शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सातारा : एका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:02 IST

सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.

ठळक मुद्देएका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहीम

सागर गुजर

सातारा : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्याबाबत जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतींच्या ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर ९ हजार ६३७ खातेदारांनी स्वत:हून पुढाकार घेत थकीत बिले भरली. नोटीस काळात २५ कोटी ९० लाखांची वसुली झाली.जिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीबाबत जिल्ह्यातील ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावण्यात आली होती. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीत ३२६ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७२७ खातेदारांनी सहभाग घेतला. या लोकअदालतीमध्ये सातारा तालुक्यातील ६२ ग्रामपंयतीच्या ४२१ खातेदारांकडून १० लाख ३० हजार २७७ रुपयांची वसुली झाली.

कोरेगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ३९० खातेदारांकडून ७ लाख २३ हजार ९१० रुपये, खटावातील १६ ग्रामपंचायतीच्या ८३ खातेदारांकडून २ लाख ९१ हजार ५८४ रुपये, माणमधील १२ ग्रामपंचायतीच्या ६२ खातेदारांकडून ४७ हजार ५३४ रुपये, फलटणमधील ४९ ग्रामपंचायतीच्या १५९ खातेदारांकडून ३ लाख ११ हजार ७०० रुपये, खंडाळ्यातील १८ ग्रामपंचायतीच्या ५८ खातेदारांकडून १ लाख ७४ हजार ४२९ रुपये, वाईमधील ४६ ग्रामपंचायतीच्या ८२ खातेदारांकडून ३ लाख ४१ हजार ९५० रुपये, जावळीतील १४ ग्रामपंचायतींच्या ४२ खातेदारांकडून ७६ हजार ९६५ रुपये, महाबळेश्वरमधील ७ ग्रामपंचायतींच्या २६ खातेदारांकडून ५४ हजार ८६६ रुपये, कऱ्हाडातील ६५ ग्रामपंचायतींमधील २२० खातेदारांकडून ५ लाख ७६ हजार ९५७ रुपये, पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या १८४ खातेदारांकडून ३ लाख ८३ हजार ७३३ रुपयांची वसुली झाली.आठ दिवसांत तीन कोटींची वसुलीजिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या ११ हजार ३६४ खातेदारांना वसुलीबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत २ कोटी ९० लाख १३ हजार ९९३ रुपयांची वसुली झाली.सातारा महाराष्ट्रात दुसरासातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक आला आहे. थकीत पाणीपट्टी व स्ट्रिटलाईट वीजबिलाच्या वसुलीमध्ये सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला आहे. पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे. महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस आॅथॅरिटी, मुंबई यांनी याची घोषणा केली आहे.

लोकअदालतीमध्ये थकीत कर वसुलीचे दावे निकाली निघत आहेत, ही अत्यंत जमेची बाजू आहे. यामध्ये संबंधित ग्रामपंचायती व त्यांचे खातेदार यांच्यात सामोपचाराने समेट घडवला जातो. थकीत कर वसुलीचा फायदा ग्रामपंचायतहद्दीतील विकासकामांसाठीच होत असतो. लोकांनी थकबाकीच ठेवली नाही तर लोकअदालतीपर्यंत जाण्याचीही वेळ येणार नाही.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ग्रामपंचायतींच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी लोकांनी सहकार्य करणे आवश्यकआहे. लोकअदालतीत जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतलीपाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांसाठीच कर वसुलीवेळेत भरणे आवश्यक आहे.- अविनाश फडतरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर