शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

सातारा : ‘आॅक्टोबर हिट’बरोबरच खोल-खोल पाणी रांजणीत दुष्काळाचा ट्रेलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:35 IST

दुष्काळ विरोधातील लढ्यासाठी माण, खटाव तालुक्यांत यंदा चांगली कामे करण्यात आली; पण पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत.

ठळक मुद्देतालुक्यातील अनेक गावांत पिण्याचे पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई जाणवत आहे.शेतातील विहिरीतून पाणी आणून व काही नागरिक ५० रुपयांना एक बॅरल पाणी विकत घेऊन तहान भागवित होते

सातारा/म्हसवड : दुष्काळ विरोधातील लढ्यासाठी माण, खटाव तालुक्यांत यंदा चांगली कामे करण्यात आली; पण पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. प्रशासकीय यंत्रणा आता खडबडून जागी झाली असून, टंचाई आढावा बैठकांवर जोर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईवर टाकलेला दृष्टीक्षेप.

माण तालुक्याला यंदा वळीव, मान्सून तसेच भरवशाचा परतीच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे सर्वच ठिकाणचे जलस्त्रोत आटले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत पिण्याचे पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पावसाचे सर्व नक्षत्र कोरडे गेल्याने तालुक्यातील पावसाच्या आशेवर खरिपाची केलेली पेरणी पूर्णत: वाया गेली. पाऊस नसल्याने रब्बी हंगामातही पेरणी न झाल्याने अन्नधान्याची व चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वाधिक सामना रांजणी ग्रामस्थांना करावा लागत आहे. सुमारे १,६६२ लोकसंख्येचे रांजणी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येते. ग्रामपंचायतीच्या विहिरीने तीन महिन्यांपासून तळ गाठल्याने गावचा पाणीपुरवठा तीन-चार महिन्यांपासून बंद झाला आहे. तेव्हापासून ग्रामस्थ शेतातील विहिरीतून पाणी आणून व काही नागरिक ५० रुपयांना एक बॅरल पाणी विकत घेऊन तहान भागवित होते; पण पंधरा दिवसांपासून तेही पाणी मिळणे बंद झाले.

सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील तरुणाई पोटापाण्यासाठी रंगकाम, गलाई उद्योग, इतर कामासाठी मुंबई, पुण्यात व अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने मेंढरं जगविण्यासाठी त्यांना सध्या तालुका सोडून इतर ठिकाणी जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.टंचाई आढावा बैठकपिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाघोली येथे बुधवार, दि. ३१ रोजी टंचाई आढावा बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ यांनी दिली. कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाºया तालुक्याच्या उत्तरेकडील परिसरात यावर्षी पावसाने दडी मारल्याने भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याअभावी परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. परिसरातील बहुतांशी गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना कैक संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय शोधण्याच्या हेतूने या परिसरातील सर्व गावांची संयुक्त आढावा बैठक आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.टँकर मागणीचा प्रस्ताव दाखलरांजणीत पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव शुक्रवार, दि. २६ आॅक्टोबरला माण पंचायत समितीमध्ये दिला आहे. टँकर लवकर सुरू होऊन नागरिकांची पाणी टंचाई दूर होईल, असा विश्वास ग्रामसेवक आर. बी. सुतार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.श्रमाला मिळेना निसर्गाची साथरांजणी गावाने दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी यंदाच्या वर्षी सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला. रात्रंदिवस काम करुन त्यांनी कामे केली आहेत. यातून जलसंधारणाचे मोठं काम उभे केले .पण या श्रमाला निसगार्ची साथ न मिळाल्यामुळे पाणीटंचाईने उग्र स्वरुप धारण केले आहे. पाऊसच न झाल्याने सर्व भांडी कोरडी पडली आहेत. त्यामुळे रांजणी ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

माण तालुक्यातील रांजणी गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

रांजणीत माणसाला पाणी प्यायला नाही तर मुक्या जनवारांचं लय हाल हायती. घरची साठ मेंढरं जगवायची कशी, हा प्रश्नच आहे.- सीताबाई कोकरेपंच्चीस वर्षांतून पहिल्यांदाच दिवाळीपूर्वी दुष्काळ पडला आहे. आताच प्यायला पाणी नाही तर पिकाचा विषयच सोडा. पिकं नसल्याने जनावरांनी काय खायचं, असा प्रश्न बजरंग कोकरे यांनी उपस्थित केला.- बजरंग कोकरे 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर