शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सातारा : एका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:02 IST

सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.

ठळक मुद्देएका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहीम

सागर गुजर

सातारा : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्याबाबत जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतींच्या ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर ९ हजार ६३७ खातेदारांनी स्वत:हून पुढाकार घेत थकीत बिले भरली. नोटीस काळात २५ कोटी ९० लाखांची वसुली झाली.जिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीबाबत जिल्ह्यातील ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावण्यात आली होती. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीत ३२६ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७२७ खातेदारांनी सहभाग घेतला. या लोकअदालतीमध्ये सातारा तालुक्यातील ६२ ग्रामपंयतीच्या ४२१ खातेदारांकडून १० लाख ३० हजार २७७ रुपयांची वसुली झाली.

कोरेगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ३९० खातेदारांकडून ७ लाख २३ हजार ९१० रुपये, खटावातील १६ ग्रामपंचायतीच्या ८३ खातेदारांकडून २ लाख ९१ हजार ५८४ रुपये, माणमधील १२ ग्रामपंचायतीच्या ६२ खातेदारांकडून ४७ हजार ५३४ रुपये, फलटणमधील ४९ ग्रामपंचायतीच्या १५९ खातेदारांकडून ३ लाख ११ हजार ७०० रुपये, खंडाळ्यातील १८ ग्रामपंचायतीच्या ५८ खातेदारांकडून १ लाख ७४ हजार ४२९ रुपये, वाईमधील ४६ ग्रामपंचायतीच्या ८२ खातेदारांकडून ३ लाख ४१ हजार ९५० रुपये, जावळीतील १४ ग्रामपंचायतींच्या ४२ खातेदारांकडून ७६ हजार ९६५ रुपये, महाबळेश्वरमधील ७ ग्रामपंचायतींच्या २६ खातेदारांकडून ५४ हजार ८६६ रुपये, कऱ्हाडातील ६५ ग्रामपंचायतींमधील २२० खातेदारांकडून ५ लाख ७६ हजार ९५७ रुपये, पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या १८४ खातेदारांकडून ३ लाख ८३ हजार ७३३ रुपयांची वसुली झाली.आठ दिवसांत तीन कोटींची वसुलीजिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या ११ हजार ३६४ खातेदारांना वसुलीबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत २ कोटी ९० लाख १३ हजार ९९३ रुपयांची वसुली झाली.सातारा महाराष्ट्रात दुसरासातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक आला आहे. थकीत पाणीपट्टी व स्ट्रिटलाईट वीजबिलाच्या वसुलीमध्ये सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला आहे. पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे. महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस आॅथॅरिटी, मुंबई यांनी याची घोषणा केली आहे.

लोकअदालतीमध्ये थकीत कर वसुलीचे दावे निकाली निघत आहेत, ही अत्यंत जमेची बाजू आहे. यामध्ये संबंधित ग्रामपंचायती व त्यांचे खातेदार यांच्यात सामोपचाराने समेट घडवला जातो. थकीत कर वसुलीचा फायदा ग्रामपंचायतहद्दीतील विकासकामांसाठीच होत असतो. लोकांनी थकबाकीच ठेवली नाही तर लोकअदालतीपर्यंत जाण्याचीही वेळ येणार नाही.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ग्रामपंचायतींच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी लोकांनी सहकार्य करणे आवश्यकआहे. लोकअदालतीत जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतलीपाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांसाठीच कर वसुलीवेळेत भरणे आवश्यक आहे.- अविनाश फडतरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर