शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सातारा : खटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका, शेतकरी पिकं काढण्यात मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 16:11 IST

खटाव तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील हरभरा काढणीस तसेच मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त दिसून येत आहेत. त्यातच दोन दिवसापासून बदललेल्या हवामानाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. जी पीके काढणीस योग्य झाली आहेत ती सुरक्षीत घरी आणण्यासाठी ची लगबग शिवारात दिसून येत आहे.

ठळक मुद्देखटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोकाशेतकरी पिकं काढण्यात मग्न

खटाव (सातारा) : खटाव तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील हरभरा काढणीस तसेच मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त दिसून येत आहेत. त्यातच दोन दिवसापासून बदललेल्या हवामानाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. जी पीके काढणीस योग्य झाली आहेत ती सुरक्षीत घरी आणण्यासाठीची लगबग शिवारात दिसून येत आहे.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून हवेत अचानक झालेला बदल, पावसाळी वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर हातातोडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे वाया जातील या भीतीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी हरभरा पीक काढून ठेवले आहे. ते या वातावरणात सापडू नये यासाठी मळुन आणण्याची गडबड चालली आहे.परिसरात दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण दिसू लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. या आभाळामुळे ज्वारी, कांदा, हरभरा पीकांवर किडींचा प्रादूर्भाव होऊन उत्पन्नात घट होणारच आहे. त्याहीपेक्षा पिकांचेही नुकसान होणार आहे. शेतमालाला भाव नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला या हवामानाचा फटका येणाऱ्या पीकाला बसण्याची भिती शेतकऱ्यातुन व्यक्त केली जात आहे. सध्याचे वातावरण पाहता रब्बी पीके धोक्यात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी