शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:21 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यातील यशस्वी ठरलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांना राज्यातील एक-दोन नव्हे ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा जिल्ह्यातील यशस्वी ठरलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांना राज्यातील एक-दोन नव्हे तर आतापर्यंत १३ जिल्ह्यांच्या पथकाने भेट देत माहिती घेतलीय. यामध्ये भंडाºयापासून सिंधुदूर्गपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे साताºयाचा हा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचल्यातच जमा आहे.सातारा जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विविध उपक्रम, अभियानाच्या माध्यमातून देशभर नावलौकिक केला आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या ही विविध योजना यशस्वी करून डंका निर्माण केलाय. तर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी साताºयाने स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक मिळविलेला. आता तर जिल्हा परिषदेतील सर्व विभाग व परिसरही सौरऊर्जेवर उजळणार आहे. सातारा ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद सौरऊर्जेचा वापर करणारी ठरू शकते. अशा या जिल्ह्यातील विविध यशस्वी प्रकल्प पाहण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांची पथके भेट देत आहेत.कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अमरावती, वर्धा, जळगाव, नाशिक, चंद्रपूर, धुळे, भंडारा व वाशिम या जिल्ह्यातील पथकांनी साताºयाला भेट दिली. तर काही दिवसांपूर्वीच जालना जिल्ह्यातीलही पथक जिल्ह्याच्या भेटीवर आले होते. या पथकांनी सातारा तालुक्यातील नागठाणे गावातील आदर्श घनकचरा व्यवस्थानाची पाहणी केली. तसेच सुका व ओल्या कचºयाचे वर्गीकरण करणे, त्यापासून खत तयार कसे करण्यात येते, याची सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर कºहाड तालुक्यातील बनवडीलाही भेट देत तेथील घनकचरा व्यवस्थानाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. पाटण तालुक्यातील आदर्श गाव मान्याचीवाडीलाही भेट देण्यात आली. अनेक योजना आणि उपक्रमांत या गावाने आपली ओळख निर्माण केलीय. या गावालाही पथकाने भेट देत माहिती घेतली. साताºयातील अशा गावांचा आदर्श घेऊनच राज्यातून भेटीसाठी आलेल्या जिल्ह्यांनी काम सुरू केले आहे. साताºयातील आदर्श गावातील व्यवस्थापनाचे धडे इतर जिल्हे व गावे गिरवणार आहेत. हे जिल्ह्यासाठी निश्चितच गौरवास्पद आहे.नागठाणेआदर्श घनकचरा व्यवस्थापनओला व सुक्या कचºयासाठी वाहन व्यवस्थाओल्या कचºयापासून गांडूळ खत निर्मितीसुक्या कचºयातील प्लास्टिक गोळा करून विक्रीदीड वर्षात गांडूळ खताची साडेतीन लाखांची विक्रीगाव कचरामुक्त व ग्रामस्थांना स्वच्छतेची सवयगावातील दुर्गंधी संपण्यास मदतशेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेतीस चालनाबनवडीगावात २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनामीटरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठाआदर्शवत सांडपाणी प्रकल्प कार्यान्वितगांडूळ खताची ३५ टन निर्मितीसांडपाणी प्रकल्पावर दीड एकरवर केळीची बागओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र वाहनेआठ हजार जणांची भेटगेल्या काही वर्षांत १३ जिल्हे आणि ५४० गावे, संस्था आणि शाळांनी सातारा जिल्ह्यातील विविध गावांना भेट देत आदर्श कामांची माहिती घेतलीय. या अंतर्गत भेट देणाºयांची संख्या जवळपास ८ हजार इतकी आहे. भेट देणाºयांनी आपले गाव आणि जिल्ह्यात साताºयाप्रमाणे काम सुरू केले आहे.