शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

सातारा : सोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 13:34 IST

सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकारआॅनलाईन नोंदणी करण्याचीही शेतकऱ्यांसाठी संधी उपलब्ध

पिंपोडे बुद्रूक (सातारा) : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.शेतकऱ्यांच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारीत केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी या हेतूने कोरेगांव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने नाफेडच्या मंजुरीने खरीप हंगाम सन २०१८-१९ करीता बाजार समिती कोरेगांव येथील मुख्य बाजार आवारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे.हे केंद्र १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव भोईटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वखार महामंडळ कोरेगाव साठा अधीक्षक जाधव, सहायक निबंधक सुद्रीक, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले, कोरेगाव बाजार समितीचे सहायक सचिव संभाजीराव निकम, संचालक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.बाजारात सोयाबीन मालाची ज्यादा आवक झाल्याने बाजार भाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अशा प्रकारे शेतकऱ्यांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये या हेतूने हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान अधारभूत किंमतीने म्हणजेच प्रति क्विंटल ३ हजार ३९९ रुपये दराने सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र्रावर आॅनलाईन नोंदणी करता २०१८-२०१९ चे सोयाबीन या पिक पाण्याच्या नोंदीसह ७/१२ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.दरम्यान शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेला माल स्वच्छ असावा मालाची आर्दता कमाल बारा टक्के असावी तो काडीकचरा किंवा मातीमिश्रिती नसावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर