शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणी साचल्याने बियाणे कुजले.. दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST

ढेबेवाडी : ढेबेवाडी परिसरात आठ दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शासकीय मालमत्तेसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. खरिपाची पेरणी केलेल्या ...

ढेबेवाडी : ढेबेवाडी परिसरात आठ दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शासकीय मालमत्तेसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. खरिपाची पेरणी केलेल्या शेतातच पावसाचे पाणी साचल्याने पेरणी केलेले बियाणे कुजल्याने आता शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पाटण तालुक्यात कोसळणाऱ्या पावसाने डोंगरपठारावरील वाड्यावस्त्या आणि बहुतेक गावे संपर्कहीन झाले. अनेक गावांना जोडणारे रस्ते, फरशीपूल आणि साकव यांचे मोठे नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या विभागात हजारो हेक्टर खरीप क्षेत्र आहे. नुकत्याच येथील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली होती. काही ठिकाणी पेरणीची धांदल चालूच होती. त्याचदरम्यान या विभागात पावसाने थैमान घातले. पावसाचा जोर सातत्याने पाच दिवस सुरूच राहिल्याने पेरणी केलेल्या शेतात पाणी साचल्याने तळीच्या तळी निर्माण झाली आहेत. परिणामी पेरणी केलेले बियाणे सातत्याने पाण्याखाली राहिल्याने कुजून गेले आहे. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून दुबार पेरणीचे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

पंचनामे पारदर्शक व्हावे..

नुकसान झालेल्या मालमत्तांसह शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने दिले. मात्र, संबंधित यंत्रणेकडून शेतावर जाऊन पंचनामे केले जातात का? की शासकीय कार्यालयातूनच वरिष्ठांना माहिती दिली जाते यावरही वरिष्ठांकडून अंकुश असायला हवा. त्याचबरोबर पंचनामेही पारदर्शक व्हायला हवे, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.