शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

सातारा एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST

महाराष्ट्र शासनाने मोटरवाहन अधिनियम १९८८ कलम ६६ उपकलम ३ खंड एनचा वापर करून एसटीला १२ जून २०२० पासून मालवाहतूक ...

महाराष्ट्र शासनाने मोटरवाहन अधिनियम १९८८ कलम ६६ उपकलम ३ खंड एनचा वापर करून एसटीला १२ जून २०२० पासून मालवाहतूक करण्याची परवानगी दिली. त्यामुळे महामंडळाने जुन्या गाड्यांचे रूपांतर ट्रकमध्ये मालवाहतूक सुरू केली आहे. यासाठी एसटीच्या रचनेत बदल घडवून आणले. प्रवासी बसत असलेल्या ठिकाणी बंधिस्त डबा केला. एसटी महामंडळाने आजवर केवळ माणसांची वाहतूक केली. पण आता मालवाहतूक हा कर्मचारी आणि समाजासाठी नवीनच प्रयोग होता. त्याला कितपत यश येईल कोणालाही माहिती नव्हते. पण साताऱ्याचे विभाग नियंत्रक सागर पळसुले ठरावीक अधिकाऱ्यांना घेऊन लॉकडाऊनमध्ये औद्योगिक वसाहतीत फिरत होते. कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी वारंवार बैठका घेऊन मालवाहतूक करण्यासाठी पटवून देत होते. तर काहीजण मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधून हा व्यवसाय कसा चालतो, यातील बारकावे टिपण्याचा प्रयत्न करत होते.

यामुळे साताऱ्यातील व्यापाऱ्यांनाही मालवाहतुकीसाठी नवा पर्याय मिळाला. लोणंदमधील कांदा, वाई, कोरेगाव, कऱ्हाड तालुक्यातून कृषी माल राज्याच्या विविध भागात धावू लागल्या आहेत. आता तर सिमेंट पोती, औषधे, फळांची त्यासह अनेक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. त्यातून उत्पन्नाचा नवा स्त्रोत राज्य परिवहन महामंडळाला मिळाला आहे. समाधानकारक उत्पन्न मिळत नसले तरी अपेक्षित उत्पन्न मिळविण्याचे प्रयत्न कामगार करीत आहेत.

चौकट :

ऑक्सिजन वाहतुकीचा उचलला भार

कोरोना काळात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत होता. ऑक्सिजनअभावी लाखो कोरोनाबाधित रुग्ण एक एक श्वास घेण्यासाठी झगडत होता. त्यातच राज्याच्या अनेक भागात ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प तेव्हा नव्हते. त्यामुळे मोठे प्रकल्प असलेल्या ठिकाणाहून ऑक्सिजन टँकर भरून प्रत्येक जिल्ह्यात पाठवले जात होते. मात्र, यासाठी टँकर घेऊन जाण्यासाठी राज्यातील वाहतुकीचा अनुभव असलेल्या चालकांची कमतरता भासत होती. त्याचवेळी संबंधित चालकाची कामाप्रती निष्ठा असणेही तितकेच महत्त्वाचे होते. त्यामुळे प्रशासनाने एसटी महामंडळाकडे अनुभवी आणि काम करण्यास तयार असलेल्या चालकांची नावे मागितले होते. तेव्हा क्षणाचाही विचार न करता अनेक चालक स्वत:हून पुढे आले. त्यामुळे प्रशासनावरील मोठा ताण कमी झाला होता.

चौकट :

स्टेअरिंग धरणारे हात विकू लागले फळे

कोरोनामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न घटले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार झालेला नव्हता. अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. पण यामुळे कर्मचारी डगमगले नाही. काही कर्मचाऱ्यांनी चुळबूळ सुरू केली. पण धाडसी आणि कधीही हार मानायची नाही, असा निर्धार केलेले कर्मचाऱ्यांनी अन्य पर्याय निवडले. हातात स्टेअरिंग धरणारे, तिकीट फाडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फळे, भाजीपाला विकण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे कुटुंब उभारण्यासाठी मदत झाली.