शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सातारा : आधी बुंध्यात निखारे.. आता झाडच गायब !, विघ्नसंतोषींचा उपद्रव सुरूच : पुरावा लपविण्यासाठी खोडावर पालापाचोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:50 IST

कास पठार परिसरात अज्ञातांकडून वणवे लावण्याच्या घटना वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिरव्यागार झाडाच्या बुंध्यातच निखारे टाकून झाड पाडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. अज्ञातांनी आता हे झाडचं गायब केले असून, पुरावा लपविण्यासाठी झाडाच्या खोडावर चक्क पालापाचोळ्याचा ढीग पसरविण्यात आला आहे.

ठळक मुद्देआधी बुंध्यात निखारे.. आता झाडच गायब ! विघ्नसंतोषींचा उपद्रव सुरूच पुरावा लपविण्यासाठी खोडावर पालापाचोळा

पेट्री : कास पठार परिसरात अज्ञातांकडून वणवे लावण्याच्या घटना वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिरव्यागार झाडाच्या बुंध्यातच निखारे टाकून झाड पाडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. अज्ञातांनी आता हे झाडचं गायब केले असून, पुरावा लपविण्यासाठी झाडाच्या खोडावर चक्क पालापाचोळ्याचा ढीग पसरविण्यात आला आहे.गेल्या तीन महिन्यांपासून सातारा-कास मार्गावर ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले जाऊ लागले आहे. मागील आठवड्यात अंबानी ते पारंबेफाटा दरम्यान देवकल फाट्यानजिक मोठमोठ्या झाडांचे बुंधेच निखारे टाकून पेटविण्यात आले होते. हिरवीगार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडू लागल्याने पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात आला.दरम्यान, गेल्या आठवड्यात पारंबेफाटा नजिक जाळण्यात आलेले हिरवेगार झाडचं आता अज्ञातांकडून गायब करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झाड जळून खाली पडल्यानंतर ते गायब करण्याबरोबरच अज्ञातांकडून पुरावा नष्ट करण्यासाठी झाडाच्या खोडावर चक्क पालापाचोळा टाकण्यात आला आहे.या घटना रोखण्यासाठी वेळीच कठोर पाऊले उचलली गेली नाही तर येथील निसर्गसौंदर्याचा ऱ्हास होईल, अशी खंत व्यक्त करून अशा प्रकारचे अमानुष कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. 

वणव्यांमुळे प्राणीसंपदा, वनसंपदा धोक्यात आल असून, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. कित्येक पशुपक्ष्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. वृक्षांची कत्तल करणाऱ्या विघ्नसंतोषींवर वनविभागाने कठोर कारवाई करावी.- ओंकार मोहिते,पर्यावरणप्रेमी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentवातावरण