शिवस्वराज्य जागृती यात्रा साताऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST2021-02-17T04:46:54+5:302021-02-17T04:46:54+5:30
सातारा : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवस्वराज्य जागृती व संविधान कायदा अमरवाणी जाणीव यात्रा मंगळवारी साताऱ्यात दाखल झाली. शेतकरी आत्महत्या ...

शिवस्वराज्य जागृती यात्रा साताऱ्यात
सातारा : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवस्वराज्य जागृती व संविधान कायदा अमरवाणी जाणीव यात्रा मंगळवारी साताऱ्यात दाखल झाली.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात तसेच बैलांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी इस्लामपूर येथून मुंबईपर्यंत शिवस्वराज्य जागृती व संविधान कायदा अंमलबजावणी यात्रा विजय जाधव या शेतकऱ्याने काढली असून, मंगळवारी सकाळी ही यात्रा सातारा शहरात आली होती. सरकारने बैलाला अनुदान द्यावे, तसेच बैल जर जंगली प्राणी असेल तर त्याला कत्तलखान्यात कापण्यास बंदी करावी, अशा विविध विषयांवर शासनाला जाब विचारण्यासाठी यात्रा काढण्यात आली असून येत्या १९ तारखेला ही यात्रा मुंबई येथील शिवाजी पार्क येथे पोहोचून याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असून, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर प्रसंगी आत्मदहन करणार असल्याचा इशाराही यावेळी विजय जाधव यांनी दिला आहे.
फोटो ओळ :
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवराज्य जागृती व संविधान कायदा अंमलबजावणी यात्रा दाखल झाली होती.