शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सातारा : एक्स्प्रेसला थांबा नसल्याने जवानांसह कुटुंबीयांची परवड, रहिमतपूर रेल्वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 14:04 IST

कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाताना गैरसोय होत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री सातारा रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे.

ठळक मुद्देरहिमतपूर रेल्वे स्थानकात थांबत नाहीत एक्स्प्रेस गाड्या एक्स्प्रेसला थांबा नसल्याने जवानांसह कुटुंबीयांची परवडरात्री-अपरात्री गाठावा लागतोय सातारा

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाताना गैरसोय होत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री सातारा रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे.कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहराला प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राज्यातील पहिली व देशातील दुसरी नगरपरिषद म्हणूनही रहिमतपूरची ओळख आहे. रहिमतपूरपासून चार किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन असून धामणेर रेल्वे स्टेशन म्हणूनही ओखले जाते. परंतु त्याची नोंद रहिमतपूर रेल्वे स्टेशन अशीच आहे. या रेल्वे स्टेशनचा म्हणावा असा विकास झालेला नाही.ब्रिटिश काळापासून असलेल्या सुविधांमध्ये किरकोळ अपवाद वगळता कोणताही बदल झालेला दिसत नाही. एका पटरीवरुनच रेल्वे गाड्या धावतात. क्रॉसिंगसाठी दुसरीही पटरी आहे. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजुला रेल्वेची मुबलक जागा आहे. मात्र या जागेच्या विकासाकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे जाणवत आहे.सातारा जिल्हा हा शूरवीर जवानांचा म्हणून ओळखला जातो. कोरेगाव तालुक्यातील बहुधा प्रत्येक गावातील युवक सैन्यात कार्यरत आहेत. रहिमतपूर शहरासह परिसरातील व खटाव तालुक्यातील सुमारे शंभर गावातील वाड्यावस्त्यांवरील जवांना महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपºयात प्रवास करण्यासाठी सोयीचा प्रवास रहिमतपूर रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

मात्र, या स्टेशनवर पॅसेंजर, कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्पे्रस याच गाड्या थांबतात. इतर महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने जवानांसह त्यांच्यारबरोबर ये-जा करणाऱ्या कुटुंबीयांची गैरसोय होते.या स्टेशनवरुन चोवीस तासांत वीस ते पंचवीस गाड्या धावतात. देशसेवा बजावणाऱ्या जवानांना प्रामुख्याने जम्मू-काश्मिर, श्रीनगर, पंजाब, दिल्ली, राजस्थान, चंदीगड, नागालँड, आसाम आदी ठिकाणी जावे लागते. ज्या ज्या ठिकाणी कुटुंबीयांना राहण्याची सोय आहे.

त्या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेची वेळ रात्री-अपरात्री दुपारची कधीचीही असू शकते. त्यामुळे त्यांना सातारा रेल्वेस्थानकात सोडून येताना अपघात घडत आहेत. त्यामुळे रहिमतपूर रेल्वे स्टेशनमध्ये एक्स्प्रेसला थांबा देण्याची गरज निर्माण झाली आहे.या एक्स्प्रेसंना हवाय थांबारहिमतपूर रेल्वे स्थानकात गोवा-निजामुद्दीन, जोधपूर, महालक्ष्मी, हुबळी, चंदीगड एक्स्प्रेस थांबणे गरजेच्या आहेत. त्यातील गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस सातारा व कऱ्हाड येथे थांबते. या सर्व गाड्यांना रहिमतपूरलाही थांबा देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRailway Passengerरेल्वे प्रवासी