शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सातारा : अवघ्या २३ दिवसांत ३ हजार डंपर गाळ बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 12:20 IST

वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावात रात्रंदिवस जलसंधारणाचं काम सुरू आहे. गावातीलच एका तलावातून २३ दिवसांत ३ हजार डंपर इतका गाळ काढण्यात आला असून, यामुळे माळरानावरील ५० एकर क्षेत्र बागायती तयार झाले आहे. तर संपूर्ण गाळ काढण्याने सुमारे सात कोटी लिटर एवढा पाणीसाठा वाढणार आहे.

ठळक मुद्देअवघ्या २३ दिवसांत ३ हजार डंपर गाळ बाहेरसात कोटी लिटर पाणीसाठा वाढणार खटावमधील अनपटवाडीत रात्रंदिवस काम सुरू

नितीन काळेलसातारा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावात रात्रंदिवस जलसंधारणाचं काम सुरू आहे. गावातीलच एका तलावातून २३ दिवसांत ३ हजार डंपर इतका गाळ काढण्यात आला असून, यामुळे माळरानावरील ५० एकर क्षेत्र बागायती तयार झाले आहे. तर संपूर्ण गाळ काढण्याने सुमारे सात कोटी लिटर एवढा पाणीसाठा वाढणार आहे.खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावाने पाणीदार होण्याचे ठरविले आहे. त्यातूनच करुंज बेंद नावाच्या पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम सुरू झालं आहे. शासनाची गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना त्यासाठी फायदेशीर ठरली आहे. अनुलोमच्या माध्यमातून गावातील तलावातील गाळ काढण्यात येत आहे. अनुलोमचे जनसेवक श्रेयस काणे आणि सामाजिक कार्यकर्ते मेघराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.मे महिन्याच्या ऐन उन्हाळ्यात तलावातील गाळ काढणीस प्रारंभ झाला. त्यावेळी तलावातील गाळ हा १०० टक्के काळं सोनं असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर हा गाळ शेतकऱ्यांनी जवळच्या माळरानावर पसरवला. ज्या ठिकाणी जनावरे चरत होती, अशा सुमारे ५० एकर क्षेत्रावर गाळ टाकण्यात आला.

यामुळे ३० हून अधिक शेतकऱ्यांच्या माळरानाचे आता बागायती क्षेत्रात रुपांतर होत आहे. तर आतापर्यंतच्या २३ दिवसांत सुमारे ३ हजार डंपर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढणार आहे.

तलावातून दररोज सरासरी १७५ डंपर गाळ काढण्यात येत असून, पोकलेन मशीनसाठी शासनाच्या वतीने इंधन पुरवठा करण्यात येत आहे. तर गाळ वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या कामाच्या ठिकाणी सहा डंपर, दोन पोकलेन कार्यरत असून, पाऊस नाही पडला तर किमान तीन महिने हे काम चालणार आहे.तलावात वीस फुटांवर होता गाळगावाची लोकसंख्या सुमारे ६००गावातील ऐकूण क्षेत्र १६०० हेक्टरतलावाची निर्मिती १९७० च्या दरम्यानतलावात २० फुटाच्यावर गाळ साठलेलानवीन जमिनीत तीन फूट गाळाचा थर 

गाव तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे. त्यामुळे किमान सात कोटी लिटर एवढा पाणीसाठा वाढणार आहे. परिसरातील शेकडो एकर क्षेत्राला फायदा होणार आहे.- भगवान भोसले,माजी सरपंच

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJalyukt Shivarजलयुक्त शिवारGovernmentसरकारWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा