शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : स्वाभिमानीचे आंदोलन निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून : सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 15:35 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: रयत क्रांतीने आयोजित केलेल्या ऊस परिषदेत ऊस दराबाबत सकारात्मक निर्णय घोषित केलेला होता. तरीही केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. हे आंदोलन पुर्नत: फसले आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

ठळक मुद्दे स्वाभिमानीचे आंदोलन निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून : सदाभाऊ खोत  राजू शेट्टींविरोधात हातणंगले मतदारसंघात समोरासमोर लढत देणार

सातारा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: रयत क्रांतीने आयोजित केलेल्या ऊस परिषदेत ऊस दराबाबत सकारात्मक निर्णय घोषित केलेला होता. तरीही केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन स्वाभिमानीशेतकरी संघटनेने आंदोलन केले. हे आंदोलन पुर्नत: फसले आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुष्काळी निवारण आढावा बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणूक माढा की हातकणंगले मतदारसंघातून लढणार?, या प्रश्नावर खोत यांनी आता रणांगणातच लढत देणार, असे म्हणत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदारराजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्याचे संकेत दिले.खोत म्हणाले, आत्तापर्यंत कुठल्याही सरकारने एफआरपी कायद्याची अंमलबजावणी केली नव्हती. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन ऊस परिषदेच्या व्यासपीठावर ऊसाचा दर जाहीर केला आहे. साखर कारखान्यांकडून तो मिळाला नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना केवळ प्रसिध्दीसाठी आंदोलन करत आहे.दरम्यान, तीव्र पाणी टंचाई असूनही ज्या गावांचा दुष्काळ यादीत समावेश झाला नाही, त्या गावांचा फेरसर्व्हे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक बांधावर जाऊन हे सर्व्हेक्षण करणार आहेत.

येत्या रविवारपर्यंत (दि. १८ नोव्हेंबर) हा अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांची नोंदच झाली नसल्याचे समोर आले असून ती करण्याच्या दृष्टिने कार्यवाही होणार आहे. ज्या गावांत टँकरची मागणी आहे, त्या गावांना तात्काळ टँकर उपलब्ध करावा, चाऱ्यांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

मायणी, निमसोड, कातरखटाव या ठिकाणी प्रचंड पाणी टंचाई असल्याचे निदर्शनास आले आहे, तसेच इतर काही गावांमध्येही परिस्थिती असू शकते. त्यामुळे प्रशासनाने सर्कलनिहाय सर्व्हे न करता तो गावनिहाय करावा, अशा सूचनाही केल्या असल्याचे मंत्री खोत म्हणाले.यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघीनीची हत्त्या केल्याप्रकरणी प्राणीमित्र सरकारविरोधात तीव्र भूमिका घेऊन आहेत, याबाबत विचारले असता अवनी वाघीणीने तब्बल १३ जणांचा बळी घेतला होता. प्राण्यांइतकाच माणसाचा जीवही महत्त्वाचा आहे, प्राणी मित्रांनी हेही लक्षात घ्यावे, असे मंत्री खोत म्हणाले.कारखान्यांवर कारवाईच्या प्रश्नाला बगलज्या कारखान्यांनी गतवर्षी ऊस नेल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम दिली नाही, त्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई केली गेली नसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, या प्रश्नाला मंत्री खोत यांनी सोयीस्करपणे बगल दिली. हा विषय सहकार खात्याशी निगडीत असून त्यांना त्याबाबत सूचना केल्याचे मंत्री खोत यांनी सांगीतले.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूर