शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

सातारा : चौरंगी लढतीचा उडाला बार!

By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST

महायुती तुटली / आघाडी फुटली : आयाराम-गयाराम पेचात; बंडखोरांना मात्र लागली लॉटरी

सातारा : शिवसेना-भारतीय जनता पक्षाचा अडीच दशकांचा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा दीड दशकांचा दोस्ताना तुटल्यामुळे संबंधित पक्षात नव्यानेच दाखल ‘आयाराम’ चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. गुरुवारच्या दिवसभरातील घडामोडीनंतर आात सातारा जिल्ह्यातही चौरंगी लढती होणार आहेत. ‘रिपांइ’चे अजूनही तळ्यात-मळ्यात आहे. आघाडी आणि महायुती तुटल्याने प्रत्येक मतदारसंघातील लढती रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सातारा विधानसभा मतदारसंघातून दगडू सकपाळ यांना लढण्यास सांगिलते आहे. भाजपकडून दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, सदाशिव सपकाळ, रवींद्र परामणे, दीपक पवार इच्छुक आहेत. ‘कऱ्हाड दक्षिण’मधून डॉ. अतुल भोसले भाजप तर संजय मोहिते शिवसेनेचे उमेदवार आहेत. कोरेगावातून शिवसेनेकडून हणमंत चवरे, दिनेश बर्गे यांच्यापैकी उमेदवार असणार आहे. भाजपकडून कांताताई नलावडे अथवा महेश शिंदे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. माण ‘रासप’कडे गेल्याने येथून शेखर गोरे उमेदवार आहेत. शिवसेनेकडून धनाजी सावंत अंतिम होण्याची शक्यता आहे. पाटणमधून शंभूराज देसाई यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तेच उमेदवार असतील. भाजपकडून दीपक महाडिक, कविता कचरे यांनी उमेदवारी मागितली आहे.‘कऱ्हाड उत्तर’मधून सेनेचे समीर जाधव उमेदवार असू शकतात. भाजपबरोबर असल्यामुळे हा मतदारसंंघ स्वाभिमानीकडे राहणार असून येथून मनोज घोरपडे उमेदवार आहेत. नाव चर्चेत आहे. फलटणमधून डॉ. चंद्रकांत तासगावकर उमेदवार असणार आहेत. भाजपकडे चेहराच नाही. परिणामी येथून ‘स्वाभिमानी’चे दिगंबर आगवणे यांनाच उमेदवार मिळणार आहे. युती तुटल्यामुळे वाईत माजी आमदार मदन भोसले यांची गोची झाली आहे. भाजपकडून पुरुषोत्तम जाधव यांचे नाव निश्चित आहे. सेनेकडून येथून डी. एम. बावळेकर अथवा जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे उमेदवार होऊ शकतात. (प्रतिनिधी)