शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सातारा : सत्ताधाऱ्यांकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई : शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:38 IST

सातारा पालिकेतील सत्ताधारी शहर सफाईच्या ठेक्यातून जनतेच्या पैशांची नासाडी करत आहेत. शहर स्वच्छतेच्या नावाखाली साताऱ्यात पालिकेची तिजोरी साफ करण्याचा उद्योग सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे, असा गंभीर आरोप नगरविकास आघाडीचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई : शिवेंद्रसिंहराजे भोसले शहरवासीयांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात जनआंदोलन उभारणार

सातारा : सातारा पालिकेतील सत्ताधारी शहर सफाईच्या ठेक्यातून जनतेच्या पैशांची नासाडी करत आहेत. शहर स्वच्छतेच्या नावाखाली साताऱ्यात पालिकेची तिजोरी साफ करण्याचा उद्योग सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे, असा गंभीर आरोप नगरविकास आघाडीचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.

या खाबूगिरी आणि शहर विकासात अडथळे निर्माण करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, शहराच्या स्वच्छतेची अवस्था अत्यंत वाईट आहे. स्थानिक ठेकेदार व घंटागाडी चालकांना डावलून पालिकेने पुण्यातल्या ठेकेदाराला स्वच्छतेचा ठेका दिला आहे. पूर्वी शहर स्वच्छतेसाठी ५ लाखांच्या आसपास निधी खर्च होत होता. आता मात्र नवीन ठेकेदाराचे महिन्याला १९ लाखांचे बिल निघत आहे.

कचरा कोंडाळे वाढत आहेत. मात्र स्वच्छतेच्या नावाखाली भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे स्वच्छता शहराची आहे की पालिकेच्या तिजोरीची? हा प्रश्न शहरवासीयांना कायमच सतावतआहे.वृक्षलागवडीच्या तब्बल साडेचार कोटींचा ठेका दिला गेला आहे. सत्ताधारी नगरसेविकेचा पतीच पालिकेचे ठेके घेत आहेत. वर सारवासारवही केली जाते, म्हणजे सर्व बाजूंनी भ्रष्टाचार करण्याचे सत्र पालिकेत सध्या सुरू असल्याचे सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा पालिकेचे कामकाज सद्य:स्थितीत कायद्याप्रमाणे चाललेले नाही. बहुमताच्या जोरावर सत्ताधारी आपलेच विषय रेटून मंजूर करत आहेत. एकदा अजेंडा तयार होतो, बैठकीआधी ऐनवेळी तो बदलला जातो.

विरोधकांची कामे अजेंड्यावरून वगळली जातात. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांनी शहर विकासासाठी निधी मंजूर केला आहे. मात्र, निवडणुकीतील उट्टे काढण्याच्या हेतूने त्यांचे विषयच अजेंड्यावर घेतले जात नाहीत.

राजकारण निवडणुकीपुरते ठेवा, पाच वर्षे शहराच्या विकासाचा विचार करा, असं वारंवार सांगूनही सत्ताधारी ताळ्यावर येत नाहीत. नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलावून जिल्हा नियोजन समितीने सूचविलेली कामे मंजूर करून घ्यावीत, ही आमची मागणी आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. न्याय मिळण्यासाठी कायदेशीर मार्गाने आम्ही लढत आहोत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसले