शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातारा भाजी मंडईत पालेभाज्यांचा दर फळांच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:17 IST

पालेभाज्यांचा दर शंभराच्या घरात गेल्याने आठवडी बाजाराचा ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहकांनी फळांकडे पाठ फिरविली आहे. यामुळे बाजारात पुरेशी फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांचे दर कमी झाले आहेत. तर याउलट पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे बाजारात पालेभाज्यांचे दर फळांच्या मुळावर उठले असल्याचे फळ विक्रेत्यांमधून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देसातारा भाजी मंडईत भाज्यांचे दर गगनाला आठवड्याच्या ताळमेळासाठी फळांकडे दुर्लक्ष

सातारा : पालेभाज्यांचा दर शंभराच्या घरात गेल्याने आठवडी बाजाराचा ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहकांनी फळांकडे पाठ फिरविली आहे. यामुळे बाजारात पुरेशी फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांचे दर कमी झाले आहेत. तर याउलट पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे बाजारात पालेभाज्यांचे दर फळांच्या मुळावर उठले असल्याचे फळ विक्रेत्यांमधून सांगण्यात येत आहे.

आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पालेभाज्यांचे दर वाढत गेले असून, सध्या कांदा व टोमॅटोचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याचा परिणाम इतर पालेभाज्यावरही झाला आहे. यामध्ये वांगी, पावटा, गवारी, भेंडी यांचे दर शंभराच्या घरात पोहोचले आहे.

यामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या खरेदीसाठी फळांकडे पाठ फिरवावी लागली असल्याने फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांच्या दरात दिवसेंदिवस घसरण होऊ लागली आहे.

मागील आठवड्यापासून मार्गशीर्ष हा उपवासाचा महिना सुरू आहे. या महिन्यात फळांना चांगली मागणी असते, यामुळे बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणत झाली आहे. परंतु पालेभाज्याचा फटका फळ विक्रीवर बसला आहे.

गतवर्षी ५० रुपयांनी विकली जाणारी केळी यंदा १० ते २० रुपयांत मिळत आहे तर काश्मीरहून सफरचंदाची आवकही वाढली आहे. परंतु मागणी नसल्याने केवळ ६० ते ७० रुपये किलो विक्रीला जात असून, सफरचंदाची १५ किलोची पेटी सहाशे ते सातशे रुपये होलसेल दरात मिळत आहे. त्याचप्रमाणे इतर फळांच्याही दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे.केळी केवळ १० रुपयांतमार्गशीर्ष महिना सुरू होऊन आठवडा झाला आहे. याकाळात उपवासासाठी खास करून केळींना मोठी मागणी असते. यामुळे केळींचा दर भलताच वाढलेला असतो; मात्र यंदा मागणीअभावी केळींचे दर १० रुपये झाले आहे. केळी हा नाशवंत पदार्थ असल्याने मिळेल त्या किमतीत विक्रेते केळी विकत आहेत. 

भाजी मंडईत भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. कोणतीही भाजी घेतल्यास ३० रुपये पावकिलो दराने विक्री केली जात आहे. यामुळे शंभर रुपयांत पालेभाज्याबरोबरच फळे घेणे अशक्य झाले आहे.- जयश्री घाडगे,गृहिणी

टॅग्स :fruitsफळेMarketबाजार