शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

सातारा : रयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 4:00 PM

तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत.

ठळक मुद्देरयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सवअण्णांनी लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचा वटवृक्ष

सातारा : तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड  तालुक्यातील काले येथे केली. १९१९ मध्ये अण्णांनी लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.

महाराष्ट्रातील १५ जिल्हे अन् कर्नाटकातील एका जिल्ह्यातून अशी ४२ महाविद्यालये, ४३८ हायस्कूल, ९१ वसतिगृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती महाविद्यालये, पाच तंत्र विद्यालये, पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा, आठ अध्यापक महाविद्यालये, ४५ प्राथमिक व पूर्व महाविद्यालये, आठ आश्रमशाळा तर ५८ आयटीआय अशा ७३७ शाखा तयार झाल्या आहेत.

त्यातून साडेचार लाख विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाते. या ठिकाणी १३, ५५३ कर्मचारी कार्यरत आहेत. भव्यदिव्य विस्तार झालेल्या रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था समजली जाते. साताºयातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयास नुकताच स्वायत्ता मिळाली आहे. बोधी वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह म्हणून वटवृक्षाची निवड केली.स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदस्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य घेऊन सुरू झालेल्या रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिकामधून हजारो विद्यार्थी धडे घेत आहेत. रयत शिक्षण संस्थेचा अनेक विद्यापीठांनी आदर्श घेतला आहे. 

शतकाच्या वाटचालीत रयत परिवार मोठा झाला आहे. भविष्यात चिकित्सक व संशोधन वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी रयत प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी तंत्रस्नेही शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात येईल.- अनिल पाटील, चेअरमन, रयत शिक्षण संस्था

टॅग्स :Rayat Educational Instituteरयत शिक्षण संस्थाSatara areaसातारा परिसरPrakash Javadekarप्रकाश जावडेकर