‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवारच राहणार पतंगराव कदम : पत्रकबाजी नवीन नाही
By Admin | Updated: May 8, 2014 23:53 IST2014-05-08T23:53:48+5:302014-05-08T23:53:48+5:30
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारच राहतील, अशी माहिती वन, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवारच राहणार पतंगराव कदम : पत्रकबाजी नवीन नाही
‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवारच राहणार पतंगराव कदम : पत्रकबाजी नवीन नाही सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारच राहतील, अशी माहिती वन, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, ‘रयत’च्या विरोधात पत्रके काढणे, टीकाटिप्पणी करणे हे ‘रयत’साठी नवीन राहिलेले नाही. तुम्हाला हवे असतील तर ‘रयत’विरोधात संस्थेकडे निनावी आलेली पत्रेही आम्ही तुम्हाला देतो, अशी टिप्पणीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन, सचिव आणि व्यवस्थापन परिषदेची त्रैवार्षिक निवड उद्या (शुक्रवार) होणार आहे. तत्पूर्वी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘रयत’मधील प्रमुख पदाधिकार्यांशी शासकीय विश्रामगृहावर चर्चा केली. या बैठकीत पदाधिकारी वगळता कोणासही प्रवेश नव्हता. बैठक संपल्यानंतर शरद पवार निघून गेले. त्यानंतर थोड्याच वेळात डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कदम म्हणाले, कोणी काहीही म्हणत असले तरी ‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम राहतील. ‘रयत’विरोधात होणारी टीकाटिप्पणी आमच्यासाठी नवीन नाही. पदाधिकार्यांच्या निवडी झालेल्या आहेत. त्यांची घोषणा होण्याची औपचारिकता केवळ बाकी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केल्यानंतर निवडीची तुम्हाला माहिती दिली जाईल. ‘रयत’च्या चेअरमनपदी कर्मवीरांच्या वारसांना संधी द्यावी, असा एक मतप्रवाह पुढे आला आहे. त्यावर त्यांना प्रतिक्रिया विचारली असता, काम करणार्या माणसाला ‘रयत’मध्ये नेहमीच संधी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)