शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

सातारा : सोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 13:34 IST

सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकारआॅनलाईन नोंदणी करण्याचीही शेतकऱ्यांसाठी संधी उपलब्ध

पिंपोडे बुद्रूक (सातारा) : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.शेतकऱ्यांच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारीत केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी या हेतूने कोरेगांव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने नाफेडच्या मंजुरीने खरीप हंगाम सन २०१८-१९ करीता बाजार समिती कोरेगांव येथील मुख्य बाजार आवारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे.हे केंद्र १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव भोईटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वखार महामंडळ कोरेगाव साठा अधीक्षक जाधव, सहायक निबंधक सुद्रीक, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले, कोरेगाव बाजार समितीचे सहायक सचिव संभाजीराव निकम, संचालक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.बाजारात सोयाबीन मालाची ज्यादा आवक झाल्याने बाजार भाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अशा प्रकारे शेतकऱ्यांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये या हेतूने हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान अधारभूत किंमतीने म्हणजेच प्रति क्विंटल ३ हजार ३९९ रुपये दराने सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र्रावर आॅनलाईन नोंदणी करता २०१८-२०१९ चे सोयाबीन या पिक पाण्याच्या नोंदीसह ७/१२ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.दरम्यान शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेला माल स्वच्छ असावा मालाची आर्दता कमाल बारा टक्के असावी तो काडीकचरा किंवा मातीमिश्रिती नसावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर