शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शिवसागर जलाशय आटल्याने बोटी टाकताहेत नांगर! ग्रामस्थांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 16:55 IST

पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत.

सातारा - पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत. पाणी कमी झाल्याने बोटी काही अंतर जाऊन नांगर टाकत आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना गावी पोहोचण्यासाठी तासन्तास पायपीट करावी लागत आहे. 

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमकडील विशेषत: कोयना शिवसागर जलाशयापलीकडील काठावरील व डोंगरातील गावांना आजही पावसाळ्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा लागतो. कोयना धरणाची निर्मिती होण्यापूर्वी नदी पलीकडील गावांना खूप सावधपणे राहावे लागायचे. पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीतून प्रवास करता येत नव्हता. नदीवर पूल किंवा नदी ओलांडण्याचे कोणतेही सुरक्षित साधन नव्हते. आजही तशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने जाणवते. 

यंदा शिवसागर जलाशयाचे पाणी खूप कमी झाले आहे. त्यामुळे नदीपलीकडील अनेक गावांना लाँचमधून उतरून आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी तासन्तास चालत जावे लागत आहे. शिरणार, दाभे, खरोसी, गोगवे उचाट, शिंदी, वलवण, झाडाणी, दोडाणी, वाघावळे, कांदा टबन आदी अनेक गावांना व मुºयावरील सर्व गावांना लाँचमधून उतरून तासन्तास पायी प्रवास करावा लागत आहे.  सातारा जिल्हा परिषदेच्या प्रवासी लाँचने प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यासाठी सहा महिने पुरतील एवढे आवश्यक साहित्य डोक्यावरून वाहून न्यावा लागतो. 

 

सारा संसार डोक्यावर..

एकदा पाऊस सुरू झाला व नदी वाहू लागली की सर्व मार्ग बंद होतात. म्हणून हे लोक सातारा, बामणोली व तापोळा येथून लाँचने सर्व साहित्य आपल्या घरापर्यंत नेण्याच्या धावपळीत आहेत. मीठ, कांदे, साखर, डाळी, मसाला या वस्तूंचा साठा करावा लागत आहे. वादळी पाऊस सुरू झाल्यावर लाँच तसेच सर्व सेवा ठप्प होतात. हा सर्वांचा अनुभव आहे. 

 

मी शेलटी मु-यावर लहानपणापासून राहतो. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा बामणोली व तापोळ्याला जाता येईल याची खात्री नाही. त्यामुळे पावसाळ्यातील सर्व धान्य व गरजेचे साहित्य अगदी कपडे व पैसे सुद्धा जमवून ठेवले आहेत. 

- बाबूराव झोरे, शेलटी मु-हा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्र