शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सातारा : तीन अपघातांत दोन ठार; बारा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 10:54 IST

आशियाई महामार्ग ४७ वरील खंडाळा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातांत दोन जण ठार तर बारा जण जखमी झाले आहेत. ठार झालेले दोघेही पादचारी आहेत.

ठळक मुद्देतीन अपघातांत दोन ठार; बारा जखमीअपघातांची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला

शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील खंडाळा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातांत दोन जण ठार तर बारा जण जखमी झाले आहेत. ठार झालेले दोघेही पादचारी आहेत.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईहून जावळी तालुक्यातील मेढा याठिकाणी निघालेली मिनी बस (एमएच ११ सीएच १६३४) ही पारगाव हद्दीमध्ये असणाऱ्या एका गॅरेजसमोर आली असता बसचालकाचे नियंत्रण सुटून महामार्गालगत उसाने भरलेल्या नंबर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकली.

ही धडक एवढी जोरदार होती की मिनी बसमधील तेवीसपैकी बारा प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

याबाबतची फिर्याद ज्ञानेश्वर अशोक धनावडे यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली आहे. त्याचप्रमाणे शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत केसुर्डी ता. खंडाळा गावच्या हद्दीत एका मंदिरासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत महामार्ग ओलांडणारे पाडळी, ता. खंडाळा येथील अरुण दादू वाघमारे (वय ५५) हे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाले.

शिरवळ हद्दीत एका कृषी मॉलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अज्ञात पुरुष जातीचे (वय ३५) हे डोक्यावरून चाक गेल्याने जागीच ठार झाले. या अपघातांची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून, शिरवळचे पोलीस हवालदार किशोर नलावडे, स्वप्नील दौंड तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर