शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

उसाचा दुसरा हप्ता: २ ऑक्टोबरपर्यंत पैसे खात्यावर जमा न केल्यास..; ‘स्वाभिमानी’चा इशारा

By नितीन काळेल | Updated: September 27, 2023 19:26 IST

सातारा : दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा ...

सातारा : दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यांना निवेदन देण्यात आले. तसेच २ आंक्टोबरपर्यंत पैसे खात्यावर जमा न केल्यास कारखान्याची साखर अडवूण आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, १३ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरला साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये साखर सहसंचालकांकडे हजारो शेतकऱ्यांच्या वतीने गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना यामधून चांगल्या पध्दतीने नफा मिळालेला आहे. सध्याच्या वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बीबियाणे, किटकनाशकाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. आता तोंडावर दसरा आणि दिवाळी सण आला आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला पैसे नाहीत. यामुळे कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता ४०० रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. तसेच २०२१- २२ मधील जाहीर केलेल्या दरात कपात केली, तेही पृसे शेतकऱ्यांना द्यावेत. तर दुसरा हप्ता २ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास कारखान्याची साखर अडवून आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनभाऊ सांळुखे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, उपाध्यक्ष संजय जाधव, कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, राजू घाडगे, मोहन घाडगे, बाळासाहेब गोळे, विठ्ठल पवार, जोतिराम झांजुर्णे, महादेव डोंगरे, महेंद्र सांळुखे,जनार्दन आवारे आदी उपस्थित होते.

रॅली काढून या कारखान्यांना निवेदन...स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी पहिल्या टप्प्यामध्ये रॅलीने पहिल्यांदा शेंद्रेतील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, भुइंजच्या किसन वीर सहकारी साखर कारखाना, कोरेगाव तालुक्यातील चिमणगावच्या जरंडेश्वर शुगर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे. अशाचप्रकारे इतर साखार कारखान्यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना