शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नायगावला महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:31 IST

खंडाळा : ‘फुले दाम्पत्यांचा आदर्श आचरणात आणणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी केलेले काम आणि विचार आज प्रेरणादायी आहेत. विशेषत: सावित्रीबार्इंची प्रेरणा जागृत ठेवण्यासाठी नायगाव येथे महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभे करण्यात यावे.’ असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.आद्यस्त्री समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई ...

खंडाळा : ‘फुले दाम्पत्यांचा आदर्श आचरणात आणणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी केलेले काम आणि विचार आज प्रेरणादायी आहेत. विशेषत: सावित्रीबार्इंची प्रेरणा जागृत ठेवण्यासाठी नायगाव येथे महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभे करण्यात यावे.’ असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.आद्यस्त्री समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व भारतीय स्त्री मुक्ती दिन नायगाव येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, आमदार पंकज भुजबळ, आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश टिळेकर, आ. मनीषा चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार कमल ढोले-पाटील यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.प्रा. राम शिंदे म्हणाले, ‘फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी शासनाने केंद्र्राकडेप्रस्ताव पाठविला आहे. वास्तविक फुले दाम्पत्यांच्या नावामुळे पुरस्काराची उंची वाढणार आहे. ओबीसीच्या स्वतंत्र मंत्रालयासाठी येत्या वर्षात भरीव निधी उपलब्ध होईल. नायगावसह खंडाळा तालुक्याचा विकास करण्यासाठीनदी पुनर्जीवन योजनेतून मागेलतेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल.’आ. मकरंद पाटील म्हणाले, ‘नायगाव माझ्या मतदारसंघात आहे. यासारखे परमभाग्य दुसरं नाही. नायगावच्या १८ कोटींच्या विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.’यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास मान्यवरांनी अभिवादन केले. जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबार्इंच्या प्रतिमेची गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारीश्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, कृष्णकांत कुदळे, बापूसाहेबभुजबळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, शिक्षण सभापतीराजेश पवार, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, सभापतीमकरंद मोटे, जिल्हा परिषदसदस्य दीपाली साळुंखे, उदय कबुले, सरपंच निखील झगडे यांच्यासह नागरिकम मोठ्या संख्येने उपस्थित होते.सावित्रीबार्इंनी प्रतिष्ठा मिळवून दिलीमंत्री राम शिंदे म्हणाले, ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजकंटकांचा विरोध झुगारून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे महिला विविध क्षेत्रांत आज पुढे आहेत. त्यांचा हाच वसा पुढे नेण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगावला उच्च शिक्षणाचे केंद्र बनवू,’पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ‘सावित्रीबार्इंनी महिलांना प्रतिष्ठा मिळवून दिली. आजच्या समाजाने महिलांना सन्मानाने वागवले पाहिजे. नवसमाज निर्मितीसाठी गावागावातील वाईट प्रवृत्तींना महिलांनीच मूठमाती दिली पाहिजे. सावित्रीबार्इंच्या कामाचा वसा जोपासण्यासाठी नायगाव येथे विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांसाठी शासकीय समाजकेंद्र उभारावे.’