शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : संविधान जाळले तरी नरेंद्र मोदी बोलेनात : फौजिया खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:06 IST

मोदी सरकारच्या काळामध्ये देशात लोकशाही व संविधान या दोन्ही गोष्टींना धोका निर्माण झाला आहे. संविधान बदलण्यासाठी आपण सत्तेवर आलो, असं भाजपचे नेते सांगत आहेत. जंतरमंतर येथे देशद्रोह्यांनी संविधानाची प्रत जाळली तरी नरेंद्र मोदी आपल्या मन की बातमध्ये काही बोलले नाहीत

ठळक मुद्दे३ आॅक्टोबर रोजी पुण्यात संविधान बचाव कार्यक्रमप्रतिकात्मक मनु:स्मृतीचे दहन

 सातारा : ‘मोदी सरकारच्या काळामध्ये देशात लोकशाही व संविधान या दोन्ही गोष्टींना धोका निर्माण झाला आहे. संविधान बदलण्यासाठी आपण सत्तेवर आलो, असं भाजपचे नेते सांगत आहेत. जंतरमंतर येथे देशद्रोह्यांनी संविधानाची प्रत जाळली तरी नरेंद्र मोदी आपल्या मन की बातमध्ये काही बोलले नाहीत. मोदींच्या काळात संविधानाला धक्का पोहोचविणारे देशद्रोही मोकाट फिरत आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँगे्रसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी केली.

राष्ट्रवादी भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आमदार विद्याताई चव्हाण, राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, छाया जंगले, आशाताई भिसे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, सुरेखाताई पाटील, कविता म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फौजिया खान म्हणाल्या, ‘आपल्या देशात सध्या जे लोक सरकारच्या भूमिकेबद्दल बोलतात, त्यांचा आवाज दाबला जातो, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, अथवा त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. एस. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. या गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत आहेत.’

देशात सर्वात असुरक्षित महिला आहेत, हे स्पष्ट करताना खान म्हणाले, ‘भाजपचे मंत्री अत्याचार करणाऱ्यांची बाजू घेतात. भाजपचे आमदार राम कदम मुलींना उचलून नेण्याची भाषा वापरतात.’निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वापरावर बंदी घालून पूर्वीसारखी मतदान प्रक्रिया राबविण्याची राष्ट्रवादीची मागणी आहे. या मशीन नको म्हणून निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे १७ पक्षांनी तक्रारी केल्या आहेत. भारत, नायजेरिया आणि काही छोटे देश सोडले तर जगात कुठेही ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. आपल्याच देशात या मशीन वापरासाठी हट्ट केला जातो.

दरम्यान, ३ आॅक्टोबर रोजी पुणे येथे संविधान बचाव कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित राहणार आहेत. २६ जानेवारी रोजी मुंबईतून संविधान बचाव चळवळीला राष्ट्रवादीने सुरुवात केली. ९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादला संविधान बचाव कार्यक्रम घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी भवनात महिला पदाधिकाºयांची बैठक घेऊन फौजिया खान, आ. विद्याताई चव्हाण यांनी संविधान बचाव कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी जिल्ह्णातून एक हजार महिला सहभागी होतील, असे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले. यावेळी कºहाड तालुकाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, प्रदेश सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, लीना गोरे, राजलक्ष्मी नाईक आदींची उपस्थिती होती.प्रतिकात्मक मनु:स्मृतीचे दहनसंविधान बचाव, देश बचाव, इव्हीएम मशीन हटाव, अशा घोषणा देत राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे साताºयात मनु:स्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन केले. ‘संविधान की शान में राष्ट्रवादी मैदान में, भाजप हटाओ...देश बचाओ, संविधान बचाओ..देश बचाओ, इव्हीएम हटाव लोकशाही बचाओ....’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेस