शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सातारा भाजी मंडईत पालेभाज्यांचा दर फळांच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:17 IST

पालेभाज्यांचा दर शंभराच्या घरात गेल्याने आठवडी बाजाराचा ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहकांनी फळांकडे पाठ फिरविली आहे. यामुळे बाजारात पुरेशी फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांचे दर कमी झाले आहेत. तर याउलट पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे बाजारात पालेभाज्यांचे दर फळांच्या मुळावर उठले असल्याचे फळ विक्रेत्यांमधून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देसातारा भाजी मंडईत भाज्यांचे दर गगनाला आठवड्याच्या ताळमेळासाठी फळांकडे दुर्लक्ष

सातारा : पालेभाज्यांचा दर शंभराच्या घरात गेल्याने आठवडी बाजाराचा ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहकांनी फळांकडे पाठ फिरविली आहे. यामुळे बाजारात पुरेशी फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांचे दर कमी झाले आहेत. तर याउलट पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे बाजारात पालेभाज्यांचे दर फळांच्या मुळावर उठले असल्याचे फळ विक्रेत्यांमधून सांगण्यात येत आहे.

आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पालेभाज्यांचे दर वाढत गेले असून, सध्या कांदा व टोमॅटोचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याचा परिणाम इतर पालेभाज्यावरही झाला आहे. यामध्ये वांगी, पावटा, गवारी, भेंडी यांचे दर शंभराच्या घरात पोहोचले आहे.

यामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या खरेदीसाठी फळांकडे पाठ फिरवावी लागली असल्याने फळांची आवक असूनदेखील मागणी नसल्याने फळांच्या दरात दिवसेंदिवस घसरण होऊ लागली आहे.

मागील आठवड्यापासून मार्गशीर्ष हा उपवासाचा महिना सुरू आहे. या महिन्यात फळांना चांगली मागणी असते, यामुळे बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणत झाली आहे. परंतु पालेभाज्याचा फटका फळ विक्रीवर बसला आहे.

गतवर्षी ५० रुपयांनी विकली जाणारी केळी यंदा १० ते २० रुपयांत मिळत आहे तर काश्मीरहून सफरचंदाची आवकही वाढली आहे. परंतु मागणी नसल्याने केवळ ६० ते ७० रुपये किलो विक्रीला जात असून, सफरचंदाची १५ किलोची पेटी सहाशे ते सातशे रुपये होलसेल दरात मिळत आहे. त्याचप्रमाणे इतर फळांच्याही दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे.केळी केवळ १० रुपयांतमार्गशीर्ष महिना सुरू होऊन आठवडा झाला आहे. याकाळात उपवासासाठी खास करून केळींना मोठी मागणी असते. यामुळे केळींचा दर भलताच वाढलेला असतो; मात्र यंदा मागणीअभावी केळींचे दर १० रुपये झाले आहे. केळी हा नाशवंत पदार्थ असल्याने मिळेल त्या किमतीत विक्रेते केळी विकत आहेत. 

भाजी मंडईत भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. कोणतीही भाजी घेतल्यास ३० रुपये पावकिलो दराने विक्री केली जात आहे. यामुळे शंभर रुपयांत पालेभाज्याबरोबरच फळे घेणे अशक्य झाले आहे.- जयश्री घाडगे,गृहिणी

टॅग्स :fruitsफळेMarketबाजार