शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

सातारा : संविधान जाळले तरी नरेंद्र मोदी बोलेनात : फौजिया खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:06 IST

मोदी सरकारच्या काळामध्ये देशात लोकशाही व संविधान या दोन्ही गोष्टींना धोका निर्माण झाला आहे. संविधान बदलण्यासाठी आपण सत्तेवर आलो, असं भाजपचे नेते सांगत आहेत. जंतरमंतर येथे देशद्रोह्यांनी संविधानाची प्रत जाळली तरी नरेंद्र मोदी आपल्या मन की बातमध्ये काही बोलले नाहीत

ठळक मुद्दे३ आॅक्टोबर रोजी पुण्यात संविधान बचाव कार्यक्रमप्रतिकात्मक मनु:स्मृतीचे दहन

 सातारा : ‘मोदी सरकारच्या काळामध्ये देशात लोकशाही व संविधान या दोन्ही गोष्टींना धोका निर्माण झाला आहे. संविधान बदलण्यासाठी आपण सत्तेवर आलो, असं भाजपचे नेते सांगत आहेत. जंतरमंतर येथे देशद्रोह्यांनी संविधानाची प्रत जाळली तरी नरेंद्र मोदी आपल्या मन की बातमध्ये काही बोलले नाहीत. मोदींच्या काळात संविधानाला धक्का पोहोचविणारे देशद्रोही मोकाट फिरत आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँगे्रसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी केली.

राष्ट्रवादी भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आमदार विद्याताई चव्हाण, राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, छाया जंगले, आशाताई भिसे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, सुरेखाताई पाटील, कविता म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फौजिया खान म्हणाल्या, ‘आपल्या देशात सध्या जे लोक सरकारच्या भूमिकेबद्दल बोलतात, त्यांचा आवाज दाबला जातो, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, अथवा त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. एस. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. या गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत आहेत.’

देशात सर्वात असुरक्षित महिला आहेत, हे स्पष्ट करताना खान म्हणाले, ‘भाजपचे मंत्री अत्याचार करणाऱ्यांची बाजू घेतात. भाजपचे आमदार राम कदम मुलींना उचलून नेण्याची भाषा वापरतात.’निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वापरावर बंदी घालून पूर्वीसारखी मतदान प्रक्रिया राबविण्याची राष्ट्रवादीची मागणी आहे. या मशीन नको म्हणून निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे १७ पक्षांनी तक्रारी केल्या आहेत. भारत, नायजेरिया आणि काही छोटे देश सोडले तर जगात कुठेही ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. आपल्याच देशात या मशीन वापरासाठी हट्ट केला जातो.

दरम्यान, ३ आॅक्टोबर रोजी पुणे येथे संविधान बचाव कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित राहणार आहेत. २६ जानेवारी रोजी मुंबईतून संविधान बचाव चळवळीला राष्ट्रवादीने सुरुवात केली. ९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादला संविधान बचाव कार्यक्रम घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी भवनात महिला पदाधिकाºयांची बैठक घेऊन फौजिया खान, आ. विद्याताई चव्हाण यांनी संविधान बचाव कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी जिल्ह्णातून एक हजार महिला सहभागी होतील, असे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले. यावेळी कºहाड तालुकाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, प्रदेश सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, लीना गोरे, राजलक्ष्मी नाईक आदींची उपस्थिती होती.प्रतिकात्मक मनु:स्मृतीचे दहनसंविधान बचाव, देश बचाव, इव्हीएम मशीन हटाव, अशा घोषणा देत राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे साताºयात मनु:स्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन केले. ‘संविधान की शान में राष्ट्रवादी मैदान में, भाजप हटाओ...देश बचाओ, संविधान बचाओ..देश बचाओ, इव्हीएम हटाव लोकशाही बचाओ....’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेस