शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सातारा जिल्ह्यात थंडीचा दुसरा बळी-: घरी न परतल्याने शोध, आंबेघर फाट्याजवळ मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:23 IST

जावळी तालुक्यातील विवर येथे राहणाऱ्या एका वृद्धाचा थंडीने गारठून मृत्यू झाला. शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी

ठळक मुद्देकरहर येथील वृद्धाचा मृत्यू

पाचगणी : जावळी तालुक्यातील विवर येथे राहणाऱ्या एका वृद्धाचा थंडीने गारठून मृत्यू झाला. शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री आंबेघर फाटा येथे घडली असून, जिल्ह्यात थंडीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोनवर गेली आहे.

याबाबत करहर दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, विवर (ता. जावळी) येथे राहणारे शामराव गोळे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधा-शोध सुरू केली. मात्र, ते कोठेही आढळून आले नाही. दरम्यान, पाचवड-पाचगणी मार्गावर असलेल्या आंबेघर फाटा बसस्टॉपजवळ त्यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच करहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मेढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मद्यप्राशन केल्याने व थंडीने गारठल्याने शामराव गोळे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नववर्षाच्या प्रारंभीच शामराव गोळे यांचा मृत्यू झाल्याने गोळे कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.

या घटनेची फिर्याद महादेव गोळे यांनी करहर पोलीस दूरक्षेत्रात दिली असून, अधिक तपास ठाणे अंमलदार डी. जी. शिंदे करीत आहेत. म्हसवड येथील शेतकरी महादेव केवटे यांचाही काही दिवसांपूर्वी थंडीने गारठून मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात थंडीमुळे गेलेल्या बळींची संख्या दोनवर गेली आहे.साताºयाचा पारा ९.४ अंशांवरशेकोट्या पेटल्या : किमान तापमान खालावल्याने गारठा कायमसातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका असून, गेल्या तीन दिवसांपासून तर किमान तापमान ९.४ अंशांवर कायम स्थिर आहे. सततच्या या थंडीमुळे ग्रामीण भागातील गावोगावी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा थंडीला लवकर सुरुवात झाली. दिवाळीच्या सणापासूनच थंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर हळूहळू थंडीत वाढ होऊन १५ नोव्हेंबरच्या सुमारास यावर्षी प्रथमच साताºयातील किमान तापमान १३.४ अंशापर्यंत खाली आले होते. तर ११ डिसेंबरला किमान तापमान कमी होऊन ९.५ अंश नोंदले गेले. यामुळे एकदमच थंडीची लाट निर्माण झाली. तर यावर्षीचे आतापर्यंतच सर्वात कमी तापमान ९ अंश नोंदले गेले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरून येत आहे. थंडीची तीव्रता असून, थंड वारेही वाहत आहेत. यामुळे वातावरणात एकप्रकारची थंड लहर जाणवत आहे.

शनिवारी तर किमान तापमान ९.१ अंशावर होते. तर रविवारी ९.४ होते. सोमवार आणि मंगळवारीही साताºयात किमान तापमान ९.४ अंश नोंदले गेले. सतत तापमान १० अंशाच्या आसपास राहिल्याने गारठा वाढला आहे. यामुळे शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. लोकांना उबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, अशी स्थिती आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू