शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सातारा जिल्ह्यात थंडीचा दुसरा बळी-: घरी न परतल्याने शोध, आंबेघर फाट्याजवळ मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:23 IST

जावळी तालुक्यातील विवर येथे राहणाऱ्या एका वृद्धाचा थंडीने गारठून मृत्यू झाला. शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी

ठळक मुद्देकरहर येथील वृद्धाचा मृत्यू

पाचगणी : जावळी तालुक्यातील विवर येथे राहणाऱ्या एका वृद्धाचा थंडीने गारठून मृत्यू झाला. शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री आंबेघर फाटा येथे घडली असून, जिल्ह्यात थंडीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोनवर गेली आहे.

याबाबत करहर दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, विवर (ता. जावळी) येथे राहणारे शामराव गोळे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधा-शोध सुरू केली. मात्र, ते कोठेही आढळून आले नाही. दरम्यान, पाचवड-पाचगणी मार्गावर असलेल्या आंबेघर फाटा बसस्टॉपजवळ त्यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच करहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मेढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मद्यप्राशन केल्याने व थंडीने गारठल्याने शामराव गोळे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नववर्षाच्या प्रारंभीच शामराव गोळे यांचा मृत्यू झाल्याने गोळे कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.

या घटनेची फिर्याद महादेव गोळे यांनी करहर पोलीस दूरक्षेत्रात दिली असून, अधिक तपास ठाणे अंमलदार डी. जी. शिंदे करीत आहेत. म्हसवड येथील शेतकरी महादेव केवटे यांचाही काही दिवसांपूर्वी थंडीने गारठून मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात थंडीमुळे गेलेल्या बळींची संख्या दोनवर गेली आहे.साताºयाचा पारा ९.४ अंशांवरशेकोट्या पेटल्या : किमान तापमान खालावल्याने गारठा कायमसातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका असून, गेल्या तीन दिवसांपासून तर किमान तापमान ९.४ अंशांवर कायम स्थिर आहे. सततच्या या थंडीमुळे ग्रामीण भागातील गावोगावी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा थंडीला लवकर सुरुवात झाली. दिवाळीच्या सणापासूनच थंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर हळूहळू थंडीत वाढ होऊन १५ नोव्हेंबरच्या सुमारास यावर्षी प्रथमच साताºयातील किमान तापमान १३.४ अंशापर्यंत खाली आले होते. तर ११ डिसेंबरला किमान तापमान कमी होऊन ९.५ अंश नोंदले गेले. यामुळे एकदमच थंडीची लाट निर्माण झाली. तर यावर्षीचे आतापर्यंतच सर्वात कमी तापमान ९ अंश नोंदले गेले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरून येत आहे. थंडीची तीव्रता असून, थंड वारेही वाहत आहेत. यामुळे वातावरणात एकप्रकारची थंड लहर जाणवत आहे.

शनिवारी तर किमान तापमान ९.१ अंशावर होते. तर रविवारी ९.४ होते. सोमवार आणि मंगळवारीही साताºयात किमान तापमान ९.४ अंश नोंदले गेले. सतत तापमान १० अंशाच्या आसपास राहिल्याने गारठा वाढला आहे. यामुळे शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. लोकांना उबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, अशी स्थिती आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू