शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

प्रतापगडच्या पायथ्याशी आज जागा पाहणार

By admin | Updated: December 16, 2014 00:03 IST

समिती सदस्यांची पाहणी : वाडा कुंभरोशीतील जागा निश्चित होण्याची शक्यता --‘जीवा’ची बाजी... पण स्मारक कधी?

जगदीश कोष्टी - सातारा -: जीवा महाले स्मारक हे दहा वर्षांपूर्वीच मंजूर झाले आहे. त्यासाठी प्रतापगडावरील जागा दोन वेळा सुचविली गेली; परंतु ही जागा वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने परवानगीप्रक्रिया खूप किचकट असल्याने शेवटी जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली आहे. तिची अशासकीय सदस्य मंगळवारी पाहणी करणार आहेत.प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाच्या वधाच्या वेळी शिवरायांवरील वार हातावर झेलत सय्यद बंडाचा खातमा करणारे वीर जीवा महाले हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहेत. पुढच्या पिढीला त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी वीर जीवा महाले यांचे स्मारक प्रतापगडावर व्हावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी २००४ मध्येच स्मारक मंजूर केले होते. त्यानंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी दोन कोटी ७५ हजारांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, स्मारक काही तयार झाले नाही. स्मारकाच्या मागणीसाठी जीवा सेनाच्या नेतृत्त्वाखाली अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. स्मारकासाठी प्रथम प्रतापगडावर शिवरायांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला, तर त्यानंतर आॅक्टोबर २०१३ मध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या पश्चिम दिशेला दुसरी जागा सुचविली गेली होती. तरीही स्मारकाचा प्रश्न काही सुटला नाही. प्रतागडावरील जागा ही वनखात्याच्या हद्दीत येते, त्यामुळे तेथे स्मारक बांधताना नागपूरहून परवानगी घ्यावी लागते. हा प्रस्ताव मंजुरीसाठी नागपूरहून दिल्ली व्हाया भोपाळ पाठवावा लागतो. यासाठी किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली गेली आहे. नवा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी एक जागा पसंत केली होती. मात्र, पुढे काय झाले याची कल्पना नाही.- धोडिंबा जाधव, अशासकीय सदस्य,वीर जीवा महाले स्मारक समितीआठ वर्षांनंतर पहिलीच बैठकजीवा महालेंचे स्मारक प्रशासकीय अन् लोकप्रतिनिधींच्या अनास्थेत कायम सापडले आहे. जीवा महाले स्मारक समितीची स्थापना ३ आॅगस्ट २००५ रोजी झाली. या समितीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री असतात. त्यावेळी समितीच्या अध्यक्षस्थानी रामराजे नाईक-निंबाळकर होते. मात्र, समितीच्या स्थापनेनंतर आठ वर्षे बैठकच झाली नाही. माजी मंत्री शशिकांत शिंदे पालकमंत्री झाल्यानंतर पहिली बैठक १८ आॅक्टोबर २०१३ रोजी झाली, असा आरोप जीवा सेनेचे अध्यक्ष नंदकुमार खरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.स्मारकासाठी निधी व आराखडा तयार आहे. त्यामुळे स्मारक लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंगळवार, दि. १६ रोजी महाबळेश्वरला भेट देऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याशी चर्चा करणार आहे.- अशोक जाधव, अशासकीय सदस्य