शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

सातारच्या एकुलत्या एक सिग्लनचे सतराशे साठ नियम.. पोलिसांनाच हवे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 11:12 IST

सातारा शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचानक वाहने सोडल्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. या ठिकाणी प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसातारकरांचे पोलिस अधीक्षकांना साकडे जीवावर बेतण्यापूर्वी उपाययोजना करण्याची माणगी

सातारा : शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचानक वाहने सोडल्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. या ठिकाणी प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.सातारा शहरात चार ते पाच ठिकाणी सिंग्नल यंत्रणा असली तरी केवळ पोवई नाक्यावरील सिग्नल सध्या सुरू आहे. या सिग्नलला तब्बल सात रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे वाहनांच्या रहदारीचे प्रमाणही जास्त आहे. या सिग्नलवर अलीकडे छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये वाहन चालकांचे जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

वाहतूक समादेशक मधुकर शेंबडे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या सिग्नलवर कशामुळे अपघात होत आहेत, याचे निरीक्षण केले. त्यावेळी अनेक त्रुटी समोर आल्या. वाहन चालकही अपघाताला जबाबदार असल्याचे दिसून आले. सिग्नल सुटण्यापूर्वीच काही वाहनधारक घाई करून सुसाट वाहने घेऊन जात आहेत. मात्र, या ठिकाणी असलेल्या हवालदाराने हाताने पुढे जाण्याचा इशारा करणे गरजेचे असते. मात्र, पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते.

येथील पोलिस केवळ पावती फाडण्यामध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळीत करण्यामध्ये कोणालाही रस नाही. केवळ सिग्नलवर असलेल्या सेकंदावरच पोलिस अवलंबून राहत आहेत. काही पोलिस कर्मचारी सिग्नल संपण्यापूर्वी १५ सेकंद अगोदर तर काही कर्मचारी २० सेकंद अगोदर वाहतूक पुढे जाऊ देण्याचा हाताने इशारा करत आहेत. त्यावेळी विशेष म्हणजे सिग्नल सुरू असतो.पोलिसच जर वाहतुकीचे नियम मोडत असतील तर नागरिकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

हिरवे दिवे लागेपर्यंत पादचारी रस्ता ओलांडत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. हिरवा दिवा लागल्यानंतरच थांबलेली वाहतूक सोडण्यात यावी. अशी मागणीही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. 

शासन, जनता, चालक, पादचारी यांच्या हितार्थ व सुरक्षिततेसाठी सिग्नलवरील नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे.-मधुकर शेंबडे (वाहतूक समादेशक)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtraffic policeवाहतूक पोलीस