शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Lok sabha 2024: साताऱ्याच्या क्रांतीचा शरद पवार जागविणार इतिहास

By नितीन काळेल | Updated: March 28, 2024 18:52 IST

पावसात भिजलेल्या सभेने इतिहास घडवला..

सातारा : सातारा जिल्ह्याला क्रांतीचा इतिहास आहे. त्यामुळेच शरद पवार हे नवीन कोणतीही गोष्ट करताना साताऱ्याचीच निवड करतात. चुकीचे आणि अन्यायकारक होत असेलतर त्या विरोधात आवाज उठविण्याचे उत्तम ठिकाण म्हणूनही ते साताऱ्याकडेच पाहतात. त्यामुळे शुक्रवारी पवार हे साताऱ्यात येत असून यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीचेच रणशिंग फुंकण्याचे संकेत मिळत आहेत.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा सातारा. आजही राज्याचे राजकारण करताना यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा सांगितला जातो. याच पध्दतीने चव्हाण यांचे मानसपूत्र म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही सातारा जिल्ह्यावर नितांत प्रेम. तसेच सातारा जिल्हाही प्रत्येकवेळी पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तर कऱ्हाड आणि सातारा मतदारसंघाचे खासदार शरद पवार गटाचे होते. त्याचबरोबर त्याचवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत आठ आमदार राष्ट्रवादीचे निवडूण आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून साताऱ्याकडे पाहिले जाते.सातारा जिल्ह्याचे सुपूत्र यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन २५ नोव्हेंबरला असतो. त्यामुळे दरवर्षी शरद पवार हे न चुकता कऱ्हाडला प्रीतिसंगमवर जाऊन चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करतात. तसेच नवीन गोष्टी करायच्या असतील तर पवार हे साताऱ्याची निवड करतात हे वारंवर समोर आलेले आहे. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये उभी पडल्यानंतर शरद पवार यांनी जराही विचलीत न होता दुसऱ्या दिवशीच कऱ्हाड गाठले. त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आशीर्वाद घेऊन एल्गार पुकारला होता. त्यावेळी कऱ्हाडमधील छोटेखानी सभेत सत्ताधाऱ्यांना रोखठोक इशाराही दिलेला. त्याचवेळी पवार यांनी सातारचे वैशिष्ट दाखवून दिले. तर त्यानंतर सातारच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन साताऱ्याचा महिमाही सांगितला.

सातारचं वैशिष्टच असं की चुकीचं, अन्यायकारक आणि अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवायचा असलातर त्यासाठी उत्तम ठिकाण सातारा’ असे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे सातारचे महत्व अधोरिखत होते. याचमुळे लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर पवार शुक्रवारी साताऱ्यात येऊन नवीन घोषणा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.पावसात भिजलेल्या सभेने इतिहास घडवला..२०१९ मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळी सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा खासदार झाले. पण, त्यानंतर काही महिन्यातच त्यांनी खासदारीकीचा राजीनामा दिला. त्यामुळे विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या प्रचारासाठी शरद पवार यांची जिल्हा परिषद मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत सभा झाली. पवार बोलण्यास उभे राहिल्यानंतर पाऊस सुरू झाला. तरीही त्यांनी भिजतच भाषण सुरू ठेवले. त्यामुळे सर्वत्र वेगळाचा संदेश गेला आणि पावसाच्या सभेने राज्यात इतिहास घडविला. याची नोंदही सातारा जिल्ह्याने करुन ठेवली आहे.

प्रीतिसंगमावरुन एल्गार; तुमचा बेंदूर, आमची गुरूपाैर्णिमा..

राष्ट्रवादीत २ जुलै २०२३ फूट पडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच शरद पवार कऱ्हाड येथे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी आले. यावेळी वयाच्या ८३ वर्षी त्यांनी पुन्हा दंड थोपटले. प्रीतिसंगमवरच सभा घेऊन एल्गार पुकारला. त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण हे तुमचे, आमचे सर्वांचे गुरू आहेत. महाराष्ट्रात जनमत तयार करण्याचे काम करायचे आहे. यशवंतराव चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊनच करत आहे. यासाठी त्यांना वंदन केले, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याच दिवशी योगायोगाने बेंदूर सण होता. त्यामुळे त्यांनी तुमचा बेंदूर असलातरी आमची गुरूपाैर्णिमा आहे, असे भावनिक आवाहनही केले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारlok sabhaलोकसभा