शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील लोकशाही दिन बनला दीन-अकरा महिन्यांत अवघे पंधरा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 21:48 IST

सर्वसामान्य माणसाला शासकीय पातळीवर तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारने लोकशाही दिनाची संकल्पना कार्यन्वित केली; पण सातारा जिल्'ातील तक्रारीची नोंद घेऊन परस्पर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा,

ठळक मुद्देसामान्यांना दिलासा कसा मिळणार, हाच प्रश्न

सातारा : सर्वसामान्य माणसाला शासकीय पातळीवर तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारने लोकशाही दिनाची संकल्पना कार्यन्वित केली; पण सातारा जिल्'तील तक्रारीची नोंद घेऊन परस्पर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे पत्र पाठवून निपटारा केला जात आहे. त्यामुळे अकरा महिन्यांत अवघे पंधरा तक्रारी लोकशाही दिनात झाली, अशी दीन अवस्था पाहण्यास मिळत आहे.

गतिमान शासन, महाराष्ट्र शासन ‘सब का साथ, सब का विकास’ करून दाखवलं, अशी टॅगलाईन वापरून राज्य शासनाने कारभार रेटला आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांच्यावर आरोप करीत आहेत; पण सामान्य माणसाला लोकशाही दिनात न्याय मिळवून दिला जात नाही, पूर्वी महिन्याला तीन आकडी तक्रारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दाखल होत होत्या. चांगले शासकीय अधिकारी अशा प्रकारची तक्रार नोंदवली गेली तर त्याचा पाठपुरावा करून तक्रारदारास न्याय मिळवून दिला जात होता. संपूर्ण सातारा जिल्'ातील सामान्य माणूस लोकशाही दिनाचे महत्त्व जाणून होते.

गेली चार वर्षांत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी लवकर सुरू होणाºया लोकशाही दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन व स्वरूप पूर्ण बदलून गेले आहे. पूर्वी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत होते आणि स्वत: तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जावर शेरा मारून संबंधित खाते प्रमुखांकडे अर्ज पाठवत होते. अलीकडच्या काळात अधिकारीऐवजी लिपिक, शिपाई मंडळी अशा लोकशाही दिनात हजर राहू लागले आहेत. त्यांना कोणताही प्रशासकीय अधिकार नसल्याने अर्जाची गंभीर दखल घेतली जात नाही.

उलट, या अर्जाबाबत त्या त्या विभागाला आवश्यक सूचना केल्या आहेत. त्याठिकाणी संपर्क साधावा, असे कळवल्याने या कार्यालयाने आपल्या अर्जाचा निपटारा केला आहे, असे तक्रारदाराला लेखी कळविण्याचा लाल फितीचा नियमातील मार्ग अवलंबला आहे. याचा परिणाम म्हणून आता लोकशाही दिन साजरा करणे म्हणजे शासनाच्या गलथान कारभाराचा नमुना ठरला आहे. त्यामुळे सातारा जिल्'ातील काही ग्रामस्थ आता लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात धन्यता मानत आहेत. शासकीय सेवेत शासकीय कर्मचारीच भ्रष्ट कर्मचाºयांना यानिमित्त धडा शिकवू लागले आहेत.

पाच लोकशाही दिनात एकाही सातारा जिल्'ातील ग्रामस्थांनी तक्रार केली नाही, या लोकशाही दिनाच्या खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला पाहिजे, अशी मागणीही सातारा जिल्'ातील तक्रारदार व अर्जदार करू लागले आहेत. याबाबत सविस्तर माहिती शासकीय अधिकारी वर्गाकडून घेण्याचा प्रयत्न केला असता उपलब्ध होऊ शकली नाही. 

सातारा जिल्'ातील अकरा महिन्यांत लोकशाही दिनात पंधरा तक्रारी केल्या. त्यापैकी बारा तक्रारींचा निपटारा कसा केला? तीन तक्रारी का प्रलंबित ठेवण्यात आल्या? याचा खुलासा होणे गरजेचे आहे.- गणपतराव धनावडे, सामाजिक कार्यकर्ते

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीgovernment schemeसरकारी योजना