शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

ना वारकरी बिघडतील, ना धारकरी, सरकारच्या वाईन विक्री धोरणाला शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 17:15 IST

विरोधी पक्षांचा वाईनला विरोध हा राजकीय स्वरूपाचा

सातारा : महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट, मॉल, किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वच स्तरातून तीव्र विरोध होत आहे. मात्र शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. इतकच नाही तर सरकारच्या या निर्णयाला खंबीर पाठिंबा देखील दिला आहे.द्राक्ष उत्पादकांवर कर्जाचा जास्त बोजा आहे. त्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. वाईनवरील बंधने हटवल्याने शेतकऱ्यांची अगतिकता संपेल. प्रक्रियेसाठी द्राक्षे वापरली गेली तर ती जास्त काळ टिकतील. आत्ताच्या थेट वापर बाजारात पुरवठा कमी झाल्याने भाव वधारतील, अशी शक्यता आहे. तसेच आता खराब द्राक्षे फ़ेकून द्यावी लागतात. त्यांनाही किंमत मिळेल. नुकसान कमी होईल. धान्यापासून दारू करू लागल्यापासून हे सिद्ध झाले आहे.मद्यराष्ट्र होईल ही भीती नसून संधी वाईनला अशाप्रकारे परवानगी दिल्याने रोजगार संधी वाढतील. जनतेला आरक्षणाची गरज नसून शेती किफायतशीर बनवणारी धोरणे गरजेची आहेत. तसेच महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होईल ही भीती खरी नसून ती संधी आहे. महाराष्ट्र मद्य उत्पादक राज्य म्हणून अव्वल बनल्यास शेतमालाचे भाव वाढण्याबरोबर रोजगार, वाहतूक, पॅकिंग, शीतगृह, बाजारपेठ, पर्यटन, मशिनरी व्यवसाय, व्यापार व अनुषंगिक बाबीत उलाढाल वाढेल शिवाय सरकारला कर मिळेल.काजू, करवंदे, जांभूळच्या वाईनने अर्थकारण सुधारेलइतकेच नाही तर डोंगराळ भागातील तरुण पुण्या-मुंबईला रोजगारासाठी जातात. त्यांचे शेतातील काजू, करवंदे, जांभूळच्या वाईनने अर्थकारण सुधारेल. विरोधी पक्षांचा वाईनला विरोध हा राजकीय स्वरूपाचा आहे. शेतकरी मेला तरी चालेल या वृत्तीचा आहे. विरोध करताना ते मद्यराष्ट्र असा घोषणा लावतात, ही दिशाभूल आहे.

'ते' अगोदर बिघडलेलेच मुळात वाईनच्या परवानगीमुळे चंगीभंगी वारकरी धारकरी तेव्हढे बिघडतील. ते अगोदर बिघडलेलेच आहेत. तसे सारे बिघडणार नाहीत. जगात मद्य पिणाऱ्या अनेकांनी नवनवीन शोध लाऊन मानवाचे कल्याण केले आहे. अनेकांनी उत्तम साहित्य निर्मिती केली आहे, असेही शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या देशात सरकारने मद्य घेणाऱ्या अनेकांना पद्मश्रीपासून भारतरत्नपर्यंतचे पुरस्कार दिले आहेत. मद्यपान करणारे अनेक पुढारी, मंत्री, नेते, प्रशासकीय अधिकारी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे वाईनचा बाऊ करू नये. आताही वाईन विक्रीबाबत काही बंधने ठेवली आहेत ती काढून टाकावीत. अन्यथा वाईनच्या समर्थनार्थ श. जोशी प्रणित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. - बाळासाहेब चव्हाण, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी