शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
3
हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
5
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
6
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
9
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
10
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
11
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
12
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
13
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
14
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
15
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
16
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
17
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
18
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
19
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
20
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : ‘आॅक्टोबर हिट’बरोबरच खोल-खोल पाणी रांजणीत दुष्काळाचा ट्रेलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:35 IST

दुष्काळ विरोधातील लढ्यासाठी माण, खटाव तालुक्यांत यंदा चांगली कामे करण्यात आली; पण पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत.

ठळक मुद्देतालुक्यातील अनेक गावांत पिण्याचे पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई जाणवत आहे.शेतातील विहिरीतून पाणी आणून व काही नागरिक ५० रुपयांना एक बॅरल पाणी विकत घेऊन तहान भागवित होते

सातारा/म्हसवड : दुष्काळ विरोधातील लढ्यासाठी माण, खटाव तालुक्यांत यंदा चांगली कामे करण्यात आली; पण पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. प्रशासकीय यंत्रणा आता खडबडून जागी झाली असून, टंचाई आढावा बैठकांवर जोर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईवर टाकलेला दृष्टीक्षेप.

माण तालुक्याला यंदा वळीव, मान्सून तसेच भरवशाचा परतीच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे सर्वच ठिकाणचे जलस्त्रोत आटले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत पिण्याचे पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पावसाचे सर्व नक्षत्र कोरडे गेल्याने तालुक्यातील पावसाच्या आशेवर खरिपाची केलेली पेरणी पूर्णत: वाया गेली. पाऊस नसल्याने रब्बी हंगामातही पेरणी न झाल्याने अन्नधान्याची व चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वाधिक सामना रांजणी ग्रामस्थांना करावा लागत आहे. सुमारे १,६६२ लोकसंख्येचे रांजणी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येते. ग्रामपंचायतीच्या विहिरीने तीन महिन्यांपासून तळ गाठल्याने गावचा पाणीपुरवठा तीन-चार महिन्यांपासून बंद झाला आहे. तेव्हापासून ग्रामस्थ शेतातील विहिरीतून पाणी आणून व काही नागरिक ५० रुपयांना एक बॅरल पाणी विकत घेऊन तहान भागवित होते; पण पंधरा दिवसांपासून तेही पाणी मिळणे बंद झाले.

सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील तरुणाई पोटापाण्यासाठी रंगकाम, गलाई उद्योग, इतर कामासाठी मुंबई, पुण्यात व अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने मेंढरं जगविण्यासाठी त्यांना सध्या तालुका सोडून इतर ठिकाणी जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.टंचाई आढावा बैठकपिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाघोली येथे बुधवार, दि. ३१ रोजी टंचाई आढावा बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ यांनी दिली. कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाºया तालुक्याच्या उत्तरेकडील परिसरात यावर्षी पावसाने दडी मारल्याने भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याअभावी परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. परिसरातील बहुतांशी गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना कैक संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय शोधण्याच्या हेतूने या परिसरातील सर्व गावांची संयुक्त आढावा बैठक आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.टँकर मागणीचा प्रस्ताव दाखलरांजणीत पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव शुक्रवार, दि. २६ आॅक्टोबरला माण पंचायत समितीमध्ये दिला आहे. टँकर लवकर सुरू होऊन नागरिकांची पाणी टंचाई दूर होईल, असा विश्वास ग्रामसेवक आर. बी. सुतार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.श्रमाला मिळेना निसर्गाची साथरांजणी गावाने दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी यंदाच्या वर्षी सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला. रात्रंदिवस काम करुन त्यांनी कामे केली आहेत. यातून जलसंधारणाचे मोठं काम उभे केले .पण या श्रमाला निसगार्ची साथ न मिळाल्यामुळे पाणीटंचाईने उग्र स्वरुप धारण केले आहे. पाऊसच न झाल्याने सर्व भांडी कोरडी पडली आहेत. त्यामुळे रांजणी ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

माण तालुक्यातील रांजणी गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

रांजणीत माणसाला पाणी प्यायला नाही तर मुक्या जनवारांचं लय हाल हायती. घरची साठ मेंढरं जगवायची कशी, हा प्रश्नच आहे.- सीताबाई कोकरेपंच्चीस वर्षांतून पहिल्यांदाच दिवाळीपूर्वी दुष्काळ पडला आहे. आताच प्यायला पाणी नाही तर पिकाचा विषयच सोडा. पिकं नसल्याने जनावरांनी काय खायचं, असा प्रश्न बजरंग कोकरे यांनी उपस्थित केला.- बजरंग कोकरे 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर