शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

शिवसागर जलाशय आटल्याने बोटी टाकताहेत नांगर! ग्रामस्थांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 16:55 IST

पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत.

सातारा - पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत. पाणी कमी झाल्याने बोटी काही अंतर जाऊन नांगर टाकत आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना गावी पोहोचण्यासाठी तासन्तास पायपीट करावी लागत आहे. 

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमकडील विशेषत: कोयना शिवसागर जलाशयापलीकडील काठावरील व डोंगरातील गावांना आजही पावसाळ्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा लागतो. कोयना धरणाची निर्मिती होण्यापूर्वी नदी पलीकडील गावांना खूप सावधपणे राहावे लागायचे. पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीतून प्रवास करता येत नव्हता. नदीवर पूल किंवा नदी ओलांडण्याचे कोणतेही सुरक्षित साधन नव्हते. आजही तशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने जाणवते. 

यंदा शिवसागर जलाशयाचे पाणी खूप कमी झाले आहे. त्यामुळे नदीपलीकडील अनेक गावांना लाँचमधून उतरून आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी तासन्तास चालत जावे लागत आहे. शिरणार, दाभे, खरोसी, गोगवे उचाट, शिंदी, वलवण, झाडाणी, दोडाणी, वाघावळे, कांदा टबन आदी अनेक गावांना व मुºयावरील सर्व गावांना लाँचमधून उतरून तासन्तास पायी प्रवास करावा लागत आहे.  सातारा जिल्हा परिषदेच्या प्रवासी लाँचने प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यासाठी सहा महिने पुरतील एवढे आवश्यक साहित्य डोक्यावरून वाहून न्यावा लागतो. 

 

सारा संसार डोक्यावर..

एकदा पाऊस सुरू झाला व नदी वाहू लागली की सर्व मार्ग बंद होतात. म्हणून हे लोक सातारा, बामणोली व तापोळा येथून लाँचने सर्व साहित्य आपल्या घरापर्यंत नेण्याच्या धावपळीत आहेत. मीठ, कांदे, साखर, डाळी, मसाला या वस्तूंचा साठा करावा लागत आहे. वादळी पाऊस सुरू झाल्यावर लाँच तसेच सर्व सेवा ठप्प होतात. हा सर्वांचा अनुभव आहे. 

 

मी शेलटी मु-यावर लहानपणापासून राहतो. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा बामणोली व तापोळ्याला जाता येईल याची खात्री नाही. त्यामुळे पावसाळ्यातील सर्व धान्य व गरजेचे साहित्य अगदी कपडे व पैसे सुद्धा जमवून ठेवले आहेत. 

- बाबूराव झोरे, शेलटी मु-हा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्र