शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सातारा :  सहा महिने उलटले तरी मृत साहिलला न्याय नाही,  बेकायदा वाळू उपसा, बोरखळमधील कृष्णा नदीत बुडून झाला होता मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:46 IST

बोरखळ, ता. सातारा येथे कृष्णा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खोदलेल्या डबऱ्यात बुडून गावातीलच साहिल मोहन दीक्षित या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाला न्याय मिळावा, किमान कुटुंबाला नुकसान भरपाई तरी मिळावी, यासाठी साहिलचे वडील मोहन आणि आई सरिता महसूल विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.

ठळक मुद्दे सहा महिने उलटले तरी मृत साहिलला न्याय नाहीबोरखळमधील कृष्णा नदीत बुडून झाला होता मृत्यूबेकायदा वाळू उपसा

सातारा : बोरखळ, ता. सातारा येथे कृष्णा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खोदलेल्या डबऱ्यात बुडून गावातीलच साहिल मोहन दीक्षित या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.

आपल्या मुलाला न्याय मिळावा, किमान कुटुंबाला नुकसान भरपाई तरी मिळावी, यासाठी साहिलचे वडील मोहन आणि आई सरिता महसूल विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.मागील वर्षी ७ जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पाणवठ्यावर गेलेल्या साहिलचा वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची पोलिस दफ्तरी अकस्मात मयत अशी नोंद झाली. या प्रकरणात त्रयस्थ व्यक्तीची फिर्याद घेतली गेली.पालकांना या कायदेशीर प्रक्रियेपासून दूर ठेवून वाळू उपसा करणाऱ्यांना व त्यास सहकार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पोलिस तपास अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टीने केला आहे.

साहिलच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी पक्षाच्या वतीने त्याच्या पालकांसह सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.बेकायदा काढलेल्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात बुडून साहिलचा मृत्यू झाला असल्याने संबंधित वाळू व्यावसायिक, प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या सर्व घटकांमुळे साहिलचा मृत्यू झाला, अशी फिर्याद नोंदवावी.

तसेच साहिल याच्या पालकांना २५ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी, वाळू तस्करी व घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस