सातारा : चौरंगी लढतीचा उडाला बार!
By Admin | Updated: September 25, 2014 23:27 IST2014-09-25T22:29:26+5:302014-09-25T23:27:55+5:30
महायुती तुटली / आघाडी फुटली : आयाराम-गयाराम पेचात; बंडखोरांना मात्र लागली लॉटरी

सातारा : चौरंगी लढतीचा उडाला बार!
सातारा : शिवसेना-भारतीय जनता पक्षाचा अडीच दशकांचा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा दीड दशकांचा दोस्ताना तुटल्यामुळे संबंधित पक्षात नव्यानेच दाखल ‘आयाराम’ चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. गुरुवारच्या दिवसभरातील घडामोडीनंतर आात सातारा जिल्ह्यातही चौरंगी लढती होणार आहेत. ‘रिपांइ’चे अजूनही तळ्यात-मळ्यात आहे. आघाडी आणि महायुती तुटल्याने प्रत्येक मतदारसंघातील लढती रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले
आहे.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सातारा विधानसभा मतदारसंघातून दगडू सकपाळ यांना लढण्यास सांगिलते आहे. भाजपकडून दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, सदाशिव सपकाळ, रवींद्र परामणे, दीपक पवार इच्छुक आहेत. ‘कऱ्हाड दक्षिण’मधून डॉ. अतुल भोसले भाजप तर संजय मोहिते शिवसेनेचे उमेदवार आहेत.
कोरेगावातून शिवसेनेकडून हणमंत चवरे, दिनेश बर्गे यांच्यापैकी उमेदवार असणार आहे. भाजपकडून कांताताई नलावडे अथवा महेश शिंदे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. माण ‘रासप’कडे गेल्याने येथून शेखर गोरे उमेदवार आहेत. शिवसेनेकडून धनाजी सावंत अंतिम होण्याची शक्यता आहे.
पाटणमधून शंभूराज देसाई यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तेच उमेदवार असतील. भाजपकडून दीपक महाडिक, कविता कचरे यांनी उमेदवारी मागितली आहे.
‘कऱ्हाड उत्तर’मधून सेनेचे समीर जाधव उमेदवार असू शकतात. भाजपबरोबर असल्यामुळे हा मतदारसंंघ स्वाभिमानीकडे राहणार असून येथून मनोज घोरपडे उमेदवार आहेत. नाव चर्चेत आहे.
फलटणमधून डॉ. चंद्रकांत तासगावकर उमेदवार असणार आहेत. भाजपकडे चेहराच नाही. परिणामी येथून ‘स्वाभिमानी’चे दिगंबर आगवणे यांनाच उमेदवार मिळणार आहे.
युती तुटल्यामुळे वाईत माजी आमदार मदन भोसले यांची गोची झाली आहे. भाजपकडून पुरुषोत्तम जाधव यांचे नाव निश्चित आहे. सेनेकडून येथून डी. एम. बावळेकर अथवा जिल्हाप्रमुख नंदकुमार
घाडगे उमेदवार होऊ शकतात. (प्रतिनिधी)