शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कृषी विभागाकडून बीज साक्षरता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:38 AM

औंध : दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी मंडल कृषी विभागाने बियाणे उगवण क्षमता चाचणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बीज साक्षर करण्याची मोहीम ...

औंध : दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी मंडल कृषी विभागाने बियाणे उगवण क्षमता चाचणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बीज साक्षर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अनेकदा शेतकरी घरातील बियाणे पेरत असतात; मात्र ते बियाणे व्यवस्थित उगवले नाही तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहून आर्थिक नुकसान होते. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागू नये यासाठी खटाव कृषी विभागाच्या वतीने सध्या बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. औंध मंडल विभागातील कार्यक्षेत्रात मंडल कृषी अधिकारी अक्षय सावंत, पर्यवेक्षक मोहन मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक उत्तमराव तिकुटे, आर. एस. ठोंबरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. यामध्ये शेतकऱ्यांनी जर बियाणे जास्त उन्हात वाळवले तसेच बियाणाची साठवण करताना थप्पी लावली तर दाब पडल्याने तळाच्या पोत्यातील बियांचा डोळा खराब होतो. याशिवाय जास्त क्षमतेच्या मशीनने गाळप केले तरी बियाणाची उगवण क्षमता कमी होते. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दाखविलेल्या चाचणीचे प्रात्यक्षिक करून आपल्या घरातील बियाणाची चाचणी करावी, असे आवाहन कृषी साहाय्यक उत्तमराव तिकुटे यांनी केले आहे.

या वेळी बापूसाहेब वाघ, विष्णू वाघ, गणेश बोटे, शशिकांत जाधव, सचिन जाधव, अधिक जाधव, तुळसीदास जाधव, अतुल जाधव, महेश जाधव, तात्यासाहेब जाधव, दिलीप जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

(कोट)

बियाणे व्यवस्थित उगवले नाही तर दुबार पेरणीमुळे पेरणी मशागतीचा खर्च नाहक सोसावा लागतो. परंतु शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता चाचणी समजल्यामुळे बियाणाची खात्री करून घेता येईल. यामुळे दुबार पेरणी करावी लागणार नाही. शेतकऱ्यांना ही पद्धत फायदेशीर ठरेल.

- अक्षय सावंत, मंडल कृषी अधिकारी

फोटो : १२ औंध

औंध येथे शेतकऱ्यांना बीज उगवण प्रात्यक्षिक दाखविताना कृषी साहाय्यक उत्तमराव तिकुटे, आर. एस. ठोंबरे उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)