शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

सातारा : तब्बल २ हजार ८०० घरांत शाडूच्या मूर्ती----लोकमत इनिशिएटिव्ह

By admin | Updated: September 9, 2014 23:44 IST

‘लोकमत’च्या प्रबोधनाला यश : शेकडो नागरिकांनी केले घरच्या घरी बादलीत विसर्जन

सातारा : दहा दिवसांच्या जल्लोषानंतर सांगता झालेल्या गणेशोत्सवाचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, पर्यावरणपूरक उत्सवाविषयी वाढलेली जागरूकता. साताऱ्यात यावर्षी तब्बल २७०० ते २८०० घरांत शाडूमातीच्या बाप्पांची प्रतिष्ठापना झाली आणि शेकडो नागरिकांनी घरच्या घरी बादलीत विसर्जन केले. सुमारे वीस सार्वजनिक मंडळांनी यावर्षी मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता ती कायम ठेवली. शहरातील जलस्रोतांच्या प्रदूषणाचा मुद्दा ‘लोकमत’ने सर्वप्रथम उचलून धरला. सातारा पालिकेनेही यंदा पर्यावरणपूरक उत्सवाला पूरक भूमिका घेतली. मूर्तिकारांसह गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांशी आधीपासूनच संवाद साधला. ईको-फ्रेन्डली उत्सवासाठी आधीपासूनच कार्यरत असलेल्या संस्था हिरीरीने या मोहिमेत उतरल्या. मूर्तिकार आणि गणेशमूर्तींचे स्टॉलधारक यांना शाडूच्या मूर्ती अधिक संख्येने उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. काही संस्था आणि मंडळांनी स्वत:च नोंदणी करवून घेतली आणि शाडूच्या मूर्तींची एकत्रित मागणी नोंदविली.‘लोकमत’ने मातीच्या मूर्तीच्या धर्मशास्त्रातील महत्त्वापासून प्रबोधन केले. तसेच, याकामी रिंगणात उतरलेल्या संस्था-संघटनांच्या प्रयत्नांना व्यापक प्रसिद्धी देण्यात आली. त्यामुळे याविषयी जनमानसात बदल घडण्यास मोठी मदत झाली. अनेकांनी घरच्या घरी बादलीत किंवा हौदात शाडूच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरविले होते. त्याची उत्तम अंमलबजावणी होऊन अनेकांनी विसर्जनानंतर तुळशीला किंवा अंगणातील झाडांना ते पाणी घातले.पालिकेने यावर्षी फक्त शाडूच्याच मूर्ती आणणाऱ्या स्टॉलधारकांना मोफत जागा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेचीही अंमलबजावणी झाल्याने शाडूमूर्तींची संख्या यंदा कितीतरी पटींनी वाढली. शाळकरी मुलांसाठी गणेशमूर्ती बनविण्याची शिबिरे काही संस्थांनी घेतली. लहानग्यांनी हाताने बनविलेल्या मूर्तींची अनेक घरांत प्रतिष्ठापनाही झाली. पालिकेने गोडोली येथे खास विसर्जन तलाव तयार केला होता. हजारो मूर्तींचे विसर्जन या तलावात करण्यात आले. सर्वच बाजूंनी प्रबोधन आणि कृतिकार्यक्रम राबविला गेल्याने मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळून, यापुढील काळात पर्यावरणाचे जतन करण्याच्या प्रयत्नांत लोकसहभाग वाढण्याची सुचिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)यंदा ‘लोकमत’च्या माध्यमातून शाडूचा गणपती बसविण्याचे प्रबोधन झाले. त्यामुळे आम्ही घरात शाडूचा गणपती बसविला आणि विसर्जनही पाण्याच्या मोठ्या बादलीत केले. मूर्ती विरघळल्यानंतर त्याचे हे पाणी घरासमोरील बागेत प्रत्येक झाडाला घातले. - राजश्री केळुस्कर, सातारावर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी-परंपरांमध्ये बदल करणे सोपे नसते. त्याला अनेकदा घरातील ज्येष्ठांचा विरोध राहतो. यंदा ‘लोकमत’मुळे आम्ही मूर्ती लहान आणि शाडूची आणली. तिचे विसर्जनही घरीच केले. आमच्यातील हा बदल ‘लोकमत’ मुळेच झाला.- संजना जाधव, गोळीबार मैदानधर्मशास्त्र आणि आधुनिकता यातील तफावत ‘लोकमत’मधील वृत्तमालिकांमुळे पुढे आली. त्यामुळे पारंपरिक पध्दतीनुसार आम्ही मातीचा गणपती बसवला होता. या गणपतीचे विसर्जन आम्ही पालिकेने सोय केलेल्या हौदात केले. याचे श्रेय ‘लोकमत’ला जाते.- हरिविजय बाबर, पंताचा गोट