51 IST

शिवेंद्रसिंंहराजे : वार्ड कमिटी बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा

सातारा : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या वार्ड कमिटीमुळे नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होत आहे. नागरिक थेट आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत आहेत. यामुळे शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असून वार्ड कमिटीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी केले. तसेच, यावेळी तुम्ही जागा दाखवा, तिथे स्वच्छतागृह करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी शहराच्या विकासासाठी स्वयंसेवी नागरिकांची वार्डनिहाय कमिटी तयार केली आहे. शहरातील ३९ वार्डांसाठी स्थापन झालेल्या कमिटीची टप्प्याटप्प्याने बैठक घेतली जात असून आ. शिवेंद्रसिंंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली ८ ते १५ वार्डासाठी स्थापन झालेल्या कमिटीची पहिली बैठक उत्साहात झाली. यावेळी रामदास बल्लाळ, हेमंत कासार यांच्यासह पालिकेचे नगर अभियंता दिलीप चिद्रे, आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे, दत्तात्रय रणदिवे, भागनिरीक्षक सतीश साखरे, अभियंता प्रदीप साबळे, सुधीर चव्हाण, एस. एस. भावी, संदीप सावंत तसेच वार्ड कमिटी सदस्य उपस्थित होते. वार्ड कमिटी सदस्यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. रात्रीच्या वेळी सर्व ठिकाणी पथदिवे सुरु राहतील याची दक्षता घेण्याची सूचनाही केली. स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर तुम्ही जागा दाखवा, तिथे स्वच्छतागृह करण्यात येईल. बुधवार पेठेत हौदांची स्वच्छता करुन गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठी या हौदांचा वापर करावा, असे त्यांनी प्रशासनास सांगितले. कामाठीपुरा, कोल्हाटी वस्ती, वैदू वस्ती याठिकाणच्या समस्या मांडल्या. या परिसरात झोपडपट्टी सुधार योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. मात्र ग्रीन झोन असून झोन उठल्याशिवाय घरकुल बांधकाम करता येत नसल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गोडोली तळ्यामुळे पावसाळ्यात हानीगोडोली तलावाचे बांधकाम झाल्याने पावसाळ्यात अजिंक्यताऱ्यावरुन खाली येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसून यामुळे गोडोलीत मोठी हानी होत असल्याचा मुद्दा मोरे यांनी मांडला. मात्र हा भाग त्रिशंकू असून पालिकेच्या हद्दीत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून काय तोडगा काढता येतो का ते पाहू, असे आ. शिवेंद्रसिंंहराजे म्हणाले.भागनिरीक्षकांनी जबाबदारीने काम करावेपंचायत समितीसमोर नेपाळी व्यावसायिकांना जागा देण्यात आली असून त्यांनी याठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचे व्यंकटराव मोरे यांनी सांगितले. याबाबत भागनिरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांनी दररोज आपल्या भागात जाऊन पाहणी केली पाहिजे. भागनिरीक्षक जागृत असतील तर चुकीच्या कामांना पाठबळ मिळणार नाही, असे आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी स्पष्ट केले.