शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

प्रतापगडच्या पायथ्याशी आज जागा पाहणार

By admin | Updated: December 16, 2014 00:03 IST

समिती सदस्यांची पाहणी : वाडा कुंभरोशीतील जागा निश्चित होण्याची शक्यता --‘जीवा’ची बाजी... पण स्मारक कधी?

जगदीश कोष्टी - सातारा -: जीवा महाले स्मारक हे दहा वर्षांपूर्वीच मंजूर झाले आहे. त्यासाठी प्रतापगडावरील जागा दोन वेळा सुचविली गेली; परंतु ही जागा वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने परवानगीप्रक्रिया खूप किचकट असल्याने शेवटी जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली आहे. तिची अशासकीय सदस्य मंगळवारी पाहणी करणार आहेत.प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाच्या वधाच्या वेळी शिवरायांवरील वार हातावर झेलत सय्यद बंडाचा खातमा करणारे वीर जीवा महाले हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहेत. पुढच्या पिढीला त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी वीर जीवा महाले यांचे स्मारक प्रतापगडावर व्हावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी २००४ मध्येच स्मारक मंजूर केले होते. त्यानंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी दोन कोटी ७५ हजारांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, स्मारक काही तयार झाले नाही. स्मारकाच्या मागणीसाठी जीवा सेनाच्या नेतृत्त्वाखाली अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. स्मारकासाठी प्रथम प्रतापगडावर शिवरायांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला, तर त्यानंतर आॅक्टोबर २०१३ मध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या पश्चिम दिशेला दुसरी जागा सुचविली गेली होती. तरीही स्मारकाचा प्रश्न काही सुटला नाही. प्रतागडावरील जागा ही वनखात्याच्या हद्दीत येते, त्यामुळे तेथे स्मारक बांधताना नागपूरहून परवानगी घ्यावी लागते. हा प्रस्ताव मंजुरीसाठी नागपूरहून दिल्ली व्हाया भोपाळ पाठवावा लागतो. यासाठी किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली गेली आहे. नवा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी एक जागा पसंत केली होती. मात्र, पुढे काय झाले याची कल्पना नाही.- धोडिंबा जाधव, अशासकीय सदस्य,वीर जीवा महाले स्मारक समितीआठ वर्षांनंतर पहिलीच बैठकजीवा महालेंचे स्मारक प्रशासकीय अन् लोकप्रतिनिधींच्या अनास्थेत कायम सापडले आहे. जीवा महाले स्मारक समितीची स्थापना ३ आॅगस्ट २००५ रोजी झाली. या समितीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री असतात. त्यावेळी समितीच्या अध्यक्षस्थानी रामराजे नाईक-निंबाळकर होते. मात्र, समितीच्या स्थापनेनंतर आठ वर्षे बैठकच झाली नाही. माजी मंत्री शशिकांत शिंदे पालकमंत्री झाल्यानंतर पहिली बैठक १८ आॅक्टोबर २०१३ रोजी झाली, असा आरोप जीवा सेनेचे अध्यक्ष नंदकुमार खरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.स्मारकासाठी निधी व आराखडा तयार आहे. त्यामुळे स्मारक लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंगळवार, दि. १६ रोजी महाबळेश्वरला भेट देऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याशी चर्चा करणार आहे.- अशोक जाधव, अशासकीय सदस्य