शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सातारा : पुणे-मिरज पॅसेंजर, ऐन थंडीत डेमू रेल्वेचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:17 IST

कोरेगाव : पुणे -मिरज लोहमार्गावर धावणाऱ्या कोल्हापूर-मिरज- पुणे पॅसेंजरमधून अनेक वर्षांपासून नागरिक प्रवास करीत आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या ...

ठळक मुद्देपुणे-मिरज पॅसेंजर : ऐन थंडीत डेमू रेल्वेचा प्रयोगनव्या गाड्यांमुळे प्रवासी गारठले, प्रशासनावर नाराजी

कोरेगाव : पुणे-मिरज लोहमार्गावर धावणाऱ्या कोल्हापूर-मिरज-पुणे पॅसेंजरमधून अनेक वर्षांपासून नागरिक प्रवास करीत आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जुन्या रेल्वे गाड्यांऐवजी नव्या डेमू रेल्वे गाड्या धावू लागल्या आहेत. ऐन थंडीत पहाटे सुटणाऱ्या पॅसेंजरमधील प्रवाशांना विना दरवाजाच्या गाड्यांमधून कुडकुडत प्रवास करावा लागत आहे.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे या चार जिल्ह्णांतील प्रवाशांसाठी स्वस्तात मस्त प्रवासासाठी कोल्हापूर-मिरज-पुणे पॅसेंजर उपलब्ध आहे. कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर पॅसेंजरच्या दिवसातून केवळ दोनच फेऱ्या होतात. त्यापैकी रात्रीच्या दोन्ही बाजूच्या फेऱ्या साताऱ्यातच मुक्कामी असतात. त्यामुळे थेट प्रवासासाठी दिवसातून केवळ एकच पॅसेंजर आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.ही पॅसेंजर कोल्हापुरातून पहाटे पाच वाजता पॅसेंजर पुण्यासाठी सुटते. अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात ही पॅसेंजरमध्येच येत असल्याने जवळपास तिला तीन ते चार स्थानकांवर अन्य गाड्यांना क्रॉसिंग देण्यासाठी नाईलाजास्तव थांबावेच लागते. तब्बल पाच तासांनंतर ती साताऱ्यात पोहोचते. तेथून दरमजल करत पुण्याकडे मार्गक्रमण करते. पुण्यात तिला पोहोचण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागतो.

दिवसभरात पुन्हा पुण्यासाठी जाण्यास पॅसेंजर नाही, सायंकाळी ४.५० वाजता दुसरी पॅसेंजर (५१४४२) सुटते. तिला कोल्हापूर ते पुणे असे थेट तिकीट दिले जाते, मात्र ती साताऱ्यात पहाटेपर्यंत मुक्कामी असते. पुण्यातून देखील सकाळी आणि दुपारी कोल्हापूरसाठी पॅसेंजर असून, त्यापैकी एक साताऱ्यात मुक्कामी असते. दुसऱ्या दिवशी दोन्ही पॅसेंजर पहाटेच्यावेळी अनुक्रमे कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने सुटतात.पॅसेंजरवर सध्या रेल्वे प्रशासनाने नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता दीड ते दोन महिन्यांपासून जुन्या डब्यांऐवजी डेमूचा वापर सुरू केल्याने प्रवासी वैतागले आहेत. थंडीत कुडकुडत डेमू रेल्वेतून प्रवास करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. प्रशासनाच्या कारभारामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली असून, एसटी व खासगी वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून जुन्या डब्यांच्या गाडीऐवजी नव्याने दाखल झालेल्या डेमू (डिसेल लोकल) या मार्गावर पॅसेंजरऐवजी चालविल्या जात आहेत. तीन गाड्या पॅसेंजरसाठी वापरल्या जातात, एक डेमू स्वयंचलित इंजिनाद्वारे चालते तर दुसºया डेमूला स्वतंत्र इंजीन जोडावे लागत आहे.

जुन्या डब्यांमध्ये सुमारे १५०० प्रवासी एकाचवेळी प्रवास करू शकत होते, मात्र डेमूमध्ये ही संख्या निम्याहून कमी आहे. डेमूला दरवाजे स्वयंचलित असून हाताने ते बंद करता येत नसून आसनव्यवस्था शहरी भागाप्रमाणे आहे. त्यामुळे अनेकांना खाली बसून प्रवास करावा लागत आहे. थंडीत तर प्रवाशांना गारठत प्रवास करावा लागत आहे.चुकीची वेळेमुळे गैरसोयएका विभागात कमीत कमी दोन पॅसेंजर चालविण्याचा रेल्वे बोर्डाचा नियम असल्याने केवळ प्रशासन कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर पॅसेंजर चालवत असून, त्यात प्रवाशांच्या फायद्याचा विचार न करता, केवळ प्रशासनाच्या हिताचा निर्णय घेतला गेला असल्याचे एकंदरीत वेळापत्रक पाहिल्यावर दिसून येते. चुकीची वेळ आणि कमी अंतरासाठी जादा वेळ, हेच या मार्गावरील पॅसेंजरचे मोठे दुखणे आहे.

टॅग्स :passengerप्रवासीSatara areaसातारा परिसरPuneपुणे