शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील लोकशाही दिन बनला दीन-अकरा महिन्यांत अवघे पंधरा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 21:48 IST

सर्वसामान्य माणसाला शासकीय पातळीवर तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारने लोकशाही दिनाची संकल्पना कार्यन्वित केली; पण सातारा जिल्'ातील तक्रारीची नोंद घेऊन परस्पर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा,

ठळक मुद्देसामान्यांना दिलासा कसा मिळणार, हाच प्रश्न

सातारा : सर्वसामान्य माणसाला शासकीय पातळीवर तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारने लोकशाही दिनाची संकल्पना कार्यन्वित केली; पण सातारा जिल्'तील तक्रारीची नोंद घेऊन परस्पर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे पत्र पाठवून निपटारा केला जात आहे. त्यामुळे अकरा महिन्यांत अवघे पंधरा तक्रारी लोकशाही दिनात झाली, अशी दीन अवस्था पाहण्यास मिळत आहे.

गतिमान शासन, महाराष्ट्र शासन ‘सब का साथ, सब का विकास’ करून दाखवलं, अशी टॅगलाईन वापरून राज्य शासनाने कारभार रेटला आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांच्यावर आरोप करीत आहेत; पण सामान्य माणसाला लोकशाही दिनात न्याय मिळवून दिला जात नाही, पूर्वी महिन्याला तीन आकडी तक्रारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दाखल होत होत्या. चांगले शासकीय अधिकारी अशा प्रकारची तक्रार नोंदवली गेली तर त्याचा पाठपुरावा करून तक्रारदारास न्याय मिळवून दिला जात होता. संपूर्ण सातारा जिल्'ातील सामान्य माणूस लोकशाही दिनाचे महत्त्व जाणून होते.

गेली चार वर्षांत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी लवकर सुरू होणाºया लोकशाही दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन व स्वरूप पूर्ण बदलून गेले आहे. पूर्वी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत होते आणि स्वत: तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जावर शेरा मारून संबंधित खाते प्रमुखांकडे अर्ज पाठवत होते. अलीकडच्या काळात अधिकारीऐवजी लिपिक, शिपाई मंडळी अशा लोकशाही दिनात हजर राहू लागले आहेत. त्यांना कोणताही प्रशासकीय अधिकार नसल्याने अर्जाची गंभीर दखल घेतली जात नाही.

उलट, या अर्जाबाबत त्या त्या विभागाला आवश्यक सूचना केल्या आहेत. त्याठिकाणी संपर्क साधावा, असे कळवल्याने या कार्यालयाने आपल्या अर्जाचा निपटारा केला आहे, असे तक्रारदाराला लेखी कळविण्याचा लाल फितीचा नियमातील मार्ग अवलंबला आहे. याचा परिणाम म्हणून आता लोकशाही दिन साजरा करणे म्हणजे शासनाच्या गलथान कारभाराचा नमुना ठरला आहे. त्यामुळे सातारा जिल्'ातील काही ग्रामस्थ आता लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात धन्यता मानत आहेत. शासकीय सेवेत शासकीय कर्मचारीच भ्रष्ट कर्मचाºयांना यानिमित्त धडा शिकवू लागले आहेत.

पाच लोकशाही दिनात एकाही सातारा जिल्'ातील ग्रामस्थांनी तक्रार केली नाही, या लोकशाही दिनाच्या खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला पाहिजे, अशी मागणीही सातारा जिल्'ातील तक्रारदार व अर्जदार करू लागले आहेत. याबाबत सविस्तर माहिती शासकीय अधिकारी वर्गाकडून घेण्याचा प्रयत्न केला असता उपलब्ध होऊ शकली नाही. 

सातारा जिल्'ातील अकरा महिन्यांत लोकशाही दिनात पंधरा तक्रारी केल्या. त्यापैकी बारा तक्रारींचा निपटारा कसा केला? तीन तक्रारी का प्रलंबित ठेवण्यात आल्या? याचा खुलासा होणे गरजेचे आहे.- गणपतराव धनावडे, सामाजिक कार्यकर्ते

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीgovernment schemeसरकारी योजना