शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

Satara: कऱ्हाड तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर, २७ गावांना टंचाईच्या झळा !

By संजय पाटील | Updated: May 9, 2025 13:50 IST

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई आराखडा तयार

संजय पाटीलकऱ्हाड : तालुक्याच्या पूर्व आणि दक्षिण विभागातील एकूण २७ गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न लक्षात घेता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे.कऱ्हाड तालुक्यात भौगोलिक असमतोल जाणवतो. कृष्णा, कोयना या बारमाही वाहणाऱ्या नद्यांसह वांग, उत्तरमांड, दक्षिण मांड, तारळी या उपनद्या तालुक्यातून वाहत असतानाही पूर्व आणि दक्षिणेतील काही गावांना मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्याही २७ गावांमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला असून, त्यानुसार विहीर अधिग्रहण करण्यासह टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.पिण्याच्या पाण्याबरोबरच काही गावांमध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. मध्यंतरी दोनवेळा वळीव पाऊस जोरदार कोसळल्याने तलावांसह विहिरीत काही प्रमाणात पाणी साचले होता. त्याचा पिकांना मोठा आधार मिळाला. मात्र, हे पाणी मेअखेरपर्यंत पुरणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात चांगला पाऊस न झाल्यास पिकांचीही होरपळ होणार आहे.

पाणी टंचाई भासणारी गावेकांबीरवाडी, वनवासमाची-खोडशी, अंतवडी, मांगवाडी, नाणेगाव, गोडवाडी, अंधारवाडी, संजयनगर-शेरे, पाल, भगतवाडी, मरळी, कोरिवळे, महारूगडेवाडी, काले-चपनेमळा, ओंडोशी, शेरे-थोरातमळा, कासारशिरंबे, रिसवड, गायकवाडवाडी, घोलपवाडी, नांदलापूर, चोरे, साखरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, बामणवाडी, वानरवाडी, गायकवाडवाडी, रिसवड, घोलपवाडी.

‘या’ गावांना टँकरने पाणीकाही गावांना पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आराखड्यानुसार घोलपवाडी, नांदलापूर, चोरे, साखरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, बामणवाडी, वानरवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.

कऱ्हाड तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, आवश्यक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ज्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे त्याठिकाणी तातडीने कामे सुरू होतील. टँकरची मागणी आल्यास तेथे टँकर सुरू केला जाईल. - आर. बी. साठे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडWaterपाणी