शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगडच्या पायथ्याशी आज जागा पाहणार

By admin | Updated: December 16, 2014 00:03 IST

समिती सदस्यांची पाहणी : वाडा कुंभरोशीतील जागा निश्चित होण्याची शक्यता --‘जीवा’ची बाजी... पण स्मारक कधी?

जगदीश कोष्टी - सातारा -: जीवा महाले स्मारक हे दहा वर्षांपूर्वीच मंजूर झाले आहे. त्यासाठी प्रतापगडावरील जागा दोन वेळा सुचविली गेली; परंतु ही जागा वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने परवानगीप्रक्रिया खूप किचकट असल्याने शेवटी जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली आहे. तिची अशासकीय सदस्य मंगळवारी पाहणी करणार आहेत.प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाच्या वधाच्या वेळी शिवरायांवरील वार हातावर झेलत सय्यद बंडाचा खातमा करणारे वीर जीवा महाले हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहेत. पुढच्या पिढीला त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी वीर जीवा महाले यांचे स्मारक प्रतापगडावर व्हावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी २००४ मध्येच स्मारक मंजूर केले होते. त्यानंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी दोन कोटी ७५ हजारांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, स्मारक काही तयार झाले नाही. स्मारकाच्या मागणीसाठी जीवा सेनाच्या नेतृत्त्वाखाली अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. स्मारकासाठी प्रथम प्रतापगडावर शिवरायांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला, तर त्यानंतर आॅक्टोबर २०१३ मध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या पश्चिम दिशेला दुसरी जागा सुचविली गेली होती. तरीही स्मारकाचा प्रश्न काही सुटला नाही. प्रतागडावरील जागा ही वनखात्याच्या हद्दीत येते, त्यामुळे तेथे स्मारक बांधताना नागपूरहून परवानगी घ्यावी लागते. हा प्रस्ताव मंजुरीसाठी नागपूरहून दिल्ली व्हाया भोपाळ पाठवावा लागतो. यासाठी किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली गेली आहे. नवा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी एक जागा पसंत केली होती. मात्र, पुढे काय झाले याची कल्पना नाही.- धोडिंबा जाधव, अशासकीय सदस्य,वीर जीवा महाले स्मारक समितीआठ वर्षांनंतर पहिलीच बैठकजीवा महालेंचे स्मारक प्रशासकीय अन् लोकप्रतिनिधींच्या अनास्थेत कायम सापडले आहे. जीवा महाले स्मारक समितीची स्थापना ३ आॅगस्ट २००५ रोजी झाली. या समितीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री असतात. त्यावेळी समितीच्या अध्यक्षस्थानी रामराजे नाईक-निंबाळकर होते. मात्र, समितीच्या स्थापनेनंतर आठ वर्षे बैठकच झाली नाही. माजी मंत्री शशिकांत शिंदे पालकमंत्री झाल्यानंतर पहिली बैठक १८ आॅक्टोबर २०१३ रोजी झाली, असा आरोप जीवा सेनेचे अध्यक्ष नंदकुमार खरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.स्मारकासाठी निधी व आराखडा तयार आहे. त्यामुळे स्मारक लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंगळवार, दि. १६ रोजी महाबळेश्वरला भेट देऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याशी चर्चा करणार आहे.- अशोक जाधव, अशासकीय सदस्य