शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

शिवसागर जलाशय आटल्याने बोटी टाकताहेत नांगर! ग्रामस्थांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 16:55 IST

पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत.

सातारा - पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत. पाणी कमी झाल्याने बोटी काही अंतर जाऊन नांगर टाकत आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना गावी पोहोचण्यासाठी तासन्तास पायपीट करावी लागत आहे. 

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमकडील विशेषत: कोयना शिवसागर जलाशयापलीकडील काठावरील व डोंगरातील गावांना आजही पावसाळ्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा लागतो. कोयना धरणाची निर्मिती होण्यापूर्वी नदी पलीकडील गावांना खूप सावधपणे राहावे लागायचे. पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीतून प्रवास करता येत नव्हता. नदीवर पूल किंवा नदी ओलांडण्याचे कोणतेही सुरक्षित साधन नव्हते. आजही तशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने जाणवते. 

यंदा शिवसागर जलाशयाचे पाणी खूप कमी झाले आहे. त्यामुळे नदीपलीकडील अनेक गावांना लाँचमधून उतरून आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी तासन्तास चालत जावे लागत आहे. शिरणार, दाभे, खरोसी, गोगवे उचाट, शिंदी, वलवण, झाडाणी, दोडाणी, वाघावळे, कांदा टबन आदी अनेक गावांना व मुºयावरील सर्व गावांना लाँचमधून उतरून तासन्तास पायी प्रवास करावा लागत आहे.  सातारा जिल्हा परिषदेच्या प्रवासी लाँचने प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यासाठी सहा महिने पुरतील एवढे आवश्यक साहित्य डोक्यावरून वाहून न्यावा लागतो. 

 

सारा संसार डोक्यावर..

एकदा पाऊस सुरू झाला व नदी वाहू लागली की सर्व मार्ग बंद होतात. म्हणून हे लोक सातारा, बामणोली व तापोळा येथून लाँचने सर्व साहित्य आपल्या घरापर्यंत नेण्याच्या धावपळीत आहेत. मीठ, कांदे, साखर, डाळी, मसाला या वस्तूंचा साठा करावा लागत आहे. वादळी पाऊस सुरू झाल्यावर लाँच तसेच सर्व सेवा ठप्प होतात. हा सर्वांचा अनुभव आहे. 

 

मी शेलटी मु-यावर लहानपणापासून राहतो. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा बामणोली व तापोळ्याला जाता येईल याची खात्री नाही. त्यामुळे पावसाळ्यातील सर्व धान्य व गरजेचे साहित्य अगदी कपडे व पैसे सुद्धा जमवून ठेवले आहेत. 

- बाबूराव झोरे, शेलटी मु-हा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्र