शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

सातारा जिल्ह्यातील गळीत हंगाम आटोपला; ऊस गाळप, साखर उत्पादन, उताऱ्यात कोणता कारखाना अव्वल..जाणून घ्या

By दीपक शिंदे | Updated: April 21, 2023 15:29 IST

गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट 

संतोष धुमाळपिंपोडे बुद्रुक : जिल्ह्यात १९ आक्टोंबर २०२२ रोजी सुरू झालेला गळीत हंगाम १३ एप्रिल रोजी आटोपला असून जिल्ह्यात ९९ लाख २३ हजार ८३७ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर १०.३३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यात १०२ लाख ४७ हजार ७२५ क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले असल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयाने दिली आहे.ऊस गाळप आणि साखर उत्पादनात सुरवातीपासूनच प्रथम क्रमांकावर असलेल्या जरंडेश्वर (गुरू कमोडिटी या खासगी कारखान्याने आघाडी कायम राखली आहे. तर साखर उताऱ्यात सह्याद्री सहकारी कारखाना अव्वल ठरला आहे. गतवर्षी प्रतिकुल वातावरणीय परिस्थितीचा परिणाम उसावर झाल्याने चालू वर्षी राज्यात साखर उत्पादनामध्ये विलक्षण घट झाली आहे. चालू वर्षी ऊस गळाप हंगाम काहीसा लवकर अटोपला आहे.अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम २६ मार्च अखेर अटोपला. केवळ अजिंक्यतारा कारखान्याने १४ एप्रिल अखेर गळीत हंगाम सुरू ठेऊन ७ लाख ५ हजार ८८६ मेट्रीक टन ऊसाचे गाळप ११.२२ टक्के उताऱ्यासह ७ लाख ९२ हजार ३४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच प्रतिदिन दहा हजार मेट्रीक टन गाळप क्षमता असलेल्या जरंडेश्वर गुरू कमोडिटी या खासगी कारखान्याने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात हंगामाच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक म्हणजे १८ लाख १८ हजार ४२१ मेट्रीक टनाइतके गाळप पूर्ण केले आहे.१०.०४ टक्के सरासरी उताऱ्यानुसार १८ लाख २६ हजार ५०० क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे.त्या खालोखाल कृष्णा सहकारी साखर  कारखान्याने १० लाख ६० हजार मेट्रीक टनाइतके ऊस गाळप पूर्ण केले आहे. या कारखान्याचा उतारा १०.७५ टक्के असून ११ लाख ३९ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादन तयार करीत दुसरे स्थान मिळविले आहे.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ९ लाख ११ हजार ९०७ मेट्रीक टन ऊस गाळप आणि १२.५९ टक्के सरासरी उच्चांकी उताऱ्यानुसार ११ लाख ४७ हजार ६६० क्विटलइतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे.

साखर उताऱ्यात सह्याद्री अव्वलसाखर उताऱ्यात सर्वाधिक १२.५९ टक्केवारीनुसार सह्याद्री सहकारी साखर कारखाना अव्वल ठरला आहे. त्या खालोखाल रयत सहकारी कारखाना साखर उतारा १२.३० टक्क्यांइतका मिळाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट गतवर्षी म्हणजे सन २०२१-२२ या काळातील गळीत हंगातात अगदी जून पर्यत सुरू होता. या हंगामात सात खासगी व सात सहकारी असे एकून चौदा साखर कारखान्यांनी मिळून ११५ लाख ३८ हजार ४८१ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १०.९६ टक्के साखर उताऱ्यासह १२६ लाख ४० हजार ४८० क्विंटल साखर उत्पादित केली होती. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी  जिल्ह्यात साखर उत्पादनामध्ये २३ लाख ९२ हजार ७५५ क्विंटल इतकी घट झाली आहे.

गेले कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांच्या नोंदीत क्षेञावरील एक ऊस देखिल गाळपाविना राहणार नाही अशी आदर्शवत कार्यवाही करणाऱ्या अजिंक्यतारा कारखान्याकडून नोंद असलेल्या क्षेञावरील सर्व ऊसाचे गाळप करून हंगाम बंद केला आहे .यापुढील काळातील गळीत हंगामात देखिल उपलब्ध ऊसाचे वेळेत गाळप करण्यासाठी याच प्रकारचे नियोजन होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस गाळपाबाबत चिंता न करता केवळ उच्चांकी उत्पादनावर भर द्यावा. - जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, अजिंक्यतारा कारखाना. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने