शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नायगावला महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:31 IST

खंडाळा : ‘फुले दाम्पत्यांचा आदर्श आचरणात आणणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी केलेले काम आणि विचार आज प्रेरणादायी आहेत. विशेषत: सावित्रीबार्इंची प्रेरणा जागृत ठेवण्यासाठी नायगाव येथे महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभे करण्यात यावे.’ असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.आद्यस्त्री समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई ...

खंडाळा : ‘फुले दाम्पत्यांचा आदर्श आचरणात आणणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी केलेले काम आणि विचार आज प्रेरणादायी आहेत. विशेषत: सावित्रीबार्इंची प्रेरणा जागृत ठेवण्यासाठी नायगाव येथे महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभे करण्यात यावे.’ असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.आद्यस्त्री समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व भारतीय स्त्री मुक्ती दिन नायगाव येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, आमदार पंकज भुजबळ, आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश टिळेकर, आ. मनीषा चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार कमल ढोले-पाटील यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.प्रा. राम शिंदे म्हणाले, ‘फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी शासनाने केंद्र्राकडेप्रस्ताव पाठविला आहे. वास्तविक फुले दाम्पत्यांच्या नावामुळे पुरस्काराची उंची वाढणार आहे. ओबीसीच्या स्वतंत्र मंत्रालयासाठी येत्या वर्षात भरीव निधी उपलब्ध होईल. नायगावसह खंडाळा तालुक्याचा विकास करण्यासाठीनदी पुनर्जीवन योजनेतून मागेलतेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल.’आ. मकरंद पाटील म्हणाले, ‘नायगाव माझ्या मतदारसंघात आहे. यासारखे परमभाग्य दुसरं नाही. नायगावच्या १८ कोटींच्या विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.’यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास मान्यवरांनी अभिवादन केले. जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबार्इंच्या प्रतिमेची गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारीश्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, कृष्णकांत कुदळे, बापूसाहेबभुजबळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, शिक्षण सभापतीराजेश पवार, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, सभापतीमकरंद मोटे, जिल्हा परिषदसदस्य दीपाली साळुंखे, उदय कबुले, सरपंच निखील झगडे यांच्यासह नागरिकम मोठ्या संख्येने उपस्थित होते.सावित्रीबार्इंनी प्रतिष्ठा मिळवून दिलीमंत्री राम शिंदे म्हणाले, ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजकंटकांचा विरोध झुगारून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे महिला विविध क्षेत्रांत आज पुढे आहेत. त्यांचा हाच वसा पुढे नेण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगावला उच्च शिक्षणाचे केंद्र बनवू,’पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ‘सावित्रीबार्इंनी महिलांना प्रतिष्ठा मिळवून दिली. आजच्या समाजाने महिलांना सन्मानाने वागवले पाहिजे. नवसमाज निर्मितीसाठी गावागावातील वाईट प्रवृत्तींना महिलांनीच मूठमाती दिली पाहिजे. सावित्रीबार्इंच्या कामाचा वसा जोपासण्यासाठी नायगाव येथे विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांसाठी शासकीय समाजकेंद्र उभारावे.’