शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

सातारा : तीन महिन्यांत नऊ वाहने जळून खाक, जुनी भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 4:00 PM

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते.

ठळक मुद्दे नव्यांना मिळतोय एक तृतीयांश विमातीन महिन्यांत नऊ वाहने जळून खाकजुनी वाहने भंगारात

सातारा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते. त्यामुळे अनेकजण जळालेल्या गाड्यांचा सांगाडा अक्षरश: भंगारात कवडीमोल भावाने विकत असल्याचे समोर आले असून, सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत तब्बल ९ गाड्या जळून खाक झाल्या आहेत.उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर महामार्गावर वाहने पेटण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. वाहनातील वायरिंगचे शॉर्टसर्किट झाल्यानंतर त्याचे ऊर्जेमध्ये रुपांतर होऊन आग भडकत असल्याचे काही वाहन चालकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या आगीमध्ये कोणत्याही वाहनाचा केवळ सांगाडाच उरतो. त्यामुळे ही वाहने भंगारातच विकावी लागतात. जुन्या वाहनांना विमा भरला जात नाही. त्यामुळे भरपाई मिळणे कठीणच होते.

पाच ते सहा वर्षांचे वाहन असेल आणि ते वाहन आगीत भस्मसात झाले तर एक तृतीयांंश रक्कम संबंधित मालकाला भरपाई म्हणून मिळत असते. परंतु जुन्या वाहनांना विम्यातून काहीच भरपाई मिळत नाही. त्यामुळे झालेले नुकसान संबंधित वाहन मालकालाच सोसावे लागते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

उन्हाळ्याची तीव्रता अद्याप सुरू झाली नसली तरी गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात ९ वाहने जळून खाक झाली आहेत. यातील कार आणि दोन ट्रक ही तीन वाहने अगदी नवी होती. या तिन्ही वाहनांना विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, उर्वरित ६ दुचाकी वाहनांना विमा नसल्यामुळे त्या मालकांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRto officeआरटीओ ऑफीस