शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शहरात जागा दाखवा... स्वच्छतागृह बांधू !

By admin | Updated: July 9, 2015 22:51 IST

शिवेंद्रसिंंहराजे : वार्ड कमिटी बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा

सातारा : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या वार्ड कमिटीमुळे नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होत आहे. नागरिक थेट आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत आहेत. यामुळे शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असून वार्ड कमिटीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी केले. तसेच, यावेळी तुम्ही जागा दाखवा, तिथे स्वच्छतागृह करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी शहराच्या विकासासाठी स्वयंसेवी नागरिकांची वार्डनिहाय कमिटी तयार केली आहे. शहरातील ३९ वार्डांसाठी स्थापन झालेल्या कमिटीची टप्प्याटप्प्याने बैठक घेतली जात असून आ. शिवेंद्रसिंंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली ८ ते १५ वार्डासाठी स्थापन झालेल्या कमिटीची पहिली बैठक उत्साहात झाली. यावेळी रामदास बल्लाळ, हेमंत कासार यांच्यासह पालिकेचे नगर अभियंता दिलीप चिद्रे, आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे, दत्तात्रय रणदिवे, भागनिरीक्षक सतीश साखरे, अभियंता प्रदीप साबळे, सुधीर चव्हाण, एस. एस. भावी, संदीप सावंत तसेच वार्ड कमिटी सदस्य उपस्थित होते. वार्ड कमिटी सदस्यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. रात्रीच्या वेळी सर्व ठिकाणी पथदिवे सुरु राहतील याची दक्षता घेण्याची सूचनाही केली. स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर तुम्ही जागा दाखवा, तिथे स्वच्छतागृह करण्यात येईल. बुधवार पेठेत हौदांची स्वच्छता करुन गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठी या हौदांचा वापर करावा, असे त्यांनी प्रशासनास सांगितले. कामाठीपुरा, कोल्हाटी वस्ती, वैदू वस्ती याठिकाणच्या समस्या मांडल्या. या परिसरात झोपडपट्टी सुधार योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. मात्र ग्रीन झोन असून झोन उठल्याशिवाय घरकुल बांधकाम करता येत नसल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गोडोली तळ्यामुळे पावसाळ्यात हानीगोडोली तलावाचे बांधकाम झाल्याने पावसाळ्यात अजिंक्यताऱ्यावरुन खाली येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसून यामुळे गोडोलीत मोठी हानी होत असल्याचा मुद्दा मोरे यांनी मांडला. मात्र हा भाग त्रिशंकू असून पालिकेच्या हद्दीत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून काय तोडगा काढता येतो का ते पाहू, असे आ. शिवेंद्रसिंंहराजे म्हणाले.भागनिरीक्षकांनी जबाबदारीने काम करावेपंचायत समितीसमोर नेपाळी व्यावसायिकांना जागा देण्यात आली असून त्यांनी याठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचे व्यंकटराव मोरे यांनी सांगितले. याबाबत भागनिरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांनी दररोज आपल्या भागात जाऊन पाहणी केली पाहिजे. भागनिरीक्षक जागृत असतील तर चुकीच्या कामांना पाठबळ मिळणार नाही, असे आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी स्पष्ट केले.